डॉ. आर एन पाटील यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉक्सिटमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न काळाची पाऊले ओळखून डॉ. आर. एन. पाटील यांनी तंत्रज्ञानाच्या शिक्षणाचे संकुल उभारले - आ.अमित देशमुख लातूर (प्रतिनिधी)येथील रॉयल एज्युकेशन सोसायटी संचलित रोप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने कॉक्सीट च्या प्रांगणात काल सायंकाळी आयोजित संस्थेचे संस्थापक डॉ.एम.आर.पाटील यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभास आमदार अमित विलासराव देशमुख हे मान्यवरांसह उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या . संपूर्ण देशात आणि जगभरात लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा लौकिक पसरलेला आहे. लातूर शहराला शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आणणाऱ्या अनुकरणीय अशा लातूर शैक्षणिक पॅटर्नची निर्मिती आणि त्यात सातत्य राखण्यासाठी बहुमोल असे योगदान देणारे डॉ.एम.आर.पाटील यांनी काळाची गरज ओळखून, येथे अद्यावत शिक्षण देणाऱ्या संकुलाची उभारणी केली आहे, येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आज जगभरात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत, त्यांचे हे कार्य पुढे असेच नियमितपणे चालू राहावे यासाठी त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. आर एन पाटील यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कॉक्सिटमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न काळाची पाऊले ओळखून डॉ. आर. एन. पाटील यांनी तंत्रज्ञानाच्या शिक्षणाचे संकुल उभारले - आ.अमित देशमुख लातूर (प्रतिनिधी)येथील रॉयल एज्युकेशन सोसायटी संचलित रोप्य महोत्सवी वर्ष साजरे
करीत असलेल्या संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने कॉक्सीट च्या प्रांगणात काल सायंकाळी आयोजित संस्थेचे संस्थापक डॉ.एम.आर.पाटील यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभास आमदार अमित विलासराव देशमुख हे मान्यवरांसह उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या . संपूर्ण देशात आणि
जगभरात लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नचा लौकिक पसरलेला आहे. लातूर शहराला शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपाला आणणाऱ्या अनुकरणीय अशा लातूर शैक्षणिक पॅटर्नची निर्मिती आणि त्यात सातत्य राखण्यासाठी बहुमोल असे योगदान देणारे डॉ.एम.आर.पाटील यांनी काळाची गरज ओळखून, येथे अद्यावत शिक्षण देणाऱ्या संकुलाची उभारणी
केली आहे, येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आज जगभरात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत, त्यांचे हे कार्य पुढे असेच नियमितपणे चालू राहावे यासाठी त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे अशा शुभेच्छा याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1
- Post by नागनाथ ससाने1
- ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७% दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या बामणी पाटीजवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण हैद्राबाद येथील असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.2
- नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.1
- अभिनेता विजय थालपती यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.1