श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी समस्या निवारण प्रणालीचा शुभारंभ जळगाव | मेहरुण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण व्हावे, विद्यार्थ्यांना निर्भयपणे आपले मत मांडता यावे तसेच पालकांनाही शाळेच्या गुणवत्ता विकासात सक्रिय सहभाग घेता यावा, या उद्देशाने 'विद्यार्थी समस्या निवारण प्रणाली' आणि 'पालक तक्रार व सूचना पेटी' या अभिनव उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेत 'माझी समस्या – माझे समाधान' ही विद्यार्थी समस्या पेटी तसेच 'पालक तक्रार व सूचना पेटी' उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी शैक्षणिक, शिस्त, स्वच्छता, पिण्याचे पाणी, क्रीडा साहित्य, ग्रंथालय आदी विषयांवरील समस्या तसेच सूचना लेखी स्वरूपात नोंदवू शकतील. त्याचप्रमाणे पालकही आपल्या पाल्याच्या शिक्षणासंदर्भातील अडचणी, शाळेतील सुविधा किंवा विधायक सूचना या पेटीत टाकू शकतील. प्राप्त झालेल्या सूचना व तक्रारींचा आढावा विद्यार्थी संसद, शिक्षक, मुख्याध्यापक आणि आवश्यकतेनुसार पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असून, त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. या व्यवस्थेमुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन शाळेच्या गुणवत्ता विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थी व पालकांना कोणतीही समस्या किंवा विधायक सूचना निःसंकोचपणे मांडण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आणि SQAAF च्या गुणवत्ता निकषांनुसार लोकसहभाग, पारदर्शकता आणि विद्यार्थी-केंद्रित व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थी समस्या निवारण प्रणालीचा शुभारंभ जळगाव | मेहरुण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण व्हावे, विद्यार्थ्यांना निर्भयपणे आपले मत मांडता यावे तसेच पालकांनाही शाळेच्या गुणवत्ता विकासात सक्रिय सहभाग घेता यावा, या उद्देशाने 'विद्यार्थी समस्या निवारण प्रणाली' आणि 'पालक तक्रार व सूचना पेटी' या अभिनव उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेत 'माझी समस्या – माझे समाधान' ही विद्यार्थी समस्या पेटी तसेच 'पालक तक्रार व सूचना पेटी' उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी शैक्षणिक, शिस्त, स्वच्छता, पिण्याचे पाणी, क्रीडा साहित्य, ग्रंथालय आदी विषयांवरील समस्या तसेच सूचना लेखी स्वरूपात नोंदवू शकतील. त्याचप्रमाणे पालकही आपल्या पाल्याच्या शिक्षणासंदर्भातील अडचणी, शाळेतील सुविधा किंवा विधायक सूचना या पेटीत टाकू शकतील. प्राप्त झालेल्या सूचना व तक्रारींचा आढावा विद्यार्थी संसद, शिक्षक, मुख्याध्यापक आणि आवश्यकतेनुसार पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असून, त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. या व्यवस्थेमुळे विद्यार्थी, पालक आणि शाळा यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन शाळेच्या गुणवत्ता विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थी व पालकांना कोणतीही समस्या किंवा विधायक सूचना निःसंकोचपणे मांडण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आणि SQAAF च्या गुणवत्ता निकषांनुसार लोकसहभाग, पारदर्शकता आणि विद्यार्थी-केंद्रित व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- 🚨 जळगांव से गुजरने वाले नेशनल हाईवे पर बड़ा अपडेट! ट्रैफिक रूट में अहम बदलाव, सफर से पहले जान लें ये जरूरी जानकारी1
- 🚨 MD ड्रग्ज जप्त! २ आरोपी जेरबंद ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात आणखी एक मोठी आणि धडक कारवाई करत ६२.०७ ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी हा घातक अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "नशामुक्त भारत" अभियानाअंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात एमडी अंमली पदार्थ आहे. या माहितीच्या आधारे ३१ जुलै २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या इम्रान खान हयात खान, वय ३६, रा. फातेमा नगर, जळगाव याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८८ हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ, २० हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि ५० हजार रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन, रा. मालेगाव, जिल्हा नाशिक याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली. जळगाव जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठ्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.1
- ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत..... वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. वणी अंबोडे येथे कन्हेर नाल्यात खुप मोठा पुर आला. या अचानक आलेल्या पावसामुळे व आलेल्या पुराने काठावर रहाणाऱ्या सर्व घरात पाणी गेले. सर्व घरात चिखल झाला. निवासी जन जिव घेवून पळाले. पण गृहोपयोगी साहित्यावर पाणी फिरले.काही घरे वाहुन गेले. नाल्यात या चार माणसे वाहुन गेली. दोन बेपत्ता आहेकपडे लत्ते वह्या पुस्तके ओली झाली.व निरोपयोगी झाली. त्यामुळे जेवण काय करायचं,रहाणार कोठे, झोपणार कोठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.1
- धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी! Dhule News | धुळ्यात मुसळधार पावसाचे थैमान; मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागांसह थेट नागरिकांच्या घरात शिरले पाणी! - #dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #dhulemahanagarpalika #maharashtranews1
- Post by सच के साथ ब्रेकिंग न्यूज1
- ममुराबाद येथील श्री गुरु गोरक्षनाथ गोशाळेसह परिसर जलमय; गोशाळेत पाणी शिरल्याने चारा भिजला, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोठा फटका ममुराबाद (प्रतिनिधी): सततच्या पावसामुळे ममुराबाद येथील श्री कृष्णावतारी गुरु गोरक्षनाथ गोशाळा परिसरात चारही बाजूंनी पाणी साचले असून गोशाळेतही पाणी शिरले आहे. त्यामुळे गोशाळेत साठवून ठेवलेला जनावरांचा चारा भिजून खराब झाला असून जनावरांच्या देखभालीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाविक व गोसेवकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच व सदस्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याचप्रमाणे गावातील उर्दू शाळा व पटेल वाडा परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला असून परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी गोशाळा, उर्दू शाळा व परिसरातील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून स्वच्छतेची उपाययोजना करावी, तसेच कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारावी, अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.3