राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील काही जाचक अटी हटविण्याचा घेतलेला निर्णय हा आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा आणि शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे. या विजयानंतर आता शासनाने योजनेतील उर्वरित जाचक अटीही तात्काळ रद्द कराव्यात आणि राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राजेंद्र मस्के यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या या कर्जमुक्ती योजनेत आधी अनेक जाचक अटी घालण्यात आल्या होत्या, ज्यामुळे लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहणार होते. २०१९ च्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफीची मर्यादा घालण्यात आली होती. तसेच प्रोत्साहनपर अनुदानासाठीही विविध अटी लावण्यात आल्या होत्या. या अन्यायकारक अटी रद्द करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन आणि छत्रपती संभाजीनगर येथे एल्गार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. या आक्रमक भूमिकेमुळे अखेर शासनाला ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करून २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि प्रोत्साहनपर अनुदानाच्या काही जाचक अटीही मागे घ्याव्या लागल्या. मात्र, अद्यापही या योजनेत काही जाचक अटी कायम असून अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने उर्वरित सर्व अटी तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे. शेतकरी हितासाठी हा लढा पुढेही सुरू राहील आणि पीकविमा, वीजपुरवठा, नुकसानभरपाई तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील काही जाचक अटी हटविण्याचा घेतलेला निर्णय हा आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा आणि शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी म्हटले आहे. या विजयानंतर आता शासनाने योजनेतील उर्वरित जाचक अटीही तात्काळ रद्द कराव्यात आणि राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राजेंद्र मस्के यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या या कर्जमुक्ती योजनेत आधी अनेक जाचक अटी घालण्यात आल्या होत्या, ज्यामुळे लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहणार होते. २०१९ च्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफीची मर्यादा घालण्यात आली होती. तसेच प्रोत्साहनपर अनुदानासाठीही विविध अटी लावण्यात आल्या होत्या. या अन्यायकारक अटी रद्द करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन आणि छत्रपती संभाजीनगर येथे एल्गार आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. या आक्रमक भूमिकेमुळे अखेर शासनाला ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करून २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि प्रोत्साहनपर अनुदानाच्या काही जाचक अटीही मागे घ्याव्या लागल्या. मात्र, अद्यापही या योजनेत काही जाचक अटी कायम असून अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने उर्वरित सर्व अटी तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली आहे. शेतकरी हितासाठी हा लढा पुढेही सुरू राहील आणि पीकविमा, वीजपुरवठा, नुकसानभरपाई तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
- छत्रपती संभाजीनगर येथे १९९० च्या दशकातील डॉन बाबा फर्जंन याच्या घरावर पोलिसांनी रात्री उशिरा मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी डॉनच्या घरातून तब्बल ६,३५० काडतुसे, शस्त्रे, पैसे आणि सोने-चांदी जप्त केली आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली होती. संबंधित डॉन बाबा फर्जंन याचा मागील महिन्यातच डायबेटिजने मृत्यू झाला असून, सध्या पोलिसांनी या कारवाईदरम्यान डॉनच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.1
- दुबई येथे आयोजित एका जागतिक व्यासपीठावर भारतीय शिक्षिका रुबल नेगी यांना प्रतिष्ठित जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बल १३९ देशांतील स्पर्धकांमधून रुबल नेगी यांची या जागतिक पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यांना एक मिलियन डॉलरची पुरस्कार राशी देऊन गौरवण्यात आले आहे.1
- फुलंब्री नगरपंचायतीने शहरात धडाकेबाज कामगिरी करत एका विशेष मोहिमेअंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटवली आहेत. नगरपंचायतीच्या या कारवाईमुळे अरुंद रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणचा अनधिकृत ताबा काढण्यात यश आले आहे.1
- road acha he ninsjshsbsgbsnabsgnsgsnsha gebshbsnsjnsbsbsnehe chh. sambhaji nagarhhenb1
- लातूरच्या प्रभाग क्रमांक १८ मधील सार्वजनिक बोर गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत प्रभागातील नगरसेवकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत नगरसेवकांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्वरित सूचना दिल्या. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळे बंद पडलेल्या बोरची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करण्यात आली आणि नवीन पाईप लाईनचे कामही पूर्ण करण्यात आले. यामुळे दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बोर पुन्हा सुरू झाला आहे. यावेळी प्रभागातील आजी आणि माजी नगरसेविकांसह माधव जाधव, रंजना शिंदे, रेखा बिराजदार, शहाजी सुर्यवंशी, सोनाली सुर्यवंशी, बाळु शिंदे, तानाजी शिंदे, गुरूराज पाटील आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- औरंगाबादच्या मुकुंदवाडी चौकात भरदिवसा एका तरुणाला लुटण्याचा प्रयत्न स्थानिक सतर्क तरुणांच्या धाडसामुळे फसला आहे. मुकुंदवाडी चौकात एका संशयिताने तरुणाला लुटण्याचा प्रयत्न केला असता, तेथील स्थानिक तरुणांनी सतर्कता दाखवत तातडीने त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले. तरुणांच्या या तत्परतेमुळे हा लुटीचा प्रयत्न फसला असून, घटनेनंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.1