logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वऱ्हाड साहित्य मंचा अभिनय उपक्रम पक्षांसाठी पक्ष्यांची शाळा व-हाड साहित्य मंचाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दारव्हा रोपवाटिका, दारव्हा रोड वस्तीगृह, जळगाव रोडवरील पाण्याच्या विहिरीजवळ तसेच किशोर वंजारी यांच्या मोझर रोडलगत असलेल्या हिरव्यागार शेतात “पक्ष्यांची शाळा” भरविण्यात आली. यावर्षी स्वर्गीय नारायण वंजारी यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून तसेच त्यांचे सुपुत्र किशोरदादा वंजारी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. जंगल परिसरातील प्रत्येक पक्षी तृप्त व्हावा, यासाठी एकाच वेळी दाना-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच “तृष्णातृप्ती पक्षी पात्र” व पक्ष्यांना सुरक्षित विसावा मिळावा यासाठी “पक्षी घरटी” लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वाच्या औचित्यावर पार पडला, यामुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक व प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झाले. यावेळी गायक संजय चतुरकर यांना वस्तीगृहातील शाळेच्या परिसरात झाडांवर लावण्यासाठी पक्षी पात्र सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पक्षीप्रेम आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संदेश देण्यात आला. उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

5 hrs ago
user_Nilesh Wanjari
Nilesh Wanjari
नेर, यवतमाळ, महाराष्ट्र•
5 hrs ago
9af1b443-308b-421b-b654-e22232c20573

वऱ्हाड साहित्य मंचा अभिनय उपक्रम पक्षांसाठी पक्ष्यांची शाळा व-हाड साहित्य मंचाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दारव्हा रोपवाटिका, दारव्हा रोड वस्तीगृह, जळगाव रोडवरील पाण्याच्या विहिरीजवळ तसेच किशोर वंजारी यांच्या मोझर रोडलगत असलेल्या हिरव्यागार शेतात “पक्ष्यांची शाळा” भरविण्यात आली. यावर्षी स्वर्गीय नारायण वंजारी यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून तसेच त्यांचे सुपुत्र किशोरदादा वंजारी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. जंगल परिसरातील प्रत्येक पक्षी तृप्त व्हावा, यासाठी एकाच वेळी दाना-पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच “तृष्णातृप्ती पक्षी पात्र” व पक्ष्यांना सुरक्षित विसावा मिळावा यासाठी “पक्षी घरटी” लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वाच्या औचित्यावर पार पडला, यामुळे कार्यक्रमाला विशेष सामाजिक व प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झाले. यावेळी गायक संजय चतुरकर यांना वस्तीगृहातील शाळेच्या परिसरात झाडांवर लावण्यासाठी पक्षी पात्र सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पक्षीप्रेम आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संदेश देण्यात आला. उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. ​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. ​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. ​चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. ​शेतकरी न्यायापासून वंचित ​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. ​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. ​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    1
    ​हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
​२०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच?
या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे.
​अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी
दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली.
​चौकशी पत्रात अनियमितता
अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे.
​शेतकरी न्यायापासून वंचित
​निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत.
​भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही.
​भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
​जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच
"महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे. #Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue
    1
    घरकुल योजनेत गैरप्रकाराचा आरोप; आंदोलनाचा इशारा
हिमायतनगर तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र लाभार्थ्यांना देयके देण्यास टाळाटाळ करून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांच्याशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त केली.
ज्या लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुल पूर्ण केले, त्यांना देयके न देता अर्धवट काम करणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “टेबलाखालून व्यवहार करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ सुधारणा करून पात्र लाभार्थ्यांना प्राधान्याने देयके द्यावीत, तसेच अभियंता स्तरावर होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वडगावकर यांनी दिला आहे. तशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घरकुल योजनेत मोठी अनियमितता असल्याची जोरदार चर्चा होते आहे.
#Himayatnagar #Nanded #HousingScheme #Corruption #LocalNews MaharashtraNews BreakingNews PublicIssue
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार
#viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by धरती पुत्र
    4
    Post by धरती पुत्र
    user_धरती पुत्र
    धरती पुत्र
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • shjfsfhjjfddfhhcxdhhdshhhcdsfgghhgfdddhhfxdd
    1
    shjfsfhjjfddfhhcxdhhdshhhcdsfgghhgfdddhhfxdd
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    1
    🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩
भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या!
हिमायतनगर-वाढोणा येथे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त 
दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन!मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे करण्यात आलंय...सर्व भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा. 
#JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    1
    *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* 
संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान।
मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई
पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा।
करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़।
पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया।
पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है
हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.