logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा शहापूरचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न कोकण मराठी साहित्य परिषद शाखा शहापूरचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी कुणबी समाज संघ सभागृह शहापूर येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जेष्ठ कवी व साहित्यिक प्रा.अशोक बागवे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.कोमसाप जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला अनेक रसिकांनी उपस्थिती दर्शवली. या सोहळ्यासाठी कुणबी समाज संघाचे अध्यक्ष श्री किशोर कुडव,सा. रानभरारीचे संपादक श्री शंकर खाडे,शहापूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे,ज्ञानसाधना महा विद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. राजेंद्र वेखंडे,कोमसाप शहापूर तालुका अध्यक्ष विजयकुमार देसले तसेच ठाणे,मुरबाड व कळवा शाखेतील विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रथमतः प्रा.अशोक बागवे सर व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोमसाप शहापूर शाखा नूतन कार्यकरिणीच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.बाळ कांदळकर यांनी २०२६ ते २०२९ या तीन वर्षासाठी अध्यक्ष विजयकुमार देसले,कार्याध्यक्ष सुभाष शिंदे,उपाध्यक्ष नारायण दरोडा, सचिव जयराम मांजरे, सहसचिव राजेंद्र हेंद्रे,जिल्हा प्रतिनिधी रमेश तारमळे, कोषाध्यक्ष चंदन फुलपगार, सह कोषाध्यक्ष अर्जुन बांबेरे,अं.हिशोब तपासनीस स्वागत विशे, कार्य.सदस्य म्हणून सुजाता धानके,निखिल मोंडूळा, मुकेश विशे,सल्लागार प्रेरणा शेलवले,मुकेश दामोदरे यांची निवड घोषित केली. नवनिर्वाचित कोमसाप शहापूर तालुका अध्यक्ष विजयकुमार देसले यांनी प्रास्ताविक सादर करताना आतापर्यंत सहकाऱ्यांसोबत केलेल्या साहित्यिक कार्याचा सर्वांना परिचय करुन दिला.भविष्यात शहापुरात एखादे साहित्य संमेलन करण्याची इच्छा व्यक्त केली.वाचन संस्कृती टिकली पाहिजे यासाठी भविष्यात तालुक्यामध्ये नानाविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.सर्वांना सोबत घेऊन मराठी भाषा संवर्धनासाठी व साहित्य क्षेत्रात विशेष योगदान देणार असल्याची भावना व्यक्त केली. कवी अर्जुन बांबे सर यांनी काव्यसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले.काव्य संमेलनात 'मराठी असे आमची मायबोली' या विषयावर १५ कवींचे सादरीकरण झाले. सर्व कवींना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.ज्ञानसाधना महाविद्यालयाचे मा. उपप्राचार्य डॉ.राजेश वेखंडे सर,साप्ता.रानभरारीचे संपादक शंकर खाडे यांनी विजयकुमार देसले सरांवर मोठी जबाबदारी पडली आहे व ते यशस्वीपणे पार पाडतील अशी भावना व्यक्त करत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे यांनी कोमसापच्या माध्यमातून लावलेले हे छोटेसे रोपटे भविष्यात वटवृक्ष होईल असा आशावाद व्यक्त करत विजयकुमार देसले व संपूर्ण टीमच्या नियोजनाचे कौतुक केले.कुणबी समाज संघाचे अध्यक्ष किशोर कुडव यांनी विजयकुमार देसले यांची निवड म्हणजे योग्य साहित्यिकाची निवड केली आहे अशी भावना व्यक्त करत नेहमीच या मंडळाला सहकार्य करण्याचे जाहीर केले. कोमसाप ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर सर यांनी नवोदितांना व्यासपीठ मिळावे यासाठी या शाखा काढल्या जातात.रसिकांनी बिनधास्त दाद देऊन या मंडळींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले. शाखा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य झाल्याबद्दल सर्व पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्रा.