Shuru
Apke Nagar Ki App…
दिपक भाऊनी याद मधली एक कविता २६ जानेवारी... आदरणीय दादासाहेब जगदीश देवपूरकर धुळे यासना निवेदन म्हा आयकाले भेटनी निमित्त व्हतं अंकुर साहित्य संघ जिल्हा जळगाव शाखा चाळीसगाव आयोजित कवी आणि सूत्रसंचालक सन्मान सोहळा...
Gaurav kumar
दिपक भाऊनी याद मधली एक कविता २६ जानेवारी... आदरणीय दादासाहेब जगदीश देवपूरकर धुळे यासना निवेदन म्हा आयकाले भेटनी निमित्त व्हतं अंकुर साहित्य संघ जिल्हा जळगाव शाखा चाळीसगाव आयोजित कवी आणि सूत्रसंचालक सन्मान सोहळा...
More news from Chalisgaon and nearby areas
- चाळीसगाव बसस्थानका समोरील खड्डा त्वरित बुजा...व प्रशासनाने ते पाणी बाजूच्या नालीत काढावे...अन्यथा आम्ही पण असच आंदोलन सुरु ठेऊ... #जनहिताच्या गोष्टीला कमेंटला का1
- चाळीसगाव बसस्थानका समोरील जीवघेणा खड्डा येत्या आठ दिवसात व्यवस्थित न बुजल्यास जनतेच्या मदतीने तेथे भिक मागो आंदोलन केले जाईल व खड्डा भरण्यात येईल. - संपादक- (साप्ताहिक- खान्देश नगरी) M.A - BCJ (Journalism)1
- चाळीसगाव शिव बाबा1
- "अंकुरच्या कवी कट्टयावर बरसल्या कवितेच्या सरी, सुत्रसंचालकांच्या सन्मानाने बहरली चाळीसगाव नगरी . "1
- गावरान खिल्लारी बैल जोडी अन्वर शेठ चाळीसगाव बैल बाजार1
- गावरान खिल्लारी बैलजोडी आली अन्वर शेठ यांच्या दावणीला चाळीसगाव बाजार मध्ये1
- || श्रीराम || *वारी पंढरीची दिंडी सखारामाची ४* *भडगाव ते नगरदेवळा* भडगाव.इथे भृगु ऋषींचा आश्रम होता.त्यांच्याजवळ सर्वशाखीय विप्र राहत असत.आजही ब्राम्हण समाजाची मोठी संख्या आहे.भृगु ऋषींच्या नावावरून या गावाचे नाव भृगुग्राम असे पडले.त्याचा अपभ्रंश भट्टग्राम आणि पुढे भडगाव असा झाला.रामचंद्र देशपांडे यांना मुघलांनी पाच गावची जहागिरी दिली होती.ते मरण पावल्यावर मुघल सरदार त्यांची पत्नी लाडकुबाईला जुमानीत नव्हता. लाडकुबाईने अठरा दिवस बऱ्हाणपूरला वेढा दिला होता आणि मुघल सैन्याचा पराभव करून आपला अधिकार कायम राखला होता.इथे पेशवेकालीन रिद्धी सिद्धी गणेशाचे मंदिर प्रसिद्ध आहे.नागपूर मोहिमेसाठी जाताना सैन्याचा तळ इथे होता. त्यावेळी हे मंदिर बांधलेले आहे.भडगावचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत येथील शाळेत शिक्षक होते.१८९७ ते १९०१ या काळात कार्यरत होते. गावाजवळून वाहणाऱ्या गिरणा नदीच्या रम्य परिसराची त्यांना मोहिनी पडली होती. गिरणेच्या काठावर बसूनच त्यांनी तुतारी, सतारीचे बोल, नवा शिपाई, दिवाळी या त्यांच्या गाजलेल्या कविता त्यांना इथेच सुचल्या आहेत. समोर महाजनांच्या घरी स्नान संध्या करून कार्यालयात आलो तेंव्हा महाराज आन्हिक आणि पूजेसाठी खाली उतरत होते.गुलाबी रंगाचे सोललेल्या डाळिंबाच्या दाण्यासारख्या-नुकत्याच उमललेल्या नाजूक कोवळ्या फुलासारख्या रंगाचे सोवळं नेसलेले होते.त्यात महाराजांचे मूळचे सुंदर रूप अधिकच खुलून दिसत होते. *मग काश्मिराचें स्वयंभ । कां रत्नबीजा निगाले कोंभ ।अवेवकांतिची भांभ । तैसी दीसे ॥ ना तरि संध्यारागिचे रंग । काढूनि वळीलें तें आंग । किं अंतर्ज्योतिचें लिंग ।