समाजाच्या प्रगतीत महिलांची योगदान मोठे - डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे : डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर उदगीर (प्रतिनिधी) : कुठल्याही क्षेत्रात काम करणारी महिला स्वकर्तृत्वाने पुढे जात असते. यशाचे शिखर गाठत असताना तिला स्वतःचे कोतुक नसते तर समाजाचे भले करण्याचाच तिचा ध्यास असतो, समाजाची सर्वागीन प्रगती होण्यासाठी महिलांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले. उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने श्रीमती स्वर्णमाला मच्छिन्द्र चिद्रेवार 'महिला शक्ती' पुरस्काराचे वितरण डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते रविवारी शुभंकर फँक्शन हॉल येथे पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिदर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आरती रघु यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या उदगीर केंद्राच्या संचालिका ब्र. कु. महानंदा बहेनजी, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन महानंदा सोनटक्के यांची उपस्थिती होती. यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन ब्र. कु. महानंदा बहेनजी यांचा सन्मान करण्यात आला. तर पल्लवी पटवारी, ऍड. बबिता संकाये, दीपा बाहेती, ललिता ठाकूर, बालिका बेलूरे, बालिका सोनटक्के, सुनिता उदेकर या महिलांचा महिला शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानंदा सोनटक्के यांनी केले. यावेळी बोलताना ब्र. कु. महानंदा बहेनजी म्हणाल्या की, महिला दिनाच्या दिवशी पुरतेच महिलांचे महत्व न राहता रोजच महिलांचा सन्मान झाला पाहिजे. ज्या घरात महिलांचा सन्मान होतो तिथं लक्ष्मीचा वास असतो असा उपदेशही त्यांनी यावेळी केला. डॉ. आरती रघु यांनी आपल्या भाषणात महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देत असताना स्वतःच्या प्रकृतीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिलेवर असते असे सांगून डॉ. रघु यानी महिलांमध्ये रक्त कमी होणे, कॅलशियमची कमतरता जाणवणे यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. आज महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग हे आजार वाढत चालले असून हे आजार होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अरुणा अभय ओसवाल अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. जीवन गौरव मानपत्राचे वाचन विक्रम हलकीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगला विश्वनाथे, ज्योती स्वामी यांनी केले. आभार मोतीलाल डोईजोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, महिला पुरुष, रोटरी क्लब चे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
समाजाच्या प्रगतीत महिलांची योगदान मोठे - डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर समाजाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोठे : डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर उदगीर (प्रतिनिधी) : कुठल्याही क्षेत्रात काम करणारी महिला स्वकर्तृत्वाने पुढे जात असते. यशाचे शिखर गाठत असताना तिला स्वतःचे कोतुक नसते तर समाजाचे भले करण्याचाच तिचा ध्यास असतो, समाजाची सर्वागीन प्रगती होण्यासाठी महिलांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले. उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने श्रीमती स्वर्णमाला मच्छिन्द्र चिद्रेवार 'महिला शक्ती' पुरस्काराचे वितरण डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते रविवारी शुभंकर फँक्शन हॉल येथे पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिदर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आरती रघु यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या उदगीर केंद्राच्या संचालिका ब्र. कु. महानंदा बहेनजी, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्रशांत मांगुळकर, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव विक्रम हलकीकर, प्रोजेक्ट चेअरमन महानंदा सोनटक्के यांची उपस्थिती होती. यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन ब्र. कु. महानंदा बहेनजी यांचा सन्मान करण्यात आला. तर पल्लवी पटवारी, ऍड. बबिता संकाये, दीपा बाहेती, ललिता ठाकूर, बालिका बेलूरे, बालिका सोनटक्के, सुनिता उदेकर या महिलांचा महिला शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानंदा सोनटक्के यांनी केले. यावेळी बोलताना ब्र. कु. महानंदा बहेनजी म्हणाल्या की, महिला दिनाच्या दिवशी पुरतेच महिलांचे महत्व न राहता रोजच महिलांचा सन्मान झाला पाहिजे. ज्या घरात महिलांचा सन्मान होतो तिथं लक्ष्मीचा वास असतो असा उपदेशही त्यांनी यावेळी केला. डॉ. आरती रघु यांनी आपल्या भाषणात महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देत असताना स्वतःच्या प्रकृतीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिलेवर असते असे सांगून डॉ. रघु यानी महिलांमध्ये रक्त कमी होणे, कॅलशियमची कमतरता जाणवणे यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. आज महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग हे आजार वाढत चालले असून हे आजार होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. अरुणा अभय ओसवाल अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. जीवन गौरव मानपत्राचे वाचन विक्रम हलकीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगला विश्वनाथे, ज्योती स्वामी यांनी केले. आभार मोतीलाल डोईजोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, महिला पुरुष, रोटरी क्लब चे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
- *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.4
- लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.1
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- Post by वैजनाथ पावडे1
- खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory1