लेखी आश्वासनानंतर स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे लाक्षणिक उपोषण स्थगित जयसिंगपूर / प्रतिनिधी जयसिंगपूर शहरातील नागरिकांवरील घरफाळ्यावरील २ टक्के शास्ती (दंड) रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वराज्यक्रांती जनआंदोलनच्या वतीने सुरू करण्यात आलेले लाक्षणिक उपोषण मंगळवार, दि. १० मार्च रोजी नगरपरिषदेच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जयसिंगपूर शहरातील नागरिकांना घरफाळ्यावरील २ टक्के शास्ती रद्द करावी या मागणीसाठी दि. ३ डिसेंबर २०२४ पासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्यानंतर हे आंदोलन धरणे आंदोलनाच्या स्वरूपात तब्बल १०० दिवस सुरू ठेवण्यात आले होते. या जनआंदोलनाची दखल घेत शासनाने दि. १९ मे २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार प्रोत्साहनात्मक अभय योजना लागू केली. मात्र या योजनेचा जयसिंगपूर शहरातील नागरिकांना अपेक्षित आणि मोठ्या प्रमाणात फायदा झालेला नसल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली होती.या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. १० मार्च रोजी पुन्हा लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.यावेळी जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासोबत आंदोलकांची बैठक झाली.या बैठकीत नगरपरिषद क्षेत्रातील थकित मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुलीसाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रे आणि विविध माध्यमांद्वारे प्रयत्न सुरू असल्याचे नगरपरिषदेकडून तोंडी व लेखी आश्वासन देण्यात आले. नगरपरिषदेच्या या लेखी आश्वासनानंतर स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे मंगळवार, दि. १० मार्चपासून सुरू असलेले लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे आदमभाई मुजावर यांनी सांगितले.या बैठकीस शिरोळ विकास आघाडीचे नगरपरिषद पक्षप्रतोद संजय पाटील कोथळीकर, मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने निवेदक आदमभाई मुजावर आणि स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे शिरोळ तालुकाध्यक्ष गजानन पवार यांनी नगरपरिषदेचे पत्र स्वीकारले.दरम्यान, जयसिंगपूर शहरातील नागरिकांनी घरफाळ्यावरील दंडमाफीसाठी नगरपरिषदेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही आदमभाई मुजावर यांनी केले आहे.
लेखी आश्वासनानंतर स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे लाक्षणिक उपोषण स्थगित जयसिंगपूर / प्रतिनिधी जयसिंगपूर शहरातील नागरिकांवरील घरफाळ्यावरील २ टक्के शास्ती (दंड) रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वराज्यक्रांती जनआंदोलनच्या वतीने सुरू करण्यात आलेले लाक्षणिक उपोषण मंगळवार, दि. १० मार्च रोजी नगरपरिषदेच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जयसिंगपूर शहरातील नागरिकांना घरफाळ्यावरील २ टक्के शास्ती रद्द करावी या मागणीसाठी दि. ३ डिसेंबर २०२४ पासून आंदोलन सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र प्रकृती खालावल्यानंतर हे आंदोलन धरणे आंदोलनाच्या स्वरूपात तब्बल १०० दिवस सुरू ठेवण्यात आले होते. या जनआंदोलनाची दखल घेत शासनाने दि. १९ मे २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार प्रोत्साहनात्मक अभय योजना लागू केली. मात्र या योजनेचा जयसिंगपूर शहरातील नागरिकांना अपेक्षित आणि मोठ्या प्रमाणात फायदा झालेला नसल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली होती.या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. १० मार्च रोजी पुन्हा लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले.यावेळी जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांच्यासोबत आंदोलकांची बैठक झाली.या बैठकीत नगरपरिषद क्षेत्रातील थकित मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसुलीसाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच या योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रे आणि विविध माध्यमांद्वारे प्रयत्न सुरू असल्याचे नगरपरिषदेकडून तोंडी व लेखी आश्वासन देण्यात आले. नगरपरिषदेच्या या लेखी आश्वासनानंतर स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे मंगळवार, दि. १० मार्चपासून सुरू असलेले लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे आदमभाई मुजावर यांनी सांगितले.या बैठकीस शिरोळ विकास आघाडीचे नगरपरिषद पक्षप्रतोद संजय पाटील कोथळीकर, मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. आंदोलकांच्या वतीने निवेदक आदमभाई मुजावर आणि स्वराज्यक्रांती जनआंदोलनचे शिरोळ तालुकाध्यक्ष गजानन पवार यांनी नगरपरिषदेचे पत्र स्वीकारले.दरम्यान, जयसिंगपूर शहरातील नागरिकांनी घरफाळ्यावरील दंडमाफीसाठी नगरपरिषदेकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही आदमभाई मुजावर यांनी केले आहे.
- हातकणंगले पंचायत समिती सभापतीपदी अश्विनी बिरंजे,उपसभापतीपदी संतोष कांबळे बिनविरोध,आवाडे गटाचे वर्चस्व कुंभोज / प्रतिनिधी हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आलेल्या आवाडे गटाच्या कट्टर समर्थक अश्विनी अनिल बिरंजे यांची बिनविरोध निवड झाली.तर आळते पंचायत समिती मतदार संघातून निवडून आलेले इंगवले गटाचे समर्थक संतोष कांबळे (शिवसेना शिंदे गट) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.सभापती पदासाठी अश्विनी बिरंजे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.त्यानंतर उपसभापती पदासाठी संतोष कांबळे यांच्या नावावर सदस्यांनी एकमत दर्शविल्याने त्यांची निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगलेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर तसेच गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी काम पाहिले.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ.सुजित मिणचेकर,आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले,राजू इंगवले,किरण इंगवले, झाकीर भालदार,वडगाव बाजार समितीचे संचालक नितीन चव्हाण,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी,पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर नूतन सभापती अश्विनी बिरंजे व उपसभापती संतोष कांबळे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.पंचायत समिती क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,या निवड प्रक्रियेनंतर जनसुराज्य पक्षाच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.1
- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावामध्ये दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅगेमध्ये भरली. मात्र घराशेजारील युवकाच्या सतर्कतेमुळे चोराला दारातच अडवण्यात आले. गल्लीतील नागरिक जमा झाल्यानंतर चोराने चोरीची कबुली देत चोरलेले साहित्य परत केले. घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोराला ताब्यात घेतले. या घटनेमुळे शिरढोण गावात मोठी खळबळ उडाली आहे.1
- Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज1
- सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.1
- मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1
- सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते1
- Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र1