निर्वाळीलें ॥* ज्ञानेश्वरी ६.२५३/२५४ ॥ देवपूजा,भागीरथी झाली.आज दुपारपर्यंत अभयदादा नसल्याने महाराजाना देवपूजेसाठी जास्त वेळ लागणार आहे.पण ते करीत असलेली देवपूजा पाहण्यासारखी असते.आपण पूजा 'उरकतो' पण महाराजांचे तसे नाही.ते अगदी तल्लीन होऊन निगुतीने पूजा करतात.पूजा झाल्यावर लगेच भोजन झाले.दिंडी पुढे निघाली.महाराज देशमुख महाविद्यालयात कार्यक्रमासाठी आले.महाविद्यालयात विश्वस्त जोशी साहेब आणि प्राचार्य गायकवाड सरांनी महाराजांचा सत्कार केला.निर्मल वारी उपक्रमासाठी येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सेवा देत आहेत.निर्मल वारी ची पहिली बैठक अमळनेरला झाली असल्याचे महाराजांनी सांगितले. त्यात ठरल्याप्रमाणे या वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी काम करीत आहेत.अजून काही चर्चा झाली.महाविद्यालय परिसरात महाराजांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम झाल्यावर भडगावातील पानसुपारी सुरू झाली.ऊन फार कळकळ करीत होते.कितीही पाणी प्यायले तरी तहान भागत नव्हती.महादेव मंदिर,राम मंदिर,पंचायतन मंदिर अशा पानसुपारी करीत गोपालकृष्ण मंदिरात पोचलो.जळगाव हुन गिरीशजी कुलकर्णी सखा संदेश मासिकाचे जून महिन्याचे अंक घेऊन आले.श्री महाराजांचे हस्ते सदर अंकाचे विमोचन करण्यात आले.यावेळी सर्व शिष्य परिवाराने आणि भक्तानी नोंदणी करण्याचे आवाहन महाराजांनी केले. या मासिकासाठी अध्यात्मिक अनुभव पर काही लेख पाठविण्याची त्यांनी सर्वांना सूचना केली.सखा संदेश च्या वार्षिक नोंदणी सभासदत्वासाठी या परिसरातील शिष्य परिवाराने देशपांडे नाना 94222 83656 यांच्याशी संपर्क साधावा किंवा लालसरे काका 94204 02503 महेशदादा 942132 9409 आणि माझ्याशीही 77760 32873 संपर्क करू शकता.दुपारचे रणरणते ऊन होते.पानसुपारी झाल्यावर देशपांडेच्या घरी विश्रांतीसाठी गेलो.आता ऊन उतरल्यावर पुढे निघायचे आहे.विश्रांती झाल्यावर संध्याकाळी थोडा उपमा खाऊन नगरदेवळ्याकडे निघालो.बाजारपेठेतून जात असताना समोर मारुती मंदिर लागले.त्या आधीच महाराजांनी बापूला नारळ घ्यायला सांगितला होता.वारीमध्ये दिंडी गावातून बाहेर पडताना ज्या गावात समोर मारुतीचे मंदिर लागेल तिथे श्रीफळ वाढवूनच पुढे निघतात.मुख्य रस्त्याला लागलो.दुकानदार व्यापारी महाराजांना सामोरे येत होते.त्यांच्या विनंतीला मान देऊन महाराज त्यांच्या दुकानात जात होते.पानसुपारी झाल्यावर महराज स्वतः त्यांच्या गल्ल्यात आशीर्वाद म्हणून काही रुपये टाकत होते. रस्त्यात शेवटी टोनगावकर परिवाराने कॉफी आणली.काही वेळाने महाराजांना नमस्कार करून त्यांनी निरोप घेतला.आता त्यांना पुन्हा वर्षभराने ही सेवा घडेल.म्हणून महाराजांना निरोप देताना शिष्यवर्ग भावूक होतो,त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं. चालत पुढे निघालो.महाराज महेश दादांना म्हणाले,'पारोळ्याला जाताना डॉ. अक्षय शी बोलत होतो तेंव्हा तू पुढे गेला होता.गुरुकृपा, गुरूनिष्ठा यावर बोलणे आमचे बोलणे चालले होते.' तोच विषय घेऊन महाराज बोलू लागले,'गुरूवर श्रद्धा ठेवा किंवा नका ठेवू पण गुरुमंत्रावर श्रद्धा ठेवा.