मौजे चंदनपूर काँग्रेसमुक्त, शेकडो कार्यकर्त्यांचा माझ्या उपस्थितीत जाहीर भाजपा प्रवेश: आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघातील मौजे चंदनपूरला काँग्रेसमुक्त करीत येथील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काल माझ्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. या सर्व नवप्रवेशितांचे भाजपात हार्दिक स्वागत करून राष्ट्रकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाचे विकासात्मक धोरण आणि लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला आहे. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्वश्री पंढरीनाथ पाटील इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, एकनाथ आत्माराम गवई उपसरपंच, फकीरबा पाटील माजी सरपंच कवठळ, ज्ञानेश्वर वाघमारे उपसरपंच, मधुकर गवई, नारायण सीताराम इंगळे, ज्ञानबा लक्ष्मण गवई, सुधाकर तुकाराम गवई, संदीप भाऊराव वानखेडे, रवींद्र गवई, गजानन नाना गवई, नारायण श्यामराव इंगळे, पंढरी रामराव इंगळे, राजू सखाराम इंगळे, राजू जगन्नाथ इंगळे, विष्णू सखाराम इंगळे, विनोद ज्ञानेश्वर इंगळे, संदीप दामोदर गवई, सिद्धेश्वर सखाराम इंगळे, दत्ता जगन्नाथ इंगळे, संजय किशोर गवई, विकास बाजीराव इंगळे, समाधान कानोबा गवई, दीपक शंकर गवई, संदीप भगवान गवई, योगेश प्रल्हाद भारती, गोपाल भारती, गणेश मनोहर भारती, विष्णू सखाराम इंगळे, विनोद कानोबा गवई, प्रा. आकाश गवई, योगेश ब्रह्मदेव गवई, राजू आत्माराम गवई, रंगनाथ आत्माराम गवई, अक्षय भास्कर गवई, दीपक खरात, सागर मुकुंदा गवई, किशोर मधुकर गवई, सागर फकीरा गवई, किशोर मधुकर गवई, नंदकिशोर सुधाकर गवई, ज्ञानेश्वर रवींद्र गवई, आकाश गजानन गवई, ऋषिकेश दामोदर गवई, मनोज अशोक गवई, किशोर रवींद्र गवई, अक्षय रंगनाथ गवई, योगेश नारायण इंगळे, गोपाल विठ्ठल इंगळे आदींनी पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यास मा. डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुकाध्यक्ष भाजप, योगेश राजपूत विधानसभा संयोजक, श्रीकांत इंगळे सरपंच चंदनपूर, विलास शेठ चव्हाण, श्रीराम कऱ्हाडे सरपंच कवठळ, पंढरीनाथ गावंडे, निखिल पडघन, गणेशराव म्हस्के सरपंच गांगलगाव, विष्णूभाऊ इंगळे माजी सरपंच, विजयजी खरे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, विलास इंगळे तालुका सरचिटणीस, नवलसिंग इंगळे, सोमेश इंगळे, मुकेश पडघान, नीलेश चांदोरे, पंजाबराव देशमुख, कृष्णा सपकाळ, गणेशराव वाघमारे यांच्यासह महिला भगिनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजे चंदनपूर काँग्रेसमुक्त, शेकडो कार्यकर्त्यांचा माझ्या उपस्थितीत जाहीर भाजपा प्रवेश: आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघातील मौजे चंदनपूरला काँग्रेसमुक्त करीत येथील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काल माझ्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. या सर्व नवप्रवेशितांचे भाजपात हार्दिक स्वागत करून राष्ट्रकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाचे विकासात्मक धोरण आणि लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला आहे. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते सर्वश्री पंढरीनाथ पाटील इंगळे, ज्ञानेश्वर इंगळे, एकनाथ आत्माराम गवई उपसरपंच, फकीरबा पाटील माजी सरपंच कवठळ, ज्ञानेश्वर वाघमारे उपसरपंच, मधुकर गवई, नारायण सीताराम इंगळे, ज्ञानबा लक्ष्मण गवई, सुधाकर तुकाराम गवई, संदीप भाऊराव वानखेडे, रवींद्र गवई, गजानन नाना गवई, नारायण श्यामराव इंगळे, पंढरी रामराव इंगळे, राजू सखाराम इंगळे, राजू जगन्नाथ इंगळे, विष्णू सखाराम इंगळे, विनोद ज्ञानेश्वर इंगळे, संदीप दामोदर गवई, सिद्धेश्वर सखाराम इंगळे, दत्ता जगन्नाथ इंगळे, संजय किशोर गवई, विकास बाजीराव इंगळे, समाधान कानोबा गवई,
दीपक शंकर गवई, संदीप भगवान गवई, योगेश प्रल्हाद भारती, गोपाल भारती, गणेश मनोहर भारती, विष्णू सखाराम इंगळे, विनोद कानोबा गवई, प्रा. आकाश गवई, योगेश ब्रह्मदेव गवई, राजू आत्माराम गवई, रंगनाथ आत्माराम गवई, अक्षय भास्कर गवई, दीपक खरात, सागर मुकुंदा गवई, किशोर मधुकर गवई, सागर फकीरा गवई, किशोर मधुकर गवई, नंदकिशोर सुधाकर गवई, ज्ञानेश्वर रवींद्र गवई, आकाश गजानन गवई, ऋषिकेश दामोदर गवई, मनोज अशोक गवई, किशोर रवींद्र गवई, अक्षय रंगनाथ गवई, योगेश नारायण इंगळे, गोपाल
