नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठे अंतरवालीत दाखल होणार. -मराठा सेवक श्याम पाटील वडजे. २९ ऑगस्टच्या निर्णायक आंदोलनासाठी मराठा सेवकांची जिल्हाभर जोरदार तयारी; गावभेटी, बैठका आणि जनजागृतीला वेग. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवकांनी जिल्हाभर कंबर कसली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये गावभेटी, समाजबांधवांच्या बैठका, जनजागृती आणि विविध माध्यमांतून आंदोलनाचा प्रचार-प्रसार केला असून, नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरापर्यंत गरजवंत मराठ्यांनी २९ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहणार आहेत,यासाठी मराठा सेवकांकडून सातत्याने आवाहन केले जात होते.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल जिल्ह्यातील समाजबांधवांमध्ये आजही तितकीच तळमळ आणि आस्था असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत होते. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून गरजवंत मराठ्यांच्या न्याय्य हक्कांचा आणि समाजाच्या एकजुटीचा लढा आहे, अशी भावना समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे. आपल्या एकीची ताकद दाखवत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील गावखेड्यातील मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने अंतरवालीच्या दिशेने कूच करणार असल्याचा विश्वास मराठा सेवकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या समस्या, नोकरीविषयक अडचणी, कुणबी प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्राची वैधता, सारथी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाशी संबंधित अडचणी असलेल्या समाजबांधवांनी आपल्या समस्यांचे कागदपत्रे व पुराव्यांसह २८ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तर, ज्यांना कोणत्याही वैयक्तिक समस्या नाहीत, अशा सर्व समाजबांधवांनीही मराठा समाजाच्या एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत अंतरवाली सराटी येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करत. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावातून मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आंदोलनाला बळ द्यावे, एकजुटीची ताकद दाखवावी आणि आपल्या हक्कांसाठीचा आवाज बुलंद करावा, अशी अपेक्षा नांदेड जिल्हा समन्वयक मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी व्यक्त केली आहे.
नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठे अंतरवालीत दाखल होणार. -मराठा सेवक श्याम पाटील वडजे. २९ ऑगस्टच्या निर्णायक आंदोलनासाठी मराठा सेवकांची जिल्हाभर जोरदार तयारी; गावभेटी, बैठका आणि जनजागृतीला वेग. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवकांनी जिल्हाभर कंबर कसली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये गावभेटी, समाजबांधवांच्या बैठका, जनजागृती आणि विविध माध्यमांतून आंदोलनाचा प्रचार-प्रसार केला असून, नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागापासून शहरापर्यंत गरजवंत मराठ्यांनी २९ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहणार आहेत,यासाठी मराठा सेवकांकडून सातत्याने आवाहन केले जात होते.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल जिल्ह्यातील समाजबांधवांमध्ये आजही तितकीच तळमळ आणि आस्था असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत होते. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून गरजवंत मराठ्यांच्या न्याय्य हक्कांचा आणि समाजाच्या एकजुटीचा लढा आहे, अशी भावना समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे. आपल्या एकीची ताकद दाखवत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील गावखेड्यातील मराठा समाज पुन्हा एकदा मोठ्या संख्येने अंतरवालीच्या दिशेने कूच करणार असल्याचा विश्वास मराठा सेवकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या समस्या, नोकरीविषयक अडचणी, कुणबी प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्राची वैधता, सारथी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाशी संबंधित अडचणी असलेल्या समाजबांधवांनी आपल्या समस्यांचे कागदपत्रे व पुराव्यांसह २८ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तर, ज्यांना कोणत्याही वैयक्तिक समस्या नाहीत, अशा सर्व समाजबांधवांनीही मराठा समाजाच्या एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत अंतरवाली सराटी येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करत. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावातून मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आंदोलनाला बळ द्यावे, एकजुटीची ताकद दाखवावी आणि आपल्या हक्कांसाठीचा आवाज बुलंद करावा, अशी अपेक्षा नांदेड जिल्हा समन्वयक मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी व्यक्त केली आहे.
- 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes1
- [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न नांदेड: लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. [26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो1
- भारतीय मार्केट मध्ये पुन्हा नव्याने नवीन भोंदू बाबा निर्माण झाले... .1
- गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .1
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1
- जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती1
- *ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त मुजीब भाई मित्र मंडळाचे विविध सामाजिक उपक्रम* नांदेड शहरातील ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या पवित्र दिनाचे औचित्य साधून मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच शहरात ईद-ए-मिलादचा उत्साह दिसून येत होता. शहरातील मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर मुजीब भाई मित्र मंडळाने शहरातील मुख्य चौकात सेवा उपक्रमाला सुरुवात केली. मानवतेचा संदेश देण्यासाठी मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन रक्तदान केले. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसाठी आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी मुजीब भाई मित्र मंडळाच्या वतीने पाणी बॉटल, बुंदीचे लाडू आणि पार्ले बिस्किटाचे वाटप करण्यात आले. उन्हाची तमा न बाळगता आलेल्या प्रत्येक भाविकाला थंड पाण्याची बॉटल आणि प्रसाद म्हणून बुंदी लाडू देण्यात आला, तर लहान मुलांना आवडीने पार्ले बिस्कीट वाटण्यात आले. मुजीब भाई आणि त्यांच्या सर्व मित्रांनी दिवसभर स्वतः उभे राहून हे वाटप केले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. शांततेत आणि सेवाभावाने सण साजरा करून मुजीब भाई मित्र मंडळाने पैगंबर साहेबांच्या शिकवणीचा आदर्श जपला आहे.1