तो मंत्रच तुम्हाला तारील.गुरू करणं आणि गुरू करून घेणं यात फरक आहे.आता आपल्याकडे एखादा येतो.त्याची काही काम व्हावं अशी इच्छा असते.आपण त्याला मंत्र देतो,उपासना देतो त्यावेळी त्याचं काम होऊन जातं.त्याला प्रचिती आली की तो इतरांना सांगतो.मग अजून कोणाला वाटतं की आपलंही काम व्हावं तेंव्हा तोही येतो.आपण त्यालाही मंत्र देतो.पण आधीच्याची जशी श्रद्धा असते तशी याची नसते.याच्या मनात संदेह उत्पन्न होतो की खरंच आपलं काम होईल का? संशय निर्माण झाला की काम होत नाही.गुरू करणं आणि गुरू करून घेणं यात फरक काय.तर आपल्याला काही प्रचिती आली, त्यामुळे भाव जागृत झाला आणि मग समर्पण होऊन त्याने गुरुमंत्र घेतला.त्याने मनापासून आपल्याला गुरू मानलं आहे.आणि जो इतरांना आलेली प्रचिती पाहून गुरुकडे आला आणि इतरांचे पाहून त्याने गुरूमंत्र घेतला. हे गुरू करून घेणं आहे.त्याचा भाव जागृत झाला नाही,पूर्ण समर्पण नाही,पूर्ण श्रद्धा नाही.त्यामुळे उपासना फळत नाही.' *अचुक येत्न करवेना । म्हणौन केलें तें सजेना ।आपला अवगुण जाणवेना ।कांहीं केल्यां ॥ जो आपला आपण नेणे । तो दुस-याचे काये जाणे । न्याये सांडितां दैन्यवाणे । होती लोक।।* दासबोध : १२/०२/०६-०७ फाट्यावरून आत वळलो.दिवस मावळत होता.दुतर्फा झाडी असलेल्या निर्मनुष्य रस्त्याने जात होतो.महेश दादाच्या गाडी चालवण्यासाठी आलेल्या रोहितच्या वडिलांचा-धर्मराज मामांचा विषय निघाला.ते मागच्या वर्षीपर्यंत नेमाने गाडी चालवायला यायचे.श्रीमंत शेतकरी पण वारकऱ्यांची काही सेवा घडावी या हेतूने ते येत असत.सहा महिन्यांपूर्वी ते शांत झाले. त्यांचा मुलगा रोहित यावर्षी सेवा देण्यासाठी आला आहे.अतिशय शांत सरळ आणि थोडा लाजाळू स्वभावाचा आहे.वडील सेवा करायचे म्हणून त्यांच्या पश्चात हा ही सेवा करायला आला आहे.सतीच्या वडगावात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पानसुपारी झाली.पुढे नदी ओलांडून स्वामींच्या वडगावला गेलो.इथे पूर्णानंद स्वामींचे मंदिर आहे म्हणून हे स्वामींचे वडगाव.नागापूरकरांचे एक नातेवाईक जज्ज (न्यायाधीश) त्यांचे शिष्य होते.असे महाराजांनी सांगितले.आता चांगलाच अंधार पडला होता. नगरदेवळा गावात पोचलो.इथल्या सखाराम महाराज मंदिराचे बांधकाम चालू आहे.त्याची पाहणी करून काही आवश्यक सूचना करून महाराज निघाले. चालत चालत ग्रामजोशी अतुल काळेच्या घरी पोचले.यावर्षी दोन्ही दिवस दिंडी त्यांच्याकडेच आहे.त्यांच्या घरातील विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी वाचन झाले मग भोजन झाले.त्यानंतर नेहमीप्रमाणे गुड्डू शेठ च्या घरी झोपायला गेलो. सद्गुरू सखाराम महाराज की जय. --------------------------------__________ -----------------------------_____________ *https://www.facebook.com/bhatusonar32/* *https://www.youtube.com/bhatusonar3833* *instagarm.com/shree_sant_sakharam_maharaj_* *https://t.me/+inaH4xvrUHs5ZjJl*1
- # भगवा बॅंड #भडगाव 4444 | 🥁👌एकच नंबर आवाज भाऊ | HD 🤩1