व्यावसायिक समाजकार्य शिक्षणात सैद्धांतिक ज्ञान, क्षेत्रकार्य आणि संशोधन ही त्रीसुत्री महत्वाची. विद्यार्थ्याला व्यवसायभिमुख आणि कौशल्याधिष्ठित बनविण्याचा प्रयत्न-प्रोफेसर डॉ.संजय गवई. व्यावसायिक समाजकार्य शिक्षणात सैद्धांतिक ज्ञान, क्षेत्रकार्य आणि संशोधन ही त्रीसुत्री महत्वाची. विद्यार्थ्याला व्यवसायभिमुख आणि कौशल्याधिष्ठित बनविण्याचा प्रयत्न-प्रोफेसर डॉ.संजय गवई. शूरू ॲप, मराठी न्यूज. लातूर प्रतिनिधी, दि. ३१ मार्च भारतामध्ये व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाची सुरुवात सन १९३६ रोजी टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबईच्या माध्यमातून झाली. त्यानंतर बी.एस.डब्ल्यू., एम.एस.डब्ल्यू., एम.फिल आणि पीएच.डी. या व्यावसायिक समाजकार्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून आज समाजात सामाजिक अभियंते, मनोविकार तज्ञ, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, कौटुंबिक सम्युपदेशक, उद्योजक, संस्थाचालक, शेतकरी, प्रशासकीय अधिकारी, लेखक, कवि आणि सामाजिक कार्यकर्ते निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. या अभ्यासक्रमामध्ये व्यावसायिक समाजकार्याचे सैद्धांतिक ज्ञान, व्यक्ती, गट आणि समुदायासोबत केलेले क्षेत्रकार्य आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले समाजकार्य संशोधन ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील प्रोफेसर डॉ.संजय गवई यांनी केले. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, नांदेड यांच्यावतीने महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये “व्यावसायिक समाजकार्य शिक्षणात क्षेत्रकार्याचे महत्त्व” या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एन.जी.पाटील हे होते तर विचारमंचावर डॉ.प्रतिभा लोखंडे, डॉ.विद्याधर रेड्डी आणि प्रा.सुनील गोईनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.गवई म्हणाले की, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला व्यवसायभिमुख आणि कौशल्याधिष्ठित बनविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, समाजकार्य, चालू घडामोडी, पर्यावरण, मराठी, हिंदी साहित्य आणि सूशासन आदि विविध विषयाचे अध्यापन आणि अध्ययन केले जाते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ.एन.जी.पाटील म्हणाले की, व्यावसायिक समाजकार्य शिक्षणामध्ये क्षेत्रकार्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या महाविद्यालयात सैद्धांतिक ज्ञानासोबत क्षेत्रकार्य आणि संशोधन कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतिने सहकारी प्राध्यापक आणि क्षेत्रकार्य संस्था पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाने आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पूर्ण केले जाते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.दिलीप काठोडे, डॉ.अंबादास कर्डिले, डॉ.सत्वशीला वरगंटे, प्रा.गोपाळ बडगिरे, ग्रंथपाल सुनील राठोड आणि राजेश्वर पाळेकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रतिभा लोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.सुनील बोईनवाड यांनी आणि आभार डॉ.विद्याधर रेड्डी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय सुताडे आणि गणेश तेलंग यांनी परिश्रम घेतले.
व्यावसायिक समाजकार्य शिक्षणात सैद्धांतिक ज्ञान, क्षेत्रकार्य आणि संशोधन ही त्रीसुत्री महत्वाची. विद्यार्थ्याला व्यवसायभिमुख आणि कौशल्याधिष्ठित बनविण्याचा प्रयत्न-प्रोफेसर डॉ.संजय गवई. व्यावसायिक समाजकार्य शिक्षणात सैद्धांतिक ज्ञान, क्षेत्रकार्य आणि संशोधन ही त्रीसुत्री महत्वाची. विद्यार्थ्याला व्यवसायभिमुख आणि कौशल्याधिष्ठित बनविण्याचा प्रयत्न-प्रोफेसर डॉ.संजय गवई. शूरू ॲप, मराठी न्यूज. लातूर प्रतिनिधी, दि. ३१ मार्च भारतामध्ये व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाची सुरुवात सन १९३६ रोजी टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबईच्या माध्यमातून झाली. त्यानंतर बी.एस.डब्ल्यू., एम.एस.डब्ल्यू., एम.फिल आणि पीएच.डी. या व्यावसायिक समाजकार्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून आज समाजात सामाजिक अभियंते, मनोविकार तज्ञ, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, कौटुंबिक सम्युपदेशक, उद्योजक, संस्थाचालक, शेतकरी, प्रशासकीय अधिकारी, लेखक, कवि आणि सामाजिक कार्यकर्ते निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. या अभ्यासक्रमामध्ये व्यावसायिक समाजकार्याचे सैद्धांतिक ज्ञान, व्यक्ती, गट आणि समुदायासोबत केलेले क्षेत्रकार्य आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले समाजकार्य संशोधन ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील प्रोफेसर डॉ.संजय गवई यांनी केले. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय आणि संशोधन केंद्र, नांदेड यांच्यावतीने महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये “व्यावसायिक समाजकार्य शिक्षणात क्षेत्रकार्याचे महत्त्व” या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक
म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एन.जी.पाटील हे होते तर विचारमंचावर डॉ.प्रतिभा लोखंडे, डॉ.विद्याधर रेड्डी आणि प्रा.सुनील गोईनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.गवई म्हणाले की, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला व्यवसायभिमुख आणि कौशल्याधिष्ठित बनविण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, समाजकार्य, चालू घडामोडी, पर्यावरण, मराठी, हिंदी साहित्य आणि सूशासन आदि विविध विषयाचे अध्यापन आणि अध्ययन केले जाते असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ.एन.जी.पाटील म्हणाले की, व्यावसायिक समाजकार्य शिक्षणामध्ये क्षेत्रकार्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या महाविद्यालयात सैद्धांतिक ज्ञानासोबत क्षेत्रकार्य आणि संशोधन कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतिने सहकारी प्राध्यापक आणि क्षेत्रकार्य संस्था पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाने आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पूर्ण केले जाते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.दिलीप काठोडे, डॉ.अंबादास कर्डिले, डॉ.सत्वशीला वरगंटे, प्रा.गोपाळ बडगिरे, ग्रंथपाल सुनील राठोड आणि राजेश्वर पाळेकर यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रतिभा लोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.सुनील बोईनवाड यांनी आणि आभार डॉ.विद्याधर रेड्डी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय सुताडे आणि गणेश तेलंग यांनी परिश्रम घेतले.
- *तांबाळा क्लबवर शस्त्रधारी दरोडा; कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, पोलिसांच्या हफ्तेखोरीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात!* *➡️नागरिकांचा संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी तीव्र*1
- लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.1
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.4
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1