विठ्ठल इंगळे आदींनी पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यास मा. डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुकाध्यक्ष भाजप, योगेश राजपूत विधानसभा संयोजक, श्रीकांत इंगळे सरपंच चंदनपूर, विलास शेठ चव्हाण, श्रीराम कऱ्हाडे सरपंच कवठळ, पंढरीनाथ गावंडे, निखिल पडघन, गणेशराव म्हस्के सरपंच गांगलगाव, विष्णूभाऊ इंगळे माजी सरपंच, विजयजी खरे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, विलास इंगळे तालुका सरचिटणीस, नवलसिंग इंगळे, सोमेश इंगळे, मुकेश पडघान, नीलेश चांदोरे, पंजाबराव देशमुख, कृष्णा सपकाळ, गणेशराव वाघमारे यांच्यासह महिला भगिनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- *राज्यात सध्या 'खरात' प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. नेमके काय आरोप केलेत श्याम मानवांनी? पाहूया हा रिपोर्ट.बुलढाण्यातील शासकीय विश्रामगृहात आज श्याम मानव यांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच गाजली. २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर, २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचे श्याम मानवांनी म्हटले आहे.अंमलबजावणीसाठी समिती नेमली गेली, परंतु निधी मिळवण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार चकरा माराव्या लागल्या. सरकारने आपल्याला केवळ 'झुलवत' ठेवले, असा थेट आरोप त्यांनी केला.केवळ वरिष्ठ पातळीवरच नव्हे, तर स्थानिक स्तरावरही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचे सांगत, एका भाजप नगरसेवकाने प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.काँग्रेसच्या कार्यकाळात अशा कार्यात कधीही अडथळा आला नव्हता, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात उदासीनता दाखवली जात असल्याचे मानवांनी सूचित केले.1
- पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.1
- महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे. यंदा पाऊस कसा राहणार? शेती पिकांची स्थिती काय असेल? बाजारभाव कसे राहू शकतात? आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. ग्रामीण भागात या संकेतांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा – पावसाचा अंदाज यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते. सुरुवातीच्या सरींमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी-नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो. मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. शेती पिकांबाबत मोठे संकेत यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे. विशेषतः: कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते. मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बाजारभाव कसे राहू शकतात? घटमांडणीनुसार काही पिकांना चांगला दर मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः: कापूस तीळ या पिकांमध्ये चांगली तेजी राहू शकते. तर काही डाळी व इतर पिकांमध्ये चढ-उतार राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. जनजीवनावर परिणाम जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात: रस्ते वाहतूक विस्कळीत होणे वीजपुरवठा खंडित होणे पूरस्थिती निर्माण होणे शेतातील नुकसान होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला पेरणी घाईघाईत करू नका. स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या. पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा. बियाणे, खत आणि औषधे आधीच तयार ठेवा. पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा. महत्वाची सूचना मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे. हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष एकूणच पाहता, यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे.1
- * जळगाव जामोद तालुक्यातील भेडवळ येथील घट मांडनी चे भाकीत राजा काय पण तनावात राहील युद्ध जण्य परीस्तीती राहील*1
- खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.1
- छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर हिवरखेड येथे संपन्न1
- Post by नंदकिशोर साखरकर1
- प्रवाशांना त्रास देणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी; बुलढाणा आगाराचा निर्णय1