Shuru
Apke Nagar Ki App…
१६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
Amravati News Update
१६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;
More news from महाराष्ट्र and nearby areas
- वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर मध्ये गोवंशतकरीचा पडदाफाश ठाणेदार संगीता हिलोंडे यांच्या धडक कारवाई ने तस्करांचे धाबे दणाणले *ब्रेकिंग न्यूज - वर्धा* *वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले* गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध जनावर वाहतुकीला आळा; पहाटेच्या सुमारास सापळा रचून वाहन जप्त वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या जनावरांच्या अवैध तस्करीला अखेर आळा बसला आहे. याबाबत बजरंग दलाच्यावतीने अनेकदा तक्रारी केल्या होत्या तसेच वृत्तपत्रांमध्ये देखील या बाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत अखेर आज पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीला 2 वाजेच्या सुमारास अल्लीपूर मार्गावरून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपली टीम तयार केली आणि अल्लीपूर जवळ सोनेगाव स्टेश सापळा रचला. बुलेरो मालवाहतूक गाडी MH 30 आरडी 63 व पाहणी करण्याकरता एक कार MH 5925 अंधाराचा फायदा घेत येणाऱ्या संशयित वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या वाहनाला चारही बाजूंनी घेरून पकडण्यात यश आले. माल वाहतूक बुलेरो गाडीमध्ये एकूण नऊ जनावरे कत्तलीसाठी नेत होते त्या जनावरांमध्ये दोन गाय कालवड गोरे तीन कालवड चार एकूण नऊ जनावर वाहनात निर्दयतेने कोंबून जनावरे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करून त्यातील जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत दोन्ही गाडीमध्ये असलेले एकूण चार आरोपी फरार आल्याची प्राथमिक माहिती आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संगीत हेलोंडे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक वर्षात तांदूळकर जमादार अजय रिठे पोलीस शिपाई अजय वानखेडे पंकज कापसे पोलीस शिपाई दिनेश खराबे यांनी केली आहे . जप्त केलेले वाहन पोलीस स्टेशनला लावले आहे व नऊ जनावरे वर्धा येथील करुणा आश्रम मध्ये सोडण्यात आली आहे या धडक कारवाईमुळे अल्लीपूर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावकऱ्यांनी ठाणेदार संगीता हेलोंडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून अल्लीपूर परिसरातून अवैध जनावर वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आज पहाटे आम्ही केलेल्या कारवाईत वाहन पकडले असून पुढील तपास सुरू आहे. अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी यावेळी सांगितले. सदर कारवाई या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.1
- रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी १ लाखांची मदत द्या! रिसोड, ता. 17 : पावसाने दडी मारल्याने रिसोड तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी सुकून करपली असून, शेतकऱ्यांच्या हातातून यंदाचा हंगाम अक्षरशः निसटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसला. शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकू लागली आहेत. काही ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बियाणे, खत, मशागत, मजुरी आणि औषधांवर मोठा खर्च करूनही हातात काहीच उरणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर आणि आता पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे.2
- दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले. दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली. तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.1
- आमदार संतोष बांगर यांनी केली साळणा शिवारात वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी गेल्या एका महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने सोयाबीन कापूस तूर हळद यासारखी खरीप पिके हातची गेली आहेत,या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी विधानसभा क्षेत्रातील साळणा शिवारात जाऊन तेथील पाण्याअभावी वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे . वाळलेल्या पिकाची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी या संदर्भात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले .शासन लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करेल असे त्यांनी ग्वाही दिली .याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती1
- बोथी येथे चोरट्यांनी चार शेळ्या केल्या लंपास,पोलिसात अज्ञात चोरावर गुन्हा दाखल कळमनुरी तालुक्यातील बोथी येथून शेतकऱ्यांच्या चार शेळ्या चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी दि.15सप्टेंबर रोजी मंगळवारी दुपारी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात शेळ्या चोरी बरोबर पशुधन चोरी घटना वरचेवर घडत आहेत. बोथी येथील शेतकरी केशव कृष्णा काळे यांनी आपल्या घरा शेजारी नेहमी प्रमाणे बांधलेल्या चार लहान मोठ्या शेळ्या किंमत २२ हजार रुपये, दि . ११ सप्टेबर रोजी सायंकाळी ते १२ सप्टेंबर पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास रामेश्वर तांडा पोलीस चौकी प्रमुख सिताराम मस्के करत आहेत.1
- इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.1
- पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.1