अशोक बागवे सर यांनी कवितेतील अनेक गंमती जमती सांगत रसिकांना पोट धरुन हसवले. कविता नावाची गोष्ट हृदयात गेली पाहिजे. आशय महत्वाचा आहे. विषयावर कविता नसते.कवी अंतरीचे बघतो. सल,वेदना सलत असेल तर अस्सल निर्माण होतं.शल्य असेल तर कौशल्य निर्माण होते.उघडं सौंदर्य मादक असतं तर आतलं सौंदर्य मोहक असतं असे कवितेबद्दल मार्मिक विचार सर्वांच्या मनाला भिडले."धनी चालला पुढे,सजनी त्याच्या मागे मागं मागं" ही कविता सादर करत रसिकांची दाद मिळवली. नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे मुकेश दामोदरे सर व जयराम मांजरे सर यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत भरली. प्रेरणा शेलवले यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.या संपूर्ण कार्यक्रमासाठी कोमसापच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

2 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
f19e026f-1240-4483-b735-bf9d93d1a19a

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा शहापूरचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न कोकण मराठी साहित्य परिषद शाखा शहापूरचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी कुणबी समाज संघ सभागृह शहापूर येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध जेष्ठ कवी व साहित्यिक प्रा.अशोक बागवे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.कोमसाप जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला अनेक रसिकांनी उपस्थिती दर्शवली. या सोहळ्यासाठी कुणबी समाज संघाचे अध्यक्ष श्री किशोर कुडव,सा. रानभरारीचे संपादक श्री शंकर खाडे,शहापूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे,ज्ञानसाधना महा विद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. राजेंद्र वेखंडे,कोमसाप शहापूर तालुका अध्यक्ष विजयकुमार देसले तसेच ठाणे,मुरबाड व कळवा शाखेतील विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रथमतः प्रा.अशोक बागवे सर व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोमसाप शहापूर शाखा नूतन कार्यकरिणीच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.बाळ कांदळकर यांनी २०२६ ते २०२९ या तीन वर्षासाठी अध्यक्ष विजयकुमार देसले,कार्याध्यक्ष सुभाष शिंदे,उपाध्यक्ष नारायण दरोडा, सचिव जयराम मांजरे, सहसचिव राजेंद्र हेंद्रे,जिल्हा प्रतिनिधी रमेश तारमळे, कोषाध्यक्ष चंदन फुलपगार, सह कोषाध्यक्ष अर्जुन बांबेरे,अं.हिशोब तपासनीस स्वागत विशे, कार्य.सदस्य म्हणून सुजाता धानके,निखिल मोंडूळा, मुकेश विशे,सल्लागार प्रेरणा शेलवले,मुकेश दामोदरे यांची निवड घोषित केली. नवनिर्वाचित कोमसाप शहापूर तालुका अध्यक्ष विजयकुमार देसले यांनी प्रास्ताविक सादर करताना आतापर्यंत सहकाऱ्यांसोबत केलेल्या साहित्यिक कार्याचा सर्वांना परिचय करुन दिला.भविष्यात शहापुरात एखादे साहित्य संमेलन करण्याची इच्छा व्यक्त केली.वाचन संस्कृती टिकली पाहिजे यासाठी भविष्यात तालुक्यामध्ये नानाविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.सर्वांना सोबत घेऊन मराठी भाषा संवर्धनासाठी व साहित्य क्षेत्रात विशेष योगदान देणार असल्याची भावना व्यक्त केली. कवी अर्जुन बांबे सर यांनी काव्यसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले.काव्य संमेलनात 'मराठी असे आमची मायबोली' या विषयावर १५ कवींचे सादरीकरण झाले. सर्व कवींना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व बुके देऊन सन्मानित करण्यात आले.ज्ञानसाधना महाविद्यालयाचे मा. उपप्राचार्य डॉ.राजेश वेखंडे सर,साप्ता.