logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या* सदस्यांची अध्यक्षा शिल्पा खोत यांच्याकडे मागणी; २२ वर्षांची परंपरा खंडित होऊ देणार नसल्याचा निर्धार * कोल्हापूर, दि. २७ : जिल्हा परिषद कार्यालयात गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय तत्काळ मागे घेऊन यंदाही जिल्हा परिषदेत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, अशी मागणी सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव, अतिश शिंगे, इंद्रजीत पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील आणि राहुल आवळे यांनी गुरुवारी अध्यक्षा शिल्पा खोत यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी गणेशोत्सवाची २२ वर्षांची परंपरा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. निवेदनात म्हटले आहे की, २००४ पासून जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र यंदा एका तक्रारीच्या अनुषंगाने ही दीर्घकाळाची परंपरा बंद करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. हा निर्णय खेदजनक असून सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाला राज्यस्तरीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असताना प्रशासकीय स्तरावरही या उत्सवाला चालना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव रद्द न करता पूर्वीप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली. “गेली २२ वर्षे जिल्हा परिषदेत सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नाही. आवश्यक असल्यास गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यासाठी आम्ही सर्व सदस्य एकत्रितपणे पुढाकार घेऊ,” अशी भूमिका सदस्य शिवाजी जाधव यांनी व्यक्त केली. दरम्यान, या विषयावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांचीही भेट घेऊन गणेशोत्सव रद्द करण्याच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सदस्यांनी सांगितले. हिंदू एकता आंदोलनाकडून सदस्यांचे अभिनंदन जिल्हा परिषद सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांनी स्वागत केले आहे. २२ वर्षांची परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सर्व संबंधित जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या प्रयत्नांना श्री गणेश यश देवो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली आहे. —

53 min ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
53 min ago
b82506fc-6510-4726-96f2-4b55ebdd0982

जिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या* सदस्यांची अध्यक्षा शिल्पा खोत यांच्याकडे मागणी; २२ वर्षांची परंपरा खंडित होऊ देणार नसल्याचा निर्धार * कोल्हापूर, दि. २७ : जिल्हा परिषद कार्यालयात गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा यंदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय तत्काळ मागे घेऊन यंदाही जिल्हा परिषदेत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, अशी मागणी सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव, अतिश शिंगे, इंद्रजीत पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील आणि राहुल आवळे यांनी गुरुवारी अध्यक्षा शिल्पा खोत यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी गणेशोत्सवाची २२ वर्षांची परंपरा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. निवेदनात म्हटले आहे की, २००४ पासून जिल्हा परिषदेत अत्यंत उत्साहात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र यंदा एका तक्रारीच्या अनुषंगाने ही दीर्घकाळाची परंपरा बंद करण्याचा निर्णय झाल्याचे समजते. हा निर्णय खेदजनक असून सांस्कृतिक परंपरेचा सन्मान राखणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाला राज्यस्तरीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असताना प्रशासकीय स्तरावरही या उत्सवाला चालना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव रद्द न करता पूर्वीप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली. “गेली २२ वर्षे जिल्हा परिषदेत सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ देणार नाही. आवश्यक असल्यास गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यासाठी आम्ही सर्व सदस्य एकत्रितपणे पुढाकार घेऊ,” अशी भूमिका सदस्य शिवाजी जाधव यांनी व्यक्त केली. दरम्यान, या विषयावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांचीही भेट घेऊन गणेशोत्सव रद्द करण्याच्या निर्णयाबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सदस्यांनी सांगितले. हिंदू एकता आंदोलनाकडून सदस्यांचे अभिनंदन जिल्हा परिषद सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांनी स्वागत केले आहे. २२ वर्षांची परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सर्व संबंधित जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या प्रयत्नांना श्री गणेश यश देवो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली आहे. —

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी # **कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या **रक्षाबंधनाच्या सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.** शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी, आकर्षक आणि पारंपरिक राख्यांची दुकाने थाटली असून, राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाजारात **अगदी १ रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या** उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाईन्सच्या राख्यांपासून ते मोती, खडे, रुद्राक्ष, चंदन आणि पारंपरिक कलाकुसरीच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता पाहायला मिळत आहे. मात्र, आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांची रेलचेल असली तरी अनेक बहिणींची पसंती अजूनही **पारंपरिक राख्यांनाच** असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साधी, सुंदर आणि प्रेमाची आठवण करून देणारी राखी घेण्यासाठी बहिणींची गर्दी होत आहे. राखी हा केवळ एक धागा नाही; त्यात **बालपणीच्या आठवणी, भावंडांचे भांडण, प्रेम, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे एक न बोललेले वचन** दडलेले असते. त्यामुळे राखीची किंमत किती आहे यापेक्षा ती बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारे प्रेम आणि भावाच्या मनात निर्माण होणारी आपुलकी अधिक मौल्यवान ठरते. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटण्याची ओढ वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांसोबतच **भाऊसाठी खास भेटवस्तू आणि गोडधोड पदार्थांच्या खरेदीलाही वेग** आला आहे. यंदाच्या रक्षाबंधनात महागडी भेटवस्तू नको, तर **बहिणीच्या हातातील राखी आणि भावाच्या मनातील प्रेमाचा धागा कायम घट्ट राहावा**, अशीच भावना बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
    1
    रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी

