शेती विकण्याच्या वादातून वाकी शिवणे येथे मुलाने केला वडिलांचा खून सांगोला : शेती विकण्याचा व कर्जाच्या वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे (पाटील वस्ती) येथे घडली आहे. या प्रकरणी अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बटु कुंभार (वय ५५, रा. पाटील वस्ती, वाकी शिवणे ता. सांगोला) यांनी त्यांच्या नावावरील चार एकर शेती विकण्यास काढली होती. याला त्यांचा मुलगा अतुल कुंभार विरोध करत होता. तसेच एचडीएफसी बँकेचे सुमारे १७ लाख रुपये व सोसायटीचे सुमारे ७० हजार रुपये कर्ज काढले असल्याने शेती विकणे, कर्जाचा प्रश्न आणि अतुलच्या लग्नाच्या कारणावरून वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत होते. ९ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजता जेवणानंतर थ्री फेज वीज आल्याने शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी रमेश कुंभार शेतात गेले होते. त्याआधी अतुल कुंभारही शेतात डाळिंबाच्या झाडांना लिक्विड फवारणीसाठी गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास शेजारी राहणारे तुकाराम मोहिते यांनी रमेश कुंभार ओरडल्याचा आवाज ऐकू आल्याचे त्यांच्या पत्नी समाबाई यांना सांगितले. यानंतर समाबाई यांनी पतीला मोटारसायकलवरून शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. मात्र काही वेळानंतर परिसरातील लोकांनी रमेश कुंभार यांच्या डोक्यावर, तोंडावर व पायावर अज्ञात हत्याराने वार करून त्यांचा खून झाल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करून अतुल रमेश कुंभार याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान शेती विकणे, बँकेचे कर्ज व लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने लोखंडी पाईपने मारहाण करून वडिलांचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे समोर आले. या प्रकरणी समाबाई रमेश कुंभार यांच्या फिर्यादीवरून अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शेती विकण्याच्या वादातून वाकी शिवणे येथे मुलाने केला वडिलांचा खून सांगोला : शेती विकण्याचा व कर्जाच्या वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे (पाटील वस्ती) येथे घडली आहे. या प्रकरणी अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बटु कुंभार (वय ५५, रा. पाटील वस्ती, वाकी शिवणे ता. सांगोला) यांनी त्यांच्या नावावरील चार एकर शेती विकण्यास काढली होती. याला त्यांचा मुलगा अतुल कुंभार विरोध करत होता. तसेच एचडीएफसी बँकेचे सुमारे १७ लाख रुपये व सोसायटीचे सुमारे ७० हजार रुपये कर्ज काढले असल्याने शेती विकणे, कर्जाचा प्रश्न आणि अतुलच्या लग्नाच्या कारणावरून वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत होते. ९ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजता जेवणानंतर थ्री फेज वीज आल्याने शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी रमेश कुंभार शेतात गेले होते. त्याआधी अतुल कुंभारही शेतात डाळिंबाच्या झाडांना लिक्विड फवारणीसाठी गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास शेजारी राहणारे तुकाराम मोहिते यांनी रमेश कुंभार ओरडल्याचा आवाज ऐकू आल्याचे त्यांच्या पत्नी समाबाई यांना सांगितले. यानंतर समाबाई यांनी पतीला मोटारसायकलवरून शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. मात्र काही वेळानंतर परिसरातील लोकांनी रमेश कुंभार यांच्या डोक्यावर, तोंडावर व पायावर अज्ञात हत्याराने वार करून त्यांचा खून झाल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करून अतुल रमेश कुंभार याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान शेती विकणे, बँकेचे कर्ज व लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने लोखंडी पाईपने मारहाण करून वडिलांचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे समोर आले. या प्रकरणी समाबाई रमेश कुंभार यांच्या फिर्यादीवरून अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- 🛑 *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आयुष्यभर आचरणात आणण्याचे आवाहन केले. “डॉ. बाबासाहेबांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता जन्मापासून शेवटपर्यंत आचरणात आणले पाहिजेत. संविधान जपण्याचा संकल्प करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे,” असे त्या म्हणाल्या. खासदार प्रणिती शिंदे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले असून सत्ताधारी भाजपकडून त्याचा वारंवार अपमान होत आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही; मात्र आता देशासाठी लढण्याची वेळ आली आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी जात-पात, धर्म बाजूला ठेवून संघटित संघर्ष करणे आवश्यक आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, संसद व विधिमंडळात ३३ टक्के महिला आरक्षणाची तरतूद असलेले महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाले आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारने ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण लागू केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, महिला आरक्षण विधेयक काँग्रेसच्या पाठिंब्याने २०२३ मध्येच मंजूर झाले असताना सत्ताधाऱ्यांना ३० महिन्यांनंतर जाग आली असून, पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात येत आहे. तसेच, महिला आरक्षणाची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचना (डी-लिमिटेशन) शी जोडण्यावर त्यांनी आक्षेप घेतला. मतदारसंघ पुनर्रचना करण्यापूर्वी जनगणना होणे आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकार असंवैधानिक पद्धतीने निर्णय घेत आहे. हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप वारंवार लोकशाही आणि संविधानाचा अपमान करतात. महत्त्वाच्या विधेयकांपूर्वी देशभर चर्चा व्हायला हवी. संवाद हीच लोकशाहीची खरी ताकद आहे; मात्र सध्याचे