रानभरारीचे संपादक शंकर खाडे यांनी विजयकुमार देसले सरांवर मोठी जबाबदारी पडली आहे व ते यशस्वीपणे पार पाडतील अशी भावना व्यक्त करत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे यांनी कोमसापच्या माध्यमातून लावलेले हे छोटेसे रोपटे भविष्यात वटवृक्ष होईल असा आशावाद व्यक्त करत विजयकुमार देसले व संपूर्ण टीमच्या नियोजनाचे कौतुक केले.कुणबी समाज संघाचे अध्यक्ष किशोर कुडव यांनी विजयकुमार देसले यांची निवड म्हणजे योग्य साहित्यिकाची निवड केली आहे अशी भावना व्यक्त करत नेहमीच या मंडळाला सहकार्य करण्याचे जाहीर केले. कोमसाप ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर सर यांनी नवोदितांना व्यासपीठ मिळावे यासाठी या शाखा काढल्या जातात.रसिकांनी बिनधास्त दाद देऊन या मंडळींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले. शाखा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य झाल्याबद्दल सर्व पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्रा.अशोक बागवे सर यांनी कवितेतील अनेक गंमती जमती सांगत रसिकांना पोट धरुन हसवले. कविता नावाची गोष्ट हृदयात गेली पाहिजे. आशय महत्वाचा आहे. विषयावर कविता नसते.कवी अंतरीचे बघतो. सल,वेदना सलत असेल तर अस्सल निर्माण होतं.शल्य असेल तर कौशल्य निर्माण होते.उघडं सौंदर्य मादक असतं तर आतलं सौंदर्य मोहक असतं असे कवितेबद्दल मार्मिक विचार सर्वांच्या मनाला भिडले."धनी चालला पुढे,सजनी त्याच्या मागे मागं मागं" ही कविता सादर करत रसिकांची दाद मिळवली. नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे मुकेश दामोदरे सर व जयराम मांजरे सर यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत भरली. प्रेरणा शेलवले यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.या संपूर्ण कार्यक्रमासाठी कोमसापच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
    1
    सायदे ग्रामपंचायत हद्दीत मौजे जोगलवाडी,शेळकेवाडी राजेवाडी या गावांमध्ये जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून एकाच आठवड्यात चार जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.याच गावांमध्ये अनेक जनावरे साथीच्या रोगाने ग्रस्त असून यांच्यात फऱ्याला सूज येणे,पोट फुगणे,गळा सुजणे,लघवी अटकने ताप येणे असे आजार जाणवत आहेत.यामुळे बळीराजाचे पशुधन संकटात सापडले असून त्वरित लसीकरण करून दगावलेल्या जनावरांची शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा करत आहेत.
जोगलवाडी येथील शेतकरी भीमराव सरकते 1, ठकुबाई गोंदके 1, राजेवाडी येथील निवृत्ती निकम.1, चंद्रकांत घाटाळ.1, कोंडाजी ठोंमरे.1, यांची प्रत्येकी,1, एकूण 4, जनावरे दगावली असून संपूर्ण गाव परिसरात अनेक जनावरांना या साथीची लागण झाली आहे.दरम्यान पशु वैद्यकीय डॉक्टर यांनी त्वरित भेट देऊन गावातील सर्व जनावरांना लस देण्याचे काम चालू केले आहे.तर गंभीर अवस्थेत असलेली एकूण तीन जनावरांवर उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आजाराची लागण अनेक गाव पाड्यावरील परिसरात असून यात करोळ, पाचघर, किनिस्ते,आडोशी पाथर्डी सूर्यमाळ,गोमघर सायदे या गावांमध्ये देखील जनावरांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने त्याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत पशुपालन शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    18 min ago
