महावितरणमधील कंत्राटी कामगारांचे वेतन थकले; आंदोलनाचा इशारा नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर - (दि.१८) : महावितरण अंतर्गत विविध उपकेंद्रांवर कार्यरत कंत्राटी कामगारांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकीत असल्याचा गंभीर आरोप करत तांत्रिक अॅप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात मा. संचालक (मानव संसाधन), महावितरण यांना निवेदन देण्यात आले असून सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी सांगितले. संघटनेच्या निवेदनानुसार स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांना ऑगस्ट २०२५ पासून महावितरणच्या ३२९ उपकेंद्रांवर कंत्राटी कामगार पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र, संबंधित कंपन्यांनी ऑगस्ट २०२५ (स्मार्ट सर्व्हिसेस) व डिसेंबर २०२५ (क्रिस्टल इंटिग्रेटेड) पासून आजतागायत वेतन अदा केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेकडो कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, वाशीम विभागातील कंत्राटी कामगार स्व. केशव वाकुडकर यांचा १ डिसेंबर २०२५ रोजी ड्युटीवर येत असताना अपघाती मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नियमांनुसार मिळणारी भरपाई व आर्थिक मदत अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच स्व. रामभाऊ बोरकर (वाशीम) यांच्या निधनानंतरही संबंधित लाभ न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय कंत्राटी कामगारांना पे-स्लिप देण्यात येत नसल्याची, काही एजन्सीकडून दरमहा १५०० ते २००० रुपये वेतनातून जबरदस्तीने परत घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच ईएसआयसीमध्ये कामगारांच्या कुटुंबीयांची माहिती अद्ययावत नसल्यामुळे वैद्यकीय लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. वाशीम, नागपूर, अकोला, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, भंडारा, गोंदिया आदी मंडळांमध्ये सुरक्षा साहित्य (टी अॅन्ड पी) न दिल्याचाही आरोप आहे. संघटनेने संबंधित सर्व एजन्सींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, थकीत वेतन तातडीने अदा करावे व कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. सात दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील हजारो कंत्राटी कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन तांत्रिक कंत्रा टी कामगार असोसिएशन चे राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, शेख राहील, अतुल पाटील, शंकर जरकड, अनिल चव्हाण, राम कुटे , अनिवेश देशमुख, कुणाल जिचकार, मंगेश चिमोटे, निलेश चक्रपाणी, विकास ठुसे आदिनी केले आहे.
महावितरणमधील कंत्राटी कामगारांचे वेतन थकले; आंदोलनाचा इशारा नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर - (दि.१८) : महावितरण अंतर्गत विविध उपकेंद्रांवर कार्यरत कंत्राटी कामगारांचे अनेक महिन्यांपासून वेतन थकीत असल्याचा गंभीर आरोप करत तांत्रिक अॅप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात मा. संचालक (मानव संसाधन), महावितरण यांना निवेदन देण्यात आले असून सात दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे यांनी सांगितले. संघटनेच्या निवेदनानुसार स्मार्ट सर्व्हिसेस लिमिटेड आणि क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपन्यांना ऑगस्ट २०२५ पासून महावितरणच्या ३२९ उपकेंद्रांवर कंत्राटी कामगार पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र, संबंधित कंपन्यांनी ऑगस्ट २०२५ (स्मार्ट सर्व्हिसेस) व डिसेंबर २०२५ (क्रिस्टल इंटिग्रेटेड) पासून आजतागायत वेतन अदा केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शेकडो कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, वाशीम विभागातील कंत्राटी कामगार स्व. केशव वाकुडकर यांचा १ डिसेंबर २०२५ रोजी ड्युटीवर येत असताना अपघाती मृत्यू झाला. मात्र, अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नियमांनुसार मिळणारी भरपाई व आर्थिक मदत अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच स्व. रामभाऊ बोरकर (वाशीम) यांच्या निधनानंतरही संबंधित लाभ न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय कंत्राटी कामगारांना पे-स्लिप देण्यात येत नसल्याची, काही एजन्सीकडून दरमहा १५०० ते २००० रुपये वेतनातून जबरदस्तीने परत घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच ईएसआयसीमध्ये कामगारांच्या कुटुंबीयांची माहिती अद्ययावत नसल्यामुळे वैद्यकीय लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. वाशीम, नागपूर, अकोला, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, भंडारा, गोंदिया आदी मंडळांमध्ये सुरक्षा साहित्य (टी अॅन्ड पी) न दिल्याचाही आरोप आहे. संघटनेने संबंधित सर्व एजन्सींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, थकीत वेतन तातडीने अदा करावे व कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. सात दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील हजारो कंत्राटी कामगारांनी सहभागी होण्याचे आवाहन तांत्रिक कंत्रा टी कामगार असोसिएशन चे राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, कार्याध्यक्ष विक्की कावळे, सरचिटणीस प्रदीप पाटील, शेख राहील, अतुल पाटील, शंकर जरकड, अनिल चव्हाण, राम कुटे , अनिवेश देशमुख, कुणाल जिचकार, मंगेश चिमोटे, निलेश चक्रपाणी, विकास ठुसे आदिनी केले आहे.
- नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज वृत्तसेवा नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद1
- Post by The Indian Matrimony1
- Post by Samachar king digital1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- कुही तालुक्यात स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे उद्घाटन सेंद्रिय शेतीतून शाश्वत शेतीकडे वाटचालीचे आवाहन ता. प्रतिनिधी कुही :- कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नागपूर अंतर्गत केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दीपस्तंभ ऑरगॅनिक फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, उमरेड-भिवापूर-कुही यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे (बीआरसी लॅब) उद्घाटन आज सकाळी ११ वाजता किन्ही (ता. कुही) येथील संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांच्या शेतावर उत्साहात पार पडले. बीआरसी लॅबचे उद्घाटन उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सेंद्रिय शेतीकडून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वनिर्मित निविष्ठा संसाधन केंद्रामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध होतील, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्यवर्धन करावे, असे त्यांनी सुचविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदराव राऊत, उपाध्यक्ष मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, बेला होते. त्यांनी शाश्वत शेतीमुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊ शकतो, असे सांगत जैविक संसाधन केंद्राच्या माध्यमातून कमी दरात निविष्ठा उपलब्ध होण्याचा फायदा अधोरेखित केला. विभागीय कृषी सहसंचालक नागपूर उमेश घाटगे यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांमध्ये बदल करून फळबाग लागवडीकडे वळावे, त्यामुळे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन केले. कृषिविद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, कृषी महाविद्यालय नागपूर यांनी ‘१० