केआयटी (KIT) विनयभंग प्रकरण: पीडित विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा! कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क केआयटी (KIT) कॉलेजमधील एका विभागप्रमुख प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, कॉलेजमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी 'हिंदू एकता आंदोलन'तर्फे करण्यात आली आहे. आज, मंगळवारी दुपारी १२:३० वाजता हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक सुरेशराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक (SP) योगेश कुमार यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. यावेळी बोलताना दिपक देसाई म्हणाले की, "या प्रकरणात पीडित मुलींनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही ६ मार्च रोजी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मात्र, संबंधित प्राध्यापकाची वर्तणूक पाहता पीडित मुलींची संख्या अधिक असू शकते. कॉलेज प्रशासनाने पीडितेची बाजू समजून घेण्याऐवजी तिलाच पुराव्यांची मागणी करून मानसिक त्रास दिला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच, या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन काही राजकीय कार्यकर्ते खंडणी गोळा करत असल्याचे समजत असून, याची शहानिशा करून अशा प्रवृत्तींवरही पोलिसांनी कठोर कारवाई करावी." पोलीस अधीक्षकांचे आश्वासन: निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेतल्या. त्यांनी या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून, पीडित मुलींना न्याय मिळावा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण राहील, या दृष्टीने पोलीस प्रशासन तातडीने पुढील पावले उचलले, असे स्पष्ट केले. याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने विलास मोहीते, बाबु साखळकर, प्रतिक डिसले, ऍड. आसावरी कुलकर्णी, ऐश्वर्या मुनिश्वर, ऍड. शुभांगी निंबाळकर, सुधाकर वडगांवकर, आनंदा कवडे, नागेश ऊगार, सुनिक ठाकुर, राहुल गोंदील, अंजली जाधव, ऍड. अनुप कुलकर्णी, राजेंद्र करंबे, शिवाजी चिले, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
केआयटी (KIT) विनयभंग प्रकरण: पीडित विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा! कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क केआयटी (KIT) कॉलेजमधील एका विभागप्रमुख प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, कॉलेजमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी 'हिंदू एकता आंदोलन'तर्फे करण्यात आली आहे. आज, मंगळवारी दुपारी १२:३० वाजता हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक सुरेशराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक (SP) योगेश कुमार यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. यावेळी बोलताना दिपक देसाई म्हणाले की, "या प्रकरणात पीडित मुलींनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही ६ मार्च रोजी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मात्र, संबंधित प्राध्यापकाची वर्तणूक पाहता पीडित मुलींची संख्या अधिक असू शकते. कॉलेज प्रशासनाने पीडितेची बाजू समजून घेण्याऐवजी तिलाच पुराव्यांची मागणी करून मानसिक त्रास दिला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच, या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन काही राजकीय कार्यकर्ते खंडणी गोळा करत असल्याचे समजत असून, याची शहानिशा करून अशा प्रवृत्तींवरही पोलिसांनी कठोर कारवाई करावी." पोलीस अधीक्षकांचे आश्वासन: निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेतल्या. त्यांनी या विषयात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असून, पीडित मुलींना न्याय मिळावा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण राहील, या दृष्टीने पोलीस प्रशासन तातडीने पुढील पावले उचलले, असे स्पष्ट केले. याप्रसंगी हिंदू एकता आंदोलनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने विलास मोहीते, बाबु साखळकर, प्रतिक डिसले, ऍड. आसावरी कुलकर्णी, ऐश्वर्या मुनिश्वर, ऍड. शुभांगी निंबाळकर, सुधाकर वडगांवकर, आनंदा कवडे, नागेश ऊगार, सुनिक ठाकुर, राहुल गोंदील, अंजली जाधव, ऍड. अनुप कुलकर्णी, राजेंद्र करंबे, शिवाजी चिले, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार व इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- देहूरोड येथे सलामती पीर उर्स उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न.... ईदगाह मैदानातील दर्ग्यावर हजारो भाविकांची उपस्थिती; रमजाननिमित्त रोजा इफ्तार व लंगर-ए-आमची व्यवस्था... देहूरोड येथील ईदगाह मैदानात असलेल्या हजरत सलामती पीर दर्ग्यावर १४ वा उर्स उत्सव मोठ्या दिमाखात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्ग्यावर हजेरी लावून सलामती पीर साहेबांचे यांचे दर्शन घेतले. या उर्स उत्सवाचे आयोजन सलामती पीर दर्गा ट्रस्ट तसेच जामा मशीद ॲडहोक कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. सध्या पवित्र रमजान महिना सुरू असल्याने ईदगाह मैदानात ट्रस्टच्या वतीने सर्व भाविकांसाठी रोजा इफ्तारची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संध्याकाळी सर्वांसाठी लंगर-ए-आम चे आयोजन करण्यात आले होते. उर्स उत्सवानिमित्त दर्गा परिसरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी प्रार्थना करून सलामती पीर यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला विशेष करून या उर्स साठी अनेक सुफी संत, इस्लामिक गुरु त्याचप्रमाणे सर्वधर्मचे मान्यवर व सर्वसामान्य नागरिक मोठे संख्येने उपस्थित होते.1
- पिंपरी चिंचवड शहरामध्ये माळुंगे शिंदे वासुली, खालुंब्रे येथे खुलेआम अवैधरित्या गॅस भरणा केंद्राचा सुळसुळाट.......1
- जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.1
- -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते -आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे -आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत -सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल -महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल1
- बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान1
- Post by R A News1