शेती विकण्याच्या वादातून वाकी शिवणे येथे मुलाने केला वडिलांचा खून सांगोला : शेती विकण्याचा व कर्जाच्या वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे (पाटील वस्ती) येथे घडली आहे. या प्रकरणी अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बटु कुंभार (वय ५५, रा. पाटील वस्ती, वाकी शिवणे ता. सांगोला) यांनी त्यांच्या नावावरील चार एकर शेती विकण्यास काढली होती. याला त्यांचा मुलगा अतुल कुंभार विरोध करत होता. तसेच एचडीएफसी बँकेचे सुमारे १७ लाख रुपये व सोसायटीचे सुमारे ७० हजार रुपये कर्ज काढले असल्याने शेती विकणे, कर्जाचा प्रश्न आणि अतुलच्या लग्नाच्या कारणावरून वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत होते. ९ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजता जेवणानंतर थ्री फेज वीज आल्याने शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी रमेश कुंभार शेतात गेले होते. त्याआधी अतुल कुंभारही शेतात डाळिंबाच्या झाडांना लिक्विड फवारणीसाठी गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास शेजारी राहणारे तुकाराम मोहिते यांनी रमेश कुंभार ओरडल्याचा आवाज ऐकू आल्याचे त्यांच्या पत्नी समाबाई यांना सांगितले. यानंतर समाबाई यांनी पतीला मोटारसायकलवरून शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. मात्र काही वेळानंतर परिसरातील लोकांनी रमेश कुंभार यांच्या डोक्यावर, तोंडावर व पायावर अज्ञात हत्याराने वार करून त्यांचा खून झाल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करून अतुल रमेश कुंभार याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान शेती विकणे, बँकेचे कर्ज व लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने लोखंडी पाईपने मारहाण करून वडिलांचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे समोर आले. या प्रकरणी समाबाई रमेश कुंभार यांच्या फिर्यादीवरून अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शेती विकण्याच्या वादातून वाकी शिवणे येथे मुलाने केला वडिलांचा खून सांगोला : शेती विकण्याचा व कर्जाच्या वादातून मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे (पाटील वस्ती) येथे घडली आहे. या प्रकरणी अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश बटु कुंभार (वय ५५, रा. पाटील वस्ती, वाकी शिवणे ता. सांगोला) यांनी त्यांच्या नावावरील चार एकर शेती विकण्यास काढली होती. याला त्यांचा मुलगा अतुल कुंभार विरोध करत होता. तसेच एचडीएफसी बँकेचे सुमारे १७ लाख रुपये व सोसायटीचे सुमारे ७० हजार रुपये कर्ज काढले असल्याने शेती विकणे, कर्जाचा प्रश्न आणि अतुलच्या लग्नाच्या कारणावरून वडील व मुलामध्ये वारंवार वाद होत होते. ९ मार्च रोजी रात्री सुमारे १० वाजता जेवणानंतर थ्री फेज वीज आल्याने शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी रमेश कुंभार शेतात गेले होते. त्याआधी अतुल कुंभारही शेतात डाळिंबाच्या झाडांना लिक्विड फवारणीसाठी गेला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास शेजारी राहणारे तुकाराम मोहिते यांनी रमेश कुंभार ओरडल्याचा आवाज ऐकू आल्याचे त्यांच्या पत्नी समाबाई यांना सांगितले. यानंतर समाबाई यांनी पतीला मोटारसायकलवरून शेतात जाऊन पाहण्यास सांगितले. मात्र काही वेळानंतर परिसरातील लोकांनी रमेश कुंभार यांच्या डोक्यावर, तोंडावर व पायावर अज्ञात हत्याराने वार करून त्यांचा खून झाल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी चौकशी करून अतुल रमेश कुंभार याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान शेती विकणे, बँकेचे कर्ज व लग्नाच्या कारणावरून वाद झाल्याने लोखंडी पाईपने मारहाण करून वडिलांचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याचे समोर आले. या प्रकरणी समाबाई रमेश कुंभार यांच्या फिर्यादीवरून अतुल रमेश कुंभार याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
- सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज1
- माननीय मोहदय आमदार साहेब यांनी भूकंपग्रस्त विभाग याचे प्रश्न अधिवेशन मध्ये खूप चागल्या प्रकारे विषय घेऊन या गरीब 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्याचे सतत कर्यस्थ ब प्रयत्न करीत आहेत कारण आज भूकंप होऊन दुसरी पीडी चालू आहे प्रत्तेक घरात तीन चार वारस आहेत त्यांना घर नको का याचा पण या आमदार साहेबानो विचार करून मुद्दा अधिवेशन मध्ये उचलूम धरले आहेत या बद्दल मी महादेव शिंदे 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याच्या वतीने आमदार साहेब याचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे1
- भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या महान प्रणेत्या, विद्येची जननी आणि समस्त स्त्रियांना ज्ञानाचा व स्वाभिमानाचा उजेड दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले महान कार्य आणि समाजप्रबोधनाची परंपरा आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक नरसिंह आसादे, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, उपाध्यक्ष लखन गायकवाड, सागर उबाळे, शोभा बोबे, ज्योती गायकवाड, भीमराव शिंदे, शिवाजी साळुंखे, दत्तात्रेय गजभार, सर लक्ष्मण बनसोडे, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- ठीक आहे. **“मयूर एक्सप्रेस न्यूज”** साठी न्यूज स्टाईलमध्ये हेडलाईन आणि छोटा रिपोर्ट असा तयार करून देतो. --- **हेडलाईन :** **बांधकाम कामगारांवर प्रायव्हेट भांडे किट वाटप करणारारे ठेकेदारांची हुकूमशाही; मूलभूत सुविधांचा अभाव** **सोलापूर | प्रतिनिधी – मयूर एक्सप्रेस न्यूज** सोलापूर येथे बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांड्यांच्या किटचे वितरण करताना गोडाउनवर काही प्रायव्हेट ठेकेदारांकडून हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जात असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कामगारांना बसण्यासाठी जागा नाही, उभे राहण्यासाठीही योग्य व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठीही कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. कामगारांशी अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक केली जात असून त्यांचा सन्मान राखला जात नसल्याची नाराजी कामगारांनी व्यक्त केली आहे. भारत हा कामगारांचा देश आहे आणि सोलापूर ही चार हुतात्म्यांची भूमी आहे, जे गिरणी कामगार होते. त्यामुळे कामगारांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र काही प्रायव्हेट ठेकेदारांना कामगारांची काळजी नसून फक्त टेंडर घेण्याचीच घाई दिसून येत असल्याची टीका कामगारांनी केली आहे. याशिवाय गोडाउन परिसरात व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात येत असून व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांशी आक्रमक पद्धतीने वागण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कामगारांना योग्य सन्मान देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनावर राहील, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत1