आकांक्षित तालुक्यात ‘संपूर्ण अभियान 2.0’ चा उत्साहात शुभारंभ बदनापूर जिल्हा जालना, आकांक्षित तालुक्यात ‘संपूर्ण अभियान 2.0’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ बदनापूर येथील पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला. या अभियानाचा कालावधी 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026 असा असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नारायण कुचे होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी ‘संपूर्ण अभियान 2.0’ चे उद्दिष्ट व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. या अभियानांतर्गत शिक्षण, पोषण, महिला व बालकल्याण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, शेती, रोजगारनिर्मिती आदी क्षेत्रांत विशेष भर देण्यात येणार आहे. गावनिहाय नियोजन करून पायाभूत सुविधांची उभारणी, लाभार्थ्यांची नोंदणी, शिबिरे व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन आमदार कुचे यांनी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम म्हणाल्या की, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने अभियानासाठी आवश्यक निधी व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या अभियानाद्वारे 125 गावांमध्ये सुमारे 75 लाख रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी (CIF) विविध विकासकामांसाठी उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमास तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, आशा व अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘संपूर्ण अभियान 2.0’मुळे तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आकांक्षित तालुक्यात ‘संपूर्ण अभियान 2.0’ चा उत्साहात शुभारंभ बदनापूर जिल्हा जालना, आकांक्षित तालुक्यात ‘संपूर्ण अभियान 2.0’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ बदनापूर येथील पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला. या अभियानाचा कालावधी 28 जानेवारी ते 14 एप्रिल 2026 असा असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नारायण कुचे होते. प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम,
जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती पाटील यांनी ‘संपूर्ण अभियान 2.0’ चे उद्दिष्ट व कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. या अभियानांतर्गत शिक्षण, पोषण, महिला व बालकल्याण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, शेती, रोजगारनिर्मिती आदी क्षेत्रांत विशेष भर देण्यात येणार आहे. गावनिहाय नियोजन
करून पायाभूत सुविधांची उभारणी, लाभार्थ्यांची नोंदणी, शिबिरे व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन आमदार कुचे यांनी केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम म्हणाल्या की, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने अभियानासाठी आवश्यक निधी व तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या
अभियानाद्वारे 125 गावांमध्ये सुमारे 75 लाख रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी (CIF) विविध विकासकामांसाठी उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमास तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, आशा व अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘संपूर्ण अभियान 2.0’मुळे तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
- महाराष्ट्र में खेल-खेल में बर्तन में फंसा 3.5 वर्षीय बच्चे का सिर, रोता-बिलखता रहा मासूम जलगांव में खेलते समय 3.5 साल के बच्चे का सिर एल्युमिनियम के बर्तन में फंस गया जिससे उसे सांस लेने में दिक्कत होने लगी और जान पर बन आई। इसके बाद कटर से बर्तन को काटकर करीब 12 मिनट में बच्चे का सिर सुरक्षित बाहर निकाला गया। रेस्क्यू के दौरान बच्चा वीडियो में रोता-बिलखता हुआ नज़र आ रहा है।1
- *जालना* हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंदळ... जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार.. समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका.. एमआयएम पदाधिकाऱ्याचा बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती..1
- बच्चा चोरीची घटना CCTV कैमऱ्यात कैद1
- सिल्लोड,राज्यातील मंत्री. सिल्लोड मधील भाजप नेते अब्दुल सत्तारांची सात्वन भेट. सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, संदीप पान भुमरे, माझे मंत्री राजेंद्र दर्डा, छ. संभाजीनगरचे उपमहापौर जंजाळ, मुर्डेश्वर महंत, सिल्लोड तालुक्यातील भाजपचे नेते माजी आमदार सांडू पाटील लोखंडे माजी नगरसेवक सुनील मिरकर आदी मान्यवरांनी अब्दुल सत्तारांची सात्वन भेट घेतली1
- शिवभक्त सचिन फटाले यांनी शिवभक्तांना शिवजयंती बद्दल केले आव्हान1
- अंबड–घनसावंगी मार्गावर ऊसाचे ट्रॅक्टर पलटी; जिनिंगसमोर उस सांडल्याने वाहतूक ठप्प.. घनसावंगी ते अंबड मुख्य रस्त्यावर सूतगिरणीच्या पुढे जिनिंग जवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना आज १८ फेब्रुवारी बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे संपूर्ण रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या1
- आज दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते यानंतर महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी त्यांना सांत्वन पूर्व भेट दिली आहे1
- मुंबई की एक्ट्रेस प्रिया बक्शी को 14 फरवरी 2026 की रात बांद्रा में एक ऑटो ड्राइवर के हाथों डरावने पल का सामना करना पड़ा। ड्राइवर ने कथित तौर पर अनजान रास्ता पकड़ लिया और प्रिया ने वीडियो बनाकर अपनी घबराहट जाहिर की। उन्होंने सुरक्षा को लेकर सवाल उठाए और नॉर्थ इंडियन होने पर भेदभाव का आरोप लगाया।1