प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘अंजनी दस्तक २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! लातूर | प्रतिनिधी आर.जे. फिल्म प्रोडक्शन, लातूरच्या बॅनरखाली निर्मित गाजलेल्या ‘अंजनी दस्तक’ या हॉरर वेब सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘अंजनी दस्तक २ : द घोस्ट ऑफ पास्ट’ या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या भागाने आपल्या रहस्यमय कथानक, भयावह वातावरण आणि प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षकांची मने जिंकली. लातूरमध्ये झालेल्या प्रदर्शनावेळी या वेब सीरिजला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सोशल मीडियासह विविध माध्यमांतून दुसऱ्या भागाची सातत्याने मागणी होत होती. अखेर प्रेक्षकांच्या प्रेमाचा मान राखत निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. या वेब सीरिजचे निर्माते रतनराज जवळगेकर आणि रोहिणी जवळगेकर असून, कथा, पटकथा व दिग्दर्शनाची धुरा मिथिलेश जवळगेकर यांनी सांभाळली आहे. पहिल्या भागाचे छायाचित्रण विशाल कांबळे यांनी केले होते. या वेब सीरिजमध्ये मिथिलेश जवळगेकर, आसिन जवळगेकर, पश्मिना जवळगेकर, प्रतीक्षा, नील, सायली कसबे आणि विशाल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच संपूर्ण प्रकल्पासाठी अतिश कांबळे मायकल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे, आर.जे. फिल्म प्रोडक्शनने यापूर्वी साकारलेला ‘रक्षक’ हा लघुपट ‘माझी कुटुंब, माझी जबाबदारी’ या स्पर्धेत लातूर जिल्ह्यात विजेता ठरला होता. त्यामुळे या निर्मिती संस्थेच्या प्रत्येक नव्या प्रकल्पाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष असते. पोस्टरमधील "The Past Is Calling Again..." ही टॅगलाईन आणि भयावह दृश्यरचना पाहता ‘अंजनी दस्तक २’ हा भाग पहिल्यापेक्षाही अधिक थरारक, रहस्यमय आणि रोमांचकारी असणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. ‘अंजनी दस्तक २ : द घोस्ट ऑफ पास्ट’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तिच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव ‘अंजनी दस्तक २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! लातूर | प्रतिनिधी आर.जे. फिल्म प्रोडक्शन, लातूरच्या बॅनरखाली निर्मित गाजलेल्या ‘अंजनी दस्तक’ या हॉरर वेब सीरिजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘अंजनी दस्तक २ : द घोस्ट ऑफ पास्ट’ या दुसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या भागाने आपल्या रहस्यमय कथानक, भयावह वातावरण आणि प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षकांची मने जिंकली. लातूरमध्ये झालेल्या प्रदर्शनावेळी या वेब सीरिजला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सोशल मीडियासह विविध माध्यमांतून दुसऱ्या भागाची सातत्याने मागणी होत होती. अखेर प्रेक्षकांच्या प्रेमाचा मान राखत निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. या वेब सीरिजचे निर्माते रतनराज जवळगेकर आणि रोहिणी जवळगेकर असून, कथा, पटकथा व दिग्दर्शनाची धुरा मिथिलेश जवळगेकर यांनी सांभाळली आहे. पहिल्या भागाचे छायाचित्रण विशाल कांबळे यांनी केले होते. या वेब सीरिजमध्ये मिथिलेश जवळगेकर, आसिन जवळगेकर, पश्मिना जवळगेकर, प्रतीक्षा, नील, सायली कसबे आणि विशाल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसेच संपूर्ण प्रकल्पासाठी अतिश कांबळे मायकल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. विशेष म्हणजे, आर.जे. फिल्म प्रोडक्शनने यापूर्वी साकारलेला ‘रक्षक’ हा लघुपट ‘माझी कुटुंब, माझी जबाबदारी’ या स्पर्धेत लातूर जिल्ह्यात विजेता ठरला होता. त्यामुळे या निर्मिती संस्थेच्या प्रत्येक नव्या प्रकल्पाकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष असते. पोस्टरमधील "The Past Is Calling Again..." ही टॅगलाईन आणि भयावह दृश्यरचना पाहता ‘अंजनी दस्तक २’ हा भाग पहिल्यापेक्षाही अधिक थरारक, रहस्यमय आणि रोमांचकारी असणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. ‘अंजनी दस्तक २ : द घोस्ट ऑफ पास्ट’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तिच्या प्रदर्शनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.1