विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्मा डी. वाय. पाटील विद्यापीठात ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न कोल्हापूर : विज्ञान प्रदर्शन आणि प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे केवळ अभ्यासाचा विषय म्हणून न पाहता प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, भारतीय युवा विज्ञान अकादमी (INYAS) आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण’ शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील इयत्ता सातवी ते नववीच्या १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगांकडे केवळ प्रात्यक्षिक म्हणून न पाहता त्यामागील कारणांचा विचार करावा, असे आवाहन केले. प्रयोगातून जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि त्या जिज्ञासेतून नवे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. प्रश्न विचारण्याची व त्यांची उत्तरे शोधण्याची वृत्तीच विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधनाच्या क्षेत्राकडे घेऊन जाईल, असे त्यांनी सांगितले. या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांची प्रात्यक्षिके, विज्ञान प्रश्नमंजुषा, सूक्ष्मदर्शकाचे प्रात्यक्षिक, संशोधन प्रयोगशाळा व सिम्युलेशन लॅबला भेट तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत विज्ञानातील संकल्पना समजून घेतल्या. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अश्विनी काळे, सहसंयोजक डॉ. जयवंत गुंजकर, डॉ. अर्पिता पांडे तिवारी, आयुकाचे रुपेश लबडे, जाहिदा शेख यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. *कोल्हापूर* - विविध स्पर्धेतील विजेत्यांसोबत डॉ. आर. के. शर्मा, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. अर्पिता तिवारी, डॉ. अश्विनी काळे आदी.
विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्मा डी. वाय. पाटील विद्यापीठात ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न कोल्हापूर : विज्ञान प्रदर्शन आणि प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे केवळ अभ्यासाचा विषय म्हणून न पाहता प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, भारतीय युवा विज्ञान अकादमी (INYAS) आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण’ शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील इयत्ता सातवी ते नववीच्या १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगांकडे केवळ प्रात्यक्षिक म्हणून न पाहता त्यामागील कारणांचा विचार करावा, असे आवाहन केले. प्रयोगातून जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि त्या जिज्ञासेतून नवे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. प्रश्न विचारण्याची व त्यांची उत्तरे शोधण्याची वृत्तीच विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधनाच्या क्षेत्राकडे घेऊन जाईल, असे त्यांनी सांगितले. या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांची प्रात्यक्षिके, विज्ञान प्रश्नमंजुषा, सूक्ष्मदर्शकाचे प्रात्यक्षिक, संशोधन प्रयोगशाळा व सिम्युलेशन लॅबला भेट तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत विज्ञानातील संकल्पना समजून घेतल्या. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अश्विनी काळे, सहसंयोजक डॉ. जयवंत गुंजकर, डॉ. अर्पिता पांडे तिवारी, आयुकाचे रुपेश लबडे, जाहिदा शेख यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. *कोल्हापूर* - विविध स्पर्धेतील विजेत्यांसोबत डॉ. आर. के. शर्मा, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. अर्पिता तिवारी, डॉ. अश्विनी काळे आदी.
- शेकडो शेतकऱ्यांनी हात वर करून शक्तिपीठ विरोध केला..... शेकडो शेतकऱ्यांनी हात वर करून शक्तिपीठ महामार्ग लादणाऱ्या प्रशासनाचा तीव्र जाहीर निषेध केला जनसंवाद दरम्यान अधिकारी व शेतकऱ्यांच्या मध्ये तणाव एकच जिद्द शक्तिपीठ कडेगाव प्रांताधिकारी कार्यालय दणाणून गेले शेतकऱ्यांना हलक्यात घ्याल तर मातीत जाल कडेगाव प्रांताधिकारी महामार्ग विभागाचे अधिकारी ,पलूस तहसीलदार, मोणार्क कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती च्या वतीने एक सुरात शेतकऱ्यांनी हात वर करून शक्तिपीठ महामार्ग रद्द करा अशा घोषणा देत प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला1
- १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.4
- खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाचे आगमन खेड : खेडचे भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने खेडेकर यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.1
- उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना1
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- बिहार मध्ये पावसाचे थैमान, नदया ना महापूर, जनजीवन विस्कळीत.1
- 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..1
- परभणीत घुमणार पिवळ वादळ.मोर्चास उपस्थित राहावे विद्याताई मोठे महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी मायबाप युवक-युवती वतीने दि. 17 सप्टेंबर रोजी परभणी येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व दीपक भाऊ बोराडे करणार असल्याची माहिती साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका व धनगर समाजाची रणरागिणी सौ. विद्याताई सचिन मोठे यांनी समाज बांधवांना एकजुटीचे आवाहन केले. विद्याताई मोठे म्हणाल्या, आपल्या हक्कासाठी आणि आपल्या मुला-बाळाच्या भविष्यासाठी आता गप्प बसून चालणार नाही. आपला आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक धनगर बांधवाने 17 सप्टेंबरला परभणीत मोठ्या संख्येने व शांततेने उपस्थित राहावे.1