  • गांवों में हिंदू जागरूकता समय की आवश्यकता है। ठाणे ग्रामीण-अखिल आर्यवत संघ, आंतरराष्ट्रीय बजरंग दल द्वारा आयोजित विराट हिंदू एकता सम्मेलन दिनांक 10 जानेवारी शनिवार की देर शाम अंतरराष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटिल के नेतृत्व में पोद्दार समृद्धि क्लब हाउस में आयोजित किया गया। इस अवसर पर रायगढ़ जिले के रसानी खालापुर के अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के कार्यकर्ता उपस्थित थे। इस अवसर पर विद्यार्थी कक्षा के छोटे बच्चों के लिए हनुमान चालीसा मंत्र का पाठ, सुंदरकांड, महा आरती, श्री राम नाम भजन और प्रश्नोत्तर जैसे विशेष कार्यक्रम आयोजित किए गए। कार्यक्रम का समापन उन्हें प्रमाण पत्र और पुरस्कार देकर किया गया। प्रश्नोत्तर सत्र में प्रथम, द्वितीय और तृतीय स्थान प्राप्त करने वाले तथा कार्यक्रम में भाग लेने वाले विद्यार्थियों को दिनेश पाटिल द्वारा प्रमाण पत्र प्रदान किए गए। उन्हें सम्मानित किया गया इस समय दिनेश पाटिल मंच से बोल रहे थे कि देश में हिंदू जागरूक हो रहे हैं, हिंदुओं को जगाने के लिए आंतरराष्ट्रीय बजरंग दल के कार्यकर्ता गांव-गांव जा रहे हैं और लोगों को जागरूक कर रहे हैं। बदलापुर में आयोजित यह कार्यक्रम दिखावे या सजावट के लिए नहीं है, बल्कि हिंदू भाइयों को एकजुट करने के लिए है और यह एक चिंगारी है। ऐसा कार्यक्रम आज के समय की जरूरत है, आज गांवों में जागरूकता पैदा करना बहुत आसान है। ऐसे कार्यक्रम आयोजित करने के लिए पैसे की जरूरत नहीं है, अगर सभी हिंदू एक साथ आ जाएं तो यह सफल होगा। अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटिल ने श्रोताओं को संबोधित करते हुए कहा कि उस समय हिंदुओं ने अयोध्या में बाबरी मस्जिद को ध्वस्त कर दिया था, और हिंदू धर्म के चहेते नेता बालासाहेब ठाकरे ने स्वयं यह दृढ़ रुख अपनाया था कि बालासाहेब ठाकरे ही देश में एकमात्र ऐसे व्यक्ति थे जिन्होंने यह स्वीकार किया और जिम्मेदारी ली कि बाबरी मस्जिद को हम हिंदुओं ने ध्वस्त किया था। इस अवसर पर कोंकण प्रांत मंत्री सचिन धुले, विशाल जयसवाल, रायगढ़ जिला अध्यक्ष बाबू भोईर, मावल लोकसभा अध्यक्ष राकेश खराडे, जनार्दन मालुसरे, ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष राकेश टेम्बे, चेतन जामगरे, संचार प्रमुख महेंद्र, मलेश गुडसे, प्रशांत तम्बोली, प्रदीप गुप्ता, दुर्गाशक्ति पोद्दार, जयसवाल ठक्कर और अन्य उपस्थित थे।# @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhai11 जनवरी 2026 #Aligarh #PressConference #ModiJi #AmitShahJi #YogiJi #BulldozerAction #HinduSamaj #NationFirst #jaishriram Dinesh Patil Dinesh Patil Dinesh Patil HinduPravin Togadia
    1
    गांवों में हिंदू जागरूकता समय की आवश्यकता है।
ठाणे ग्रामीण-अखिल आर्यवत संघ, आंतरराष्ट्रीय बजरंग दल द्वारा आयोजित विराट हिंदू एकता सम्मेलन दिनांक 10 जानेवारी शनिवार की देर शाम अंतरराष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटिल के नेतृत्व में पोद्दार समृद्धि क्लब हाउस में आयोजित किया गया। इस अवसर पर रायगढ़ जिले के रसानी खालापुर के अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के कार्यकर्ता उपस्थित थे।
इस अवसर पर विद्यार्थी कक्षा के छोटे बच्चों के लिए हनुमान चालीसा मंत्र का पाठ, सुंदरकांड, महा आरती, श्री राम नाम भजन और प्रश्नोत्तर जैसे विशेष कार्यक्रम आयोजित किए गए। कार्यक्रम का समापन उन्हें प्रमाण पत्र और पुरस्कार देकर किया गया। प्रश्नोत्तर सत्र में प्रथम, द्वितीय और तृतीय स्थान प्राप्त करने वाले तथा कार्यक्रम में भाग लेने वाले विद्यार्थियों को दिनेश पाटिल द्वारा प्रमाण पत्र प्रदान किए गए।
उन्हें सम्मानित किया गया
