शिरोली पुलाची येथील मदरसा जवळील वळणावर कार सिमेंटच्या बॅरिकेडवर जोरात आदळून कार आडकून राहीली पुलाची शिरोली / प्रतिनिधी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील मदरसा जवळील वळण वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. या धोकादायक वळणावर गुरुवारी पहाटे तिन वाजण्यासुमार स्विफ्ट डिझायर कार सिमेंटच्या बॅरिकेडवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की टनाचे बॅरिकेट १० फूट लांब सरकून कार बॅरिकेडवरच आडकुन पडली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, गाडीतील प्रवासी जखमी झाला आहे . विशेष म्हणजे, हा अपघात गुरूवारी पहाटे तिन वाजता घडला याबाबत शिरोली पोलिसांकडे अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, याच ठिकाणी मागील महिन्यात एका दुचाकीस्वाराचा असाच अपघात झाला होता, ज्यामध्ये दुचाकी बॅरिकेडवर अडकली होती. आता कारचाही तसाच अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या संतगतीने सुरू आहे, मात्र या कामामुळे सामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपघातास कारणीभूत ठरणारे प्रमुख मुद्दे म्हणजे वळणापूर्वी प्रवाशांना सावध करण्यासाठी दिशादर्शक कोणतेही फलक लावलेले नाहीत. हायवेवर वाहनांचा वेग प्रचंड असतो, परंतु या वळणावर वेग मर्यादित करण्यासाठी 'रंबल स्ट्रिप्स' किंवा 'स्पीड ब्रेकर' नाहीत. यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्या चालकांना वळणाचा अंदाज येत नसल्याने गाड्या थेट बॅरिकेड्सवर जाऊन आदळत आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्ते कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसताना वाहतूक सुरू ठेवल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांना नेमके जबाबदार कोण? प्रशासन आणखी मोठ्या जीवितहानीची वाट पाहत आहे का? असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत. या धोकादायक वळणावर तातडीने दिशादर्शक फलक आणि वेगनियंत्रक उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी आणि शिरोली ग्रामस्थांकडून होत आहे.
शिरोली पुलाची येथील मदरसा जवळील वळणावर कार सिमेंटच्या बॅरिकेडवर जोरात आदळून कार आडकून राहीली पुलाची शिरोली / प्रतिनिधी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील मदरसा जवळील वळण वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालले आहे. या धोकादायक वळणावर गुरुवारी पहाटे तिन वाजण्यासुमार स्विफ्ट डिझायर कार सिमेंटच्या बॅरिकेडवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की टनाचे बॅरिकेट १० फूट लांब सरकून कार बॅरिकेडवरच आडकुन पडली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, गाडीतील प्रवासी जखमी झाला आहे . विशेष म्हणजे, हा अपघात गुरूवारी पहाटे तिन वाजता घडला याबाबत शिरोली पोलिसांकडे अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, याच ठिकाणी मागील महिन्यात एका दुचाकीस्वाराचा असाच अपघात झाला होता, ज्यामध्ये दुचाकी बॅरिकेडवर अडकली होती. आता कारचाही तसाच अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या संतगतीने सुरू आहे, मात्र या कामामुळे सामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपघातास कारणीभूत ठरणारे प्रमुख मुद्दे म्हणजे वळणापूर्वी प्रवाशांना सावध करण्यासाठी दिशादर्शक कोणतेही फलक लावलेले नाहीत. हायवेवर वाहनांचा वेग प्रचंड असतो, परंतु या वळणावर वेग मर्यादित करण्यासाठी 'रंबल स्ट्रिप्स' किंवा 'स्पीड ब्रेकर' नाहीत. यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्या चालकांना वळणाचा अंदाज येत नसल्याने गाड्या थेट बॅरिकेड्सवर जाऊन आदळत आहेत. महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्ते कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसताना वाहतूक सुरू ठेवल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातांना नेमके जबाबदार कोण? प्रशासन आणखी मोठ्या जीवितहानीची वाट पाहत आहे का? असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत. या धोकादायक वळणावर तातडीने दिशादर्शक फलक आणि वेगनियंत्रक उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी आणि शिरोली ग्रामस्थांकडून होत आहे.
- कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून आशीर्वाद घेतले आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाबद्दल आदर व्यक्त केला. दर्शनासोबतच जनसंवाद आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. सामान्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी लोकांशी चर्चा केली. "श्री अंबाबाई देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची सांगड घालणारे हे मंदिर आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.1
- Post by Madan petkar1
- कोल्हापूर : रविराज कांबळे आरक्षणाची जनभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या होतात. अशा या पवित्र भूमीत असल्याचा अभिमान व्यक्त करत Dr. B. R. Ambedkar यांच्या विचारांमुळेच आपल्या खांद्यावरचे स्टार आहेत, असे मनोगत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केले. विश्वरत्न बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात अभिवादनासाठी उपस्थित राहून त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी संदेश दिला.2
- Post by E city news network1
- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य : डॉ.प्रविण दबडघाव विक्रम शिंदे /भोर दि.१४ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प.महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रविण दबडघाव यांनी केले.कापूरहोळ येथील विराट हिंदू मेळाव्याला संबोधित करताना डॉ. प्रवीण दबडघाव बोलत होते. यावेळी मेळाव्याला कापूरहोळ, हरिश्चंद्री ,दिवळे ,केतकावळे, कुंभोशी ,चिव्हेवाडी, खडकी कामथडी , उंबरे या गावातून हिंदू राम भक्त उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सुरू असलेल्या संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी बालांनी रामरक्षा गणपती स्तोत्र मनाचे श्लोक सर्वांसमोर सादर केले जानुबाई ढोल लेझीम पथक कामथडी या गावाने ढोल लेझीमच्या वाद्य पथकाने नेत्रदीपक खेळ सादर करत लक्ष वेधून घेतले.1
- 🛑 *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आयुष्यभर आचरणात आणण्याचे आवाहन केले. “डॉ. बाबासाहेबांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता जन्मापासून शेवटपर्यंत आचरणात आणले पाहिजेत. संविधान जपण्याचा संकल्प करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे,” असे त्या म्हणाल्या. खासदार प्रणिती शिंदे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या की, देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले असून सत्ताधारी भाजपकडून त्याचा वारंवार अपमान होत आहे. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही; मात्र आता देशासाठी लढण्याची वेळ आली आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी जात-पात, धर्म बाजूला ठेवून संघटित संघर्ष करणे आवश्यक आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, संसद व विधिमंडळात ३३ टक्के महिला आरक्षणाची तरतूद असलेले महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाले आहे. यापूर्वी काँग्रेस सरकारने ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षण लागू केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, महिला आरक्षण विधेयक काँग्रेसच्या पाठिंब्याने २०२३ मध्येच मंजूर झाले असताना सत्ताधाऱ्यांना ३० महिन्यांनंतर जाग आली असून, पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात येत आहे. तसेच, महिला आरक्षणाची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचना (डी-लिमिटेशन) शी जोडण्यावर त्यांनी आक्षेप घेतला. मतदारसंघ पुनर्रचना करण्यापूर्वी जनगणना होणे आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकार असंवैधानिक पद्धतीने निर्णय घेत आहे. हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप वारंवार लोकशाही आणि संविधानाचा अपमान करतात. महत्त्वाच्या विधेयकांपूर्वी देशभर चर्चा व्हायला हवी. संवाद हीच लोकशाहीची खरी ताकद आहे; मात्र सध्याचे सरकार एकतर्फी निर्णय घेत आहे. संवादाची परंपरा नष्ट होत असून हे लोकशाही संपुष्टात येण्याचे संकेत आहेत. जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत आणि ते जपणारे लोक व काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे, तोपर्यंत लोकशाही व संविधानावर कुठलाही आघात होऊ देणार नाही, असा निर्धार खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, माजी महापौर सुशिलाताई अबुटे, संजय हेमगड्डी, अरिफ शेख, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक प्रवीण दादा निकाळजे, शिवा बाटलीवाला, प्रा. भोजराज पवार, प्रदेश सचिव श्रीशैल रणधिरे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, हनुमंतू सायबोळु, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, बाबुराव म्हेत्रे, दक्षिण तालुका अध्यक्ष भीमाशंकर जमादार, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड. मयूर खरात, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, रामसिंग आंबेवाले, बसवराज म्हेत्रे, राजन कामत, सिद्राम सलवदे सर, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी, रुस्तुम कंपली, लखन गायकवाड, सागर उबाळे, अँड. शुभम माने, अयाज आळंद, भीमराव शिंदे, नूरअहमद नलवार, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, हेमाताई चिंचोळकर, अँड करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, संध्या काळे, मुमताज तांबोळी, कोंडणताई काकडे, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, सलिमा शेख, पूजा चव्हाण, छाया हिरवटे, चंद्रकला निजमल्लू, अनिता भालेराव, द्रोपदी शिवशरण, सचिन पवार, महेंद्र शिंदे, यल्लाप्पा बुगले, नारायण पावटे, राजेश झंपले, गंगाधर शिंदे, शंकर म्यागेरी, मोहसीन फुलारी, दशरथ सामल, अभिलाष अच्युगटला, सचिन सुरवसे, आमिर पाटील, अभेज दर्जी, दत्तात्रय गजभार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत असतानाच, आता ऐतिहासिक पंचगंगा घाट परिसरातील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रंकाळा आणि के.एम.बी.पी. पार्क येथील कारवाईनंतर महापालिकेने आपला मोर्चा पंचगंगा घाटाकडे वळवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सध्या घाट परिसरात अनधिकृत दुकाने, गाळे आणि खाऊ गल्ली मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहे. यामुळे घाटाचे ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्य लोप पावत असून स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नदी प्रदूषणमुक्तीचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात घाटावर वाढलेली खाऊ गल्ली आणि पूजेच्या साहित्यांच्या स्टॉल्समुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. गणेशोत्सव आणि जोतिबा यात्रेच्या काळात येथे मोठी गर्दी असते, अशा वेळी या अतिक्रमणांमुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महापालिकेने केवळ रस्त्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कोल्हापूरकरांमधून होत आहे.1