# 
**कोल्हापूर  २७ सिटी न्यूज नेटवर्क 
भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या **रक्षाबंधनाच्या सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.** शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी, आकर्षक आणि पारंपरिक राख्यांची दुकाने थाटली असून, राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे.
यंदा बाजारात **अगदी १ रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या** उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाईन्सच्या राख्यांपासून ते मोती, खडे, रुद्राक्ष, चंदन आणि पारंपरिक कलाकुसरीच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता पाहायला मिळत आहे.
मात्र, आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांची रेलचेल असली तरी अनेक बहिणींची पसंती अजूनही **पारंपरिक राख्यांनाच** असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साधी, सुंदर आणि प्रेमाची आठवण करून देणारी राखी घेण्यासाठी बहिणींची गर्दी होत आहे.
राखी हा केवळ एक धागा नाही; त्यात **बालपणीच्या आठवणी, भावंडांचे भांडण, प्रेम, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे एक न बोललेले वचन** दडलेले असते. त्यामुळे राखीची किंमत किती आहे यापेक्षा ती बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारे प्रेम आणि भावाच्या मनात निर्माण होणारी आपुलकी अधिक मौल्यवान ठरते.
नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटण्याची ओढ वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांसोबतच **भाऊसाठी खास भेटवस्तू आणि गोडधोड पदार्थांच्या खरेदीलाही वेग** आला आहे.
यंदाच्या रक्षाबंधनात महागडी भेटवस्तू नको, तर **बहिणीच्या हातातील राखी आणि भावाच्या मनातील प्रेमाचा धागा कायम घट्ट राहावा**, अशीच भावना बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    30 min ago
  • अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता . कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला . या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला . या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .
    4
    अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री  दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन 
एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता .
कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत  दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर   'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात  स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला .
या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला .      या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे  गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य  विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या .
या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म  बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .
    user_Rajendra Makote
    Rajendra Makote
    आरोग्य सेवक - पत्रकार करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! हिमनद्या वितळल्याने तयार झालेले काही हिमनदीय तलाव नैसर्गिक माती-बर्फ-दगडांच्या बांधांनी अडवलेले असतात. हा बांध तुटला की प्रचंड वेगाने पाणी, चिखल, दगड आणि बर्फाचा लोंढा दरीत खाली धावतो. यालाच म्हणतात GLOF - Glacial Lake Outburst Flood. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वेगाने वितळत असताना हिमालयातील अशा तलावांचा धोका का वाढतोय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला GLOF बद्दल आधी माहिती होती का? कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर शेअर करा. GLOF | Glacial Lake Outburst Flood | GLOF meaning | GLOF explained in Marathi | Glacial Lake | Himalayan Glaciers | Himalayan Flood | हिमालयातील पूर | हिमनदी | हिमनदी वितळणे | ग्लेशियल लेक | ग्लोबल वॉर्मिंग | Climate Change | हिमालयातील संकट |
    1
    हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! 
हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! 
हिमनद्या वितळल्याने तयार झालेले काही हिमनदीय तलाव नैसर्गिक माती-बर्फ-दगडांच्या बांधांनी अडवलेले असतात. हा बांध तुटला की प्रचंड वेगाने पाणी, चिखल, दगड आणि बर्फाचा लोंढा दरीत खाली धावतो.
यालाच म्हणतात GLOF - Glacial Lake Outburst Flood.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वेगाने वितळत असताना हिमालयातील अशा तलावांचा धोका का वाढतोय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
तुम्हाला GLOF बद्दल आधी माहिती होती का?
कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर शेअर करा.
GLOF | Glacial Lake Outburst Flood | GLOF meaning | GLOF explained in Marathi | Glacial Lake | Himalayan Glaciers | Himalayan Flood | हिमालयातील पूर | हिमनदी | हिमनदी वितळणे | ग्लेशियल लेक | ग्लोबल वॉर्मिंग | Climate Change | हिमालयातील संकट |
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला
    1
    खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . 
खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!
    1
    कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    22 hrs ago
  • अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; ३० हून अधिक मंडळांचा सहभाग, सामाजिक सलोख्याचा संदेश
    1
    अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; ३० हून अधिक मंडळांचा सहभाग, सामाजिक सलोख्याचा संदेश
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.
    4
    लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
    1
    जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.