*कवयित्री सुनिता रमेश यांच्या कविता गेल्या बरेच दिवसापासून मी वाचतोय. कवयित्रीचा मानवतावादी दृष्टिकोन खूप स्पष्टपणे अधोरेखित होतो. वैचारिक ताळमेळ भावनिक तन्मयता संवेदनशीलता नवीन नात्यांचा परिपक्व अभ्यास ग्रामीण भाग व निसर्ग अशा अनेक अंगांच्या कविता कवयित्री सुनिता रमेश यांच्या वाचायला मिळतात. त्यांच्या साहित्यात उच्च मानवी मूल्याचे दर्शन घडतं. त्यांच्या साहित्याक्षरांमध्ये उन्नत मानवी जीवनाची बीजाक्षर आहेत. त्यामुळे मानवी मूल्य जोपासून माणुसकीच्या या नात्यांना हल्लीच्या भौतिक जगात उच्च किंमत देणाऱ्या कवयित्री सुनिता रमेश, त्यांची नाळ तशी ग्रामीण भागाशी जुळलेली. आपलं शिक्षण ग्रॅज्युएट पर्यंत पूर्ण झालं असलं तरी, समाजामध्ये एक वलय प्रस्थापित करण्यात सक्षम झालेल्या साहित्यिक. नुकत्याच झालेल्या मेहकर येथील साहित्य जगत संमेलनामध्ये त्यांची हलकीशी नोंद, त्यांनी सादर केलेल्या भावकविता स्पर्शून जातात. शब्द सार्थीने कवयित्री सुनिता रमेश यांची घेतलेली नोंद म्हणजे त्यांच्या प्रबळ साहित्याची पावती ठरते.वर्ण धर्म जात पंथ यापेक्षा पलीकडे जाऊन मानवी मूल्यांच्या मुक्ततावादाला किंमत देणाऱ्या, निरंतर प्रवाही उगवत जाणारे कवी मन मूलतत्त्ववादाला फाटा देऊन मुक्ततावाद स्वीकारणाऱ्या सुनिता रमेश यांच्या हल्ली अलीकडच्या कविता प्रचंड वायरल होत आहेत.मिळत असलेल्या वाचकांचा वाढता प्रतिसाद त्यांच्या उत्तम साहित्याची पावतीच मानावी लागेल. *धन्यवाद*. प्रा.अनिल रिंढे. ९९२२०११८३६
*कवयित्री सुनिता रमेश यांच्या कविता गेल्या बरेच दिवसापासून मी वाचतोय. कवयित्रीचा मानवतावादी दृष्टिकोन खूप स्पष्टपणे अधोरेखित होतो. वैचारिक ताळमेळ भावनिक तन्मयता संवेदनशीलता नवीन नात्यांचा परिपक्व अभ्यास ग्रामीण भाग व निसर्ग अशा अनेक अंगांच्या कविता कवयित्री सुनिता रमेश यांच्या वाचायला मिळतात. त्यांच्या साहित्यात उच्च मानवी मूल्याचे दर्शन घडतं. त्यांच्या साहित्याक्षरांमध्ये उन्नत मानवी जीवनाची बीजाक्षर आहेत. त्यामुळे मानवी मूल्य जोपासून माणुसकीच्या या नात्यांना हल्लीच्या भौतिक जगात उच्च किंमत देणाऱ्या कवयित्री सुनिता रमेश, त्यांची नाळ तशी ग्रामीण भागाशी जुळलेली. आपलं शिक्षण ग्रॅज्युएट पर्यंत पूर्ण झालं असलं तरी, समाजामध्ये एक वलय प्रस्थापित करण्यात सक्षम झालेल्या साहित्यिक. नुकत्याच झालेल्या मेहकर येथील साहित्य जगत संमेलनामध्ये त्यांची हलकीशी नोंद, त्यांनी सादर केलेल्या भावकविता स्पर्शून जातात. शब्द सार्थीने कवयित्री सुनिता रमेश यांची घेतलेली नोंद म्हणजे त्यांच्या प्रबळ साहित्याची पावती ठरते.वर्ण धर्म जात पंथ यापेक्षा पलीकडे जाऊन मानवी मूल्यांच्या मुक्ततावादाला किंमत देणाऱ्या, निरंतर प्रवाही उगवत जाणारे कवी मन मूलतत्त्ववादाला फाटा देऊन मुक्ततावाद स्वीकारणाऱ्या सुनिता रमेश यांच्या हल्ली अलीकडच्या कविता प्रचंड वायरल होत आहेत.मिळत असलेल्या वाचकांचा वाढता प्रतिसाद त्यांच्या उत्तम साहित्याची पावतीच मानावी लागेल. *धन्यवाद*. प्रा.अनिल रिंढे. ९९२२०११८३६