जयस्तंभ आणि १.२५ एकर जमिनीवर जमादार-माळवदकर कुटुंबाचा कायमस्वरूपी ताबा पुणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; कायदेशीर प्रक्रियेशिवाय बेदखल करण्यास शासनाला मनाई BREAKING NEWS 📝 तेजस वाळुंज l पुणे जिल्हा प्रतिनिधी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभ आणि त्यालगतच्या जमिनीच्या ताब्याबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन वादात पुणे येथील जॉइंट सिव्हिल जज (सिनियर डिव्हिजन) अमोल शिंदे यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, पेरणे (ता. हवेली) येथील जयस्तंभ आणि त्यास लागून असलेल्या १.२५ एकर जमिनीचा ताबा जमादार-माळवदकर कुटुंबातील दोन घटकांच्या बाजूने कायम ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने राज्य शासन किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय याचिकाकर्त्यांना या जमिनीतून बेदखल करू नये तसेच त्यांच्या ताब्यात अडथळा आणू नये, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाचे प्रमुख निर्देश • कायदेशीर प्रक्रियेशिवाय बेदखल करू नये — शासनाला मनाई. • जयस्तंभ व १.२५ एकर जमिनीचा ताबा जमादार-माळवदकर कुटुंबाकडे कायम. • कॅप्टन बाळासाहेब जमादार-माळवदकर यांचा दावा तांत्रिक कारणास्तव फेटाळला. • “ऐतिहासिक वारसा जपण्याचा निर्णय” १८२२ मध्ये ब्रिटिशांनी उभारला जयस्तंभ • १ जानेवारी १८२८ रोजी झालेल्या कोरेगाव भीमा लढाईच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने १८२२ मध्ये जयस्तंभ हे लढाई स्मारक उभारले. • १३ डिसेंबर १८२८ रोजी जखमी झालेले सैनिक कोंडोजीबिन गाजाजी जमादार यांची जयस्तंभ प्रमुख (प्रभारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. • ब्रिटिशांकडून देण्यात आलेल्या ‘सनद’मध्ये कुटुंबातील पुरुष वारसदार अस्तित्वात असेपर्यंत जयस्तंभ आणि जमिनीचा ताबा कुटुंबाकडे राहण्याची तरतूद असल्याचा दावा जमादार कुटुंबाकडून करण्यात आला आहे. एका दाव्याला तांत्रिक कारणास्तव नकार • कॅप्टन बाळासाहेब जमादार-माळवदकर यांचा दावा तांत्रिक कारणास्तव फेटाळला. • कुटुंबातील इतर दोन घटकांच्या बाजूने निकाल. • कॅप्टन बाळासाहेब यांच्याकडे ब्रिटिशांनी दिलेल्या सनदीची मूळ प्रत असून, जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदविण्यासाठीचा अर्ज महसूल न्यायालयात प्रलंबित असल्याचे नमूद. “कुटुंबाच्या हक्कांचा आदराने विचार करावा,” — न्यायालय २०१५ पासून सुरू आहे वाद • २०१५ मध्ये ‘भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती’कडून ७/१२ उताऱ्यावर जमादार कुटुंबाचे नाव बेकायदेशीरपणे लावल्याचा आरोप. • दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या संख्येने येणारे जागा अपुरी पडत असल्याचा मुद्दा. • जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी. • शासनाकडून घर व शेती हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर एप्रिल २०१७ मध्ये राज्य शासन, BARTI आणि संबंधित समितीविरुद्ध नागरी दावा. उच्च न्यायालयाने दिले होते वेळेत निकालाचे निर्देश • मुंबई उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी कनिष्ठ न्यायालयाला प्रकरण एका वर्षाच्या आत निकाल काढण्याचे निर्देश दिले. • त्याप्रमाणे पुणे न्यायालयात सुनावणी होऊन हा आदेश देण्यात आला आहे. जयस्तंभाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे प्रकरण चर्चेत जमादार कुटुंबाची भूमिका... कोरेगाव भीमा लढाईत ब्रिटिश तसेच पेशव्यांच्या सैन्यात विविध जाती-समुदायांतील सैनिक सहभागी होते. त्यामुळे ही लढाई एका विशिष्ट जाती किंवा धर्माच्या चौकटीत पाहू नये. दलित-आंबेडकरी दृष्टिकोन दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो अनुयायी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. हा लढा शौर्याचा आणि ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. १ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जयस्तंभ परिसरातील १ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत शासनाकडून यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीचा आधार घेतला जात असल्याचेही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीत नमूद करण्यात आले आहे.
