वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असल्याने, देवळी पोलिसांनी सन २०२१ पासून ते आतापर्यंत विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूच्या कारवायांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल नष्ट केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी एकूण ११५ गुन्ह्यांतील दारूचा साठा रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आला. या मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत ११,१६,२६०/- रुपये इतकी होती. या कारवाईमध्ये, १०१ गुन्ह्यांतील ५,४१६ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, ज्यांची अंदाजे किंमत ८,६२,०६०/- रुपये होती, तसेच १४ गुन्ह्यांतील १,९८० देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, ज्यांची अंदाजे किंमत २,५४,२००/- रुपये होती, असा एकूण मुद्देमाल देवळी येथील निर्जल स्थळी नेऊन नष्ट करण्यात आला. माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा येथील अधिकारी/अंमलदार, तसेच पंच आणि देवळी येथील पोलीस स्टाफ यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. ही कारवाई वर्ध्याचे पोलीस अधीक्षक साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या निर्देशानुसार, तसेच पुलगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि संदीप कापडे साहेब, पोउपनि अश्विन गजभिये, पोहवा/१३७५ विमलनयन तिवारी, पोहवा/८०९ गणेश खेवले, पोशि/३१० संदीप वाघमारे यांनी सहभाग घेतला. तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वर्धा येथील दुय्यम निरीक्षक डी.वाय. राऊत, दुय्यम निरीक्षक आर.यु. काष्टे आणि इतर तीन अंमलदार यांनी देखील या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असल्याने, देवळी पोलिसांनी सन २०२१ पासून ते आतापर्यंत विविध प्रकारच्या देशी-विदेशी दारूच्या कारवायांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल नष्ट केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी एकूण ११५ गुन्ह्यांतील दारूचा साठा रोडरोलर फिरवून नष्ट करण्यात आला. या मुद्देमालाची एकूण अंदाजित किंमत
११,१६,२६०/- रुपये इतकी होती. या कारवाईमध्ये, १०१ गुन्ह्यांतील ५,४१६ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, ज्यांची अंदाजे किंमत ८,६२,०६०/- रुपये होती, तसेच १४ गुन्ह्यांतील १,९८० देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, ज्यांची अंदाजे किंमत २,५४,२००/- रुपये होती, असा एकूण मुद्देमाल देवळी येथील निर्जल स्थळी नेऊन नष्ट करण्यात आला. माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य उत्पादन
शुल्क विभाग वर्धा येथील अधिकारी/अंमलदार, तसेच पंच आणि देवळी येथील पोलीस स्टाफ यांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली. ही कारवाई वर्ध्याचे पोलीस अधीक्षक साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या निर्देशानुसार, तसेच पुलगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि
संदीप कापडे साहेब, पोउपनि अश्विन गजभिये, पोहवा/१३७५ विमलनयन तिवारी, पोहवा/८०९ गणेश खेवले, पोशि/३१० संदीप वाघमारे यांनी सहभाग घेतला. तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वर्धा येथील दुय्यम निरीक्षक डी.वाय. राऊत, दुय्यम निरीक्षक आर.यु. काष्टे आणि इतर तीन अंमलदार यांनी देखील या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
- महेन्द्र गुप्तामुंबई, मुंबई, महाराष्ट्रन नीउज बराबर थांबत नाही जरा लक्ष्य द्या🙏on 16 June
- Sharankumar Nagnath Patilसोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र🙏on 17 June
- Sharankumar Nagnath Patilसोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र👌on 17 June
- झ मुल्ले लल्ल, अल्लाWarora, Chandrapur😂on 17 June
- User9508Sadak-Arjuni, Gondia💣on 13 June
- भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाच्या एका प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी सीताफिने याला अटक करत एक मोठे यश मिळवले आहे. हा आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या शोधात होता. पोलिसांनी केलेल्या या कारवाईची परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जात आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सध्या सुरू आहे.1
- आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत राज्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. त्यांनी या गंभीर समस्येवर दीर्घकालीन जलधोरण तयार करण्याची, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची आणि आधुनिक जलव्यवस्थापनाची तातडीने अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली.1
- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.1
- अंजनगाव सुर्जी येथील प्रभात नंबर १३ नवगछी प्लँटजवळ गेल्या ५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. याबाबत अंजनगाव नगर परिषदेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसून, हा कचरा उचलण्यासाठी कुणीही आलेले नाही.1
- बनासकांठा जिल्ह्यातील डीसा तालुक्यात असलेल्या मालगाढ गावात आज जोगेश्वर महादेव मंदिरात मोठ्या भक्तिभावाने “प्राणप्रतिष्ठा महोत्सव” साजरा करण्यात आला. मालगाढ गावातील जोगमाया परिक्षेत्रातील भाविक तरुणांच्या आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या सहकार्याने या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिराचा परिसर “हर हर महादेव” च्या गजराने दुमदुमून गेला होता. वैदिक मंत्रोच्चारांसह शास्त्रोक्त विधी-विधानानुसार भगवान जोगेश्वर महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित भाविकांनी भजन-कीर्तन, शिवकथा श्रवण आणि पाट-उपासना करून भगवान शिवाला स्मरले. मूर्ती स्थापनेच्या वेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते, ज्यात ग्रामस्थ आणि तरुणांनी उत्साहाने सहभाग घेऊन धन्यता अनुभवली. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.3
- लोकल ट्रेनमध्ये झालेल्या मयंक हत्याकांडाबाबत पोलिसांनी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपीच्या चौकशीतून अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी करत आहेत.1
- मुंबईत, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत राज्यातील वाढत्या पाणीटंचाईवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे.' प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दीर्घकालीन जलधोरण, पुरेसा निधी आणि प्रभावी अंमलबजावणीची तातडीने आवश्यकता असल्याची आग्रही भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली.1
- लाइव whatasapp नंबर फेसबुक4
- शहरातील व्यस्त फेरूमल चौक परिसरात दोन अज्ञात युवकांनी एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या भयंकर घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी घटना घडवून आणल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी परिसराला घेराव घालून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या हल्लेखोरांचा नेमका उद्देश काय होता? जुनी दुश्मनी होती की अन्य कोणताही कट होता, हे स्पष्ट झालेले नाही. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येने शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.1