सरकार एकतर्फी निर्णय घेत आहे. संवादाची परंपरा नष्ट होत असून हे लोकशाही संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत आणि ते जपणारे लोक व काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे, तोपर्यंत लोकशाही व संविधानावर कुठलाही आघात होऊ देणार नाही, असा निर्धार खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, माजी महापौर सुशिलाताई अबुटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक प्रवीण दादा निकाळजे, शिवा बाटलीवाला, प्रा. भोजराज पवार, प्रदेश सचिव श्रीशैल रणधिरे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, हनुमंतू सायबोळु, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, बाबुराव म्हेत्रे, दक्षिण तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड. मयूर खरात, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, रामसिंग आंबेवाले, बसवराज म्हेत्रे, राजन कामत, सिद्राम सलवदे सर, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, रुस्तुम कंपली, लखन गायकवाड, सागर उबाळे, अँड. शुभम माने, अयाज आळंद, भीमराव शिंदे, नूरअहमद नलवार, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, अँड करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, संध्या काळे, मुमताज तांबोळी, कोंडणताई काकडे, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, सलिमा शेख, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, चंद्रकला निजमल्लू, अनिता भालेराव, द्रोपदी शिवशरण, सचिन पवार, महेंद्र शिंदे, यल्लाप्पा बुगले, नारायण पावटे, राजेश झंपले, गंगाधर शिंदे, शंकर म्यागेरी, मोहसीन फुलारी, दशरथ सामल, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे, आमिर पाटील, अभेज दर्जी, दत्तात्रय गजभार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- Post by AapTak Hindi News Channel1
- बीड - बीड शहरात आयोजित केलेल्या भीम जयंती सोहळ्यानिमित्त रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी वाजवला ढोल तर आ.संदीप क्षीरसागर यांनी केला दिलखुलास डान्स.1
- “जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांची सांगड घातली तर यश नक्की मिळते” याचा जिवंत आदर्श म्हणजे शेख वसिम २०१३ पासून पाटोदा ग्राम पंचायत ते नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून रोजदारी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले शेख वसिम यांची अखेर अधिकृत नगरपंचायत विजतंत्रीपदी समावेशन करण्यात आले आहे. मात्र या यशामागे अनेक वर्षांचा खडतर संघर्ष दडलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजदारी पद्धतीवर काम करत असताना वसिम यांनी केवळ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले नाही, तर कायमस्वरूपी नियुक्तीसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला. स्थानिक प्रशासनापासून छत्रपती संभाजीनगर आणि मंत्रालयापर्यंत विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत त्यांनी आपली लढाई सुरू ठेवली. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तुटपुंज्या पगारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना न्यायालयीन लढाही त्यांनी दोन वर्षे जिद्दीने लढला. अनेकांनी “हा नाद सोड” असा सल्ला देत हेटाळणी केली, मात्र वसिम यांनी आपल्या ध्येयावरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. संकटांच्या वादळातही त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि अखेर न्यायालयीन लढ्यात यश मिळवत त्यांनी आपले स्वप्न साकार केले. आज त्यांच्या समावेशनाची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संघर्षाची दखल घेत भाई विष्णुपंत घोलप,पाटोदा तालुका औद्योगिक बहुउदेशीय ग्रामीण सहकारी संस्थेचे चेअरमन डिगंबर नाईकनवरे, पत्रकार हमिदखान पठाण, पत्रकार जावेद शेख, मोसिन भाऊ जनतावाले, यांच्या सह अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत सत्कारही केला. शेख वसिम यांच्या सह रावसाहेब काळे यांची पंप ऑपरेटर, चांगदेव अडागळे यांची पंप ऑपरेटर, सुनिल चौरे यांची पंप ऑपरेटरपदी समावेश करण्यात आला असुन या सर्वांचा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून, संकटांवर मात करून आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहे.1
- लातूर हादरलं! वाढती गुन्हेगारी – लातूरच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह खणी भागात गुन्हेगारांचा कहर – कोयता गँगची दहशत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. मंगळवार दि. 14 एप्रिल 2026. लातूर प्रतिनिधी : शहरातील खाणी परिसरात 12 तारखेच्या घटनेत कोयता घेऊन भांडण चालू आहे. नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड सुद्धा झाली आहे. दिवसेंदिवस शहरात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने वाढत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात कोयता गँगचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला असून, खुलेआम हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या टोळ्यांमध्ये नवतरुणांचा वाढता सहभाग, ज्यामुळे लातूरच्या सुरक्षिततेबरोबरच भविष्यासमोर मोठं संकट उभं टाकलं आहे. आतापर्यंत मारहाण, धमक्या, दहशत इतक्यावर मर्यादित असलेले प्रकार आता खुनांपर्यंत पोहोचले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे.1
- कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून आशीर्वाद घेतले आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाबद्दल आदर व्यक्त केला. दर्शनासोबतच जनसंवाद आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. सामान्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी लोकांशी चर्चा केली. "श्री अंबाबाई देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची सांगड घालणारे हे मंदिर आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1