जयस्तंभ आणि १.२५ एकर जमिनीवर जमादार-माळवदकर कुटुंबाचा कायमस्वरूपी ताबा पुणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश; कायदेशीर प्रक्रियेशिवाय बेदखल करण्यास शासनाला मनाई BREAKING NEWS 📝 तेजस वाळुंज l पुणे जिल्हा प्रतिनिधी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभ आणि त्यालगतच्या जमिनीच्या ताब्याबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन वादात पुणे येथील जॉइंट सिव्हिल जज (सिनियर डिव्हिजन) अमोल शिंदे यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार, पेरणे (ता. हवेली) येथील जयस्तंभ आणि त्यास लागून असलेल्या १.२५ एकर जमिनीचा ताबा जमादार-माळवदकर कुटुंबातील दोन घटकांच्या बाजूने कायम ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने राज्य शासन किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय याचिकाकर्त्यांना या जमिनीतून बेदखल करू नये तसेच त्यांच्या ताब्यात अडथळा आणू नये, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाचे प्रमुख निर्देश • कायदेशीर प्रक्रियेशिवाय बेदखल करू नये — शासनाला मनाई. • जयस्तंभ व १.२५ एकर जमिनीचा ताबा जमादार-माळवदकर कुटुंबाकडे कायम. • कॅप्टन बाळासाहेब जमादार-माळवदकर यांचा दावा तांत्रिक कारणास्तव फेटाळला. • “ऐतिहासिक वारसा जपण्याचा निर्णय” १८२२ मध्ये ब्रिटिशांनी उभारला जयस्तंभ • १ जानेवारी १८२८ रोजी झालेल्या कोरेगाव भीमा लढाईच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने १८२२ मध्ये जयस्तंभ हे लढाई स्मारक उभारले. • १३ डिसेंबर १८२८ रोजी जखमी झालेले सैनिक कोंडोजीबिन गाजाजी जमादार यांची जयस्तंभ प्रमुख (प्रभारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. • ब्रिटिशांकडून देण्यात आलेल्या ‘सनद’मध्ये कुटुंबातील पुरुष वारसदार अस्तित्वात असेपर्यंत जयस्तंभ आणि जमिनीचा ताबा कुटुंबाकडे राहण्याची तरतूद असल्याचा दावा जमादार कुटुंबाकडून करण्यात आला आहे. एका दाव्याला तांत्रिक कारणास्तव नकार • कॅप्टन बाळासाहेब जमादार-माळवदकर यांचा दावा तांत्रिक कारणास्तव फेटाळला. • कुटुंबातील इतर दोन घटकांच्या बाजूने निकाल. • कॅप्टन बाळासाहेब यांच्याकडे ब्रिटिशांनी दिलेल्या सनदीची मूळ प्रत असून, जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदविण्यासाठीचा अर्ज महसूल न्यायालयात प्रलंबित असल्याचे नमूद. “कुटुंबाच्या हक्कांचा आदराने विचार करावा,” — न्यायालय २०१५ पासून सुरू आहे वाद • २०१५ मध्ये ‘भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती’कडून ७/१२ उताऱ्यावर जमादार कुटुंबाचे नाव बेकायदेशीरपणे लावल्याचा आरोप. • दरवर्षी १ जानेवारी रोजी मोठ्या संख्येने येणारे जागा अपुरी पडत असल्याचा मुद्दा. • जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी. • शासनाकडून घर व शेती हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर एप्रिल २०१७ मध्ये राज्य शासन, BARTI आणि संबंधित समितीविरुद्ध नागरी दावा. उच्च न्यायालयाने दिले होते वेळेत निकालाचे निर्देश • मुंबई उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी कनिष्ठ न्यायालयाला प्रकरण एका वर्षाच्या आत निकाल काढण्याचे निर्देश दिले. • त्याप्रमाणे पुणे न्यायालयात सुनावणी होऊन हा आदेश देण्यात आला आहे. जयस्तंभाच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे प्रकरण चर्चेत जमादार कुटुंबाची भूमिका... कोरेगाव भीमा लढाईत ब्रिटिश तसेच पेशव्यांच्या सैन्यात विविध जाती-समुदायांतील सैनिक सहभागी होते. त्यामुळे ही लढाई एका विशिष्ट जाती किंवा धर्माच्या चौकटीत पाहू नये. दलित-आंबेडकरी दृष्टिकोन दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो अनुयायी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. हा लढा शौर्याचा आणि ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. १ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जयस्तंभ परिसरातील १ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेबाबत शासनाकडून यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीचा आधार घेतला जात असल्याचेही या प्रकरणाच्या पार्श्वभूमीत नमूद करण्यात आले आहे.
- को.ढव्यात घरफोडी करणाऱ्या ५९ वर्षीय महिलेच्या मुसक्या आवळल्या; ₹३.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त1
- "समाजाला न्याय मिळाला पाहिजे.., इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता..!"1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- बारामती सुपा घाटात विदयार्थ्यांची S T बस. पलटी घटनास्थळी युगेंद्र पावरांची भेट.1
- बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..1
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- "...त्याचे पैसे मिळाले नाहीत आणि आता दुष्काळ जाहीर करत नाही..!"1
- मुखेड घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात नागरिक आक्रमक; BDO यांना निवेदन मुखेड, नांदेड : घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे मुखेड येथील नागरिक संतप्त झाले आहेत. नागरिकांनी एकत्र येत मुखेड पंचायत समितीचे BDO यांना निवेदन देऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1