इस समय दिनेश पाटिल मंच से बोल रहे थे कि देश में हिंदू जागरूक हो रहे हैं, हिंदुओं को जगाने के लिए आंतरराष्ट्रीय बजरंग दल के कार्यकर्ता गांव-गांव जा रहे हैं और लोगों को जागरूक कर रहे हैं। बदलापुर में आयोजित यह कार्यक्रम दिखावे या सजावट के लिए नहीं है, बल्कि हिंदू भाइयों को एकजुट करने के लिए है और यह एक चिंगारी है। ऐसा कार्यक्रम आज के समय की जरूरत है, आज गांवों में जागरूकता पैदा करना बहुत आसान है। ऐसे कार्यक्रम आयोजित करने के लिए पैसे की जरूरत नहीं है, अगर सभी हिंदू एक साथ आ जाएं तो यह सफल होगा।
अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटिल ने श्रोताओं को संबोधित करते हुए कहा कि उस समय हिंदुओं ने अयोध्या में बाबरी मस्जिद को ध्वस्त कर दिया था, और हिंदू धर्म के चहेते नेता बालासाहेब ठाकरे ने स्वयं यह दृढ़ रुख अपनाया था कि बालासाहेब ठाकरे ही देश में एकमात्र ऐसे व्यक्ति थे जिन्होंने यह स्वीकार किया और जिम्मेदारी ली कि बाबरी मस्जिद को हम हिंदुओं ने ध्वस्त किया था।
इस अवसर पर कोंकण प्रांत मंत्री सचिन धुले, विशाल जयसवाल, रायगढ़ जिला अध्यक्ष बाबू भोईर, मावल लोकसभा अध्यक्ष राकेश खराडे, जनार्दन मालुसरे, ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष राकेश टेम्बे, चेतन जामगरे, संचार प्रमुख महेंद्र, मलेश गुडसे, प्रशांत तम्बोली, प्रदीप गुप्ता, दुर्गाशक्ति पोद्दार, जयसवाल ठक्कर और अन्य उपस्थित थे।# @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm  Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhai11 जनवरी 2026
#Aligarh
#PressConference
#ModiJi
#AmitShahJi
#YogiJi
#BulldozerAction
#HinduSamaj
#NationFirst
#jaishriram Dinesh Patil Dinesh Patil Dinesh Patil HinduPravin Togadia
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician Shahapur, Thane•
    23 hrs ago
  • Post by महाराष्ट्र सरकार
    1
    Post by महाराष्ट्र सरकार
    user_महाराष्ट्र सरकार
    महाराष्ट्र सरकार
    वसई, पालघर, महाराष्ट्र•
    9 min ago
  • Post by महाराष्ट्र सरकार एवं भारत सरकार
    1
    Post by महाराष्ट्र सरकार एवं भारत सरकार
    user_महाराष्ट्र सरकार एवं भारत सरकार
    महाराष्ट्र सरकार एवं भारत सरकार
    Vasai, Palghar•
    1 hr ago
  • मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में हमेशा लगा रहता है जाम ।
    1
    मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में  हमेशा लगा रहता है जाम  ।
    user_शिवानन्द चौहान सच इंडिया न्यूज़ 24 live
    शिवानन्द चौहान सच इंडिया न्यूज़ 24 live
    Reporter मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ खाना दान करे.. Gpay -7972978726
    1
    मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ
खाना दान करे.. Gpay -7972978726
    user_Prithvi Sanstha
    Prithvi Sanstha
    AC Repair Mumbai, Maharashtra•
    6 hrs ago
  • नवी मुंबई में पैसे बांटते हुए एक शख्स पकड़ा गया, शिवसेना और भाजपा कार्यकर्ताओं के बीच झड़पें हुईं। नवी मुंबई के वार्ड नंबर 11 में भाजपा कार्यकर्ता शिव सेना कार्यकर्ताओं पर पैसे बांटने का आरोप में मारपीट की एक घटना सामने आई है। #viral #viralreels #election #newmumbai
    1
    नवी मुंबई में पैसे बांटते हुए एक शख्स पकड़ा गया, शिवसेना और भाजपा कार्यकर्ताओं के बीच झड़पें हुईं। नवी मुंबई के वार्ड नंबर 11 में भाजपा कार्यकर्ता शिव सेना कार्यकर्ताओं पर पैसे बांटने का आरोप में मारपीट की एक घटना सामने आई है।
#viral #viralreels #election #newmumbai
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    16 hrs ago
  • Post by महाराष्ट्र सरकार
    1
    Post by महाराष्ट्र सरकार
    user_महाराष्ट्र सरकार
    महाराष्ट्र सरकार
    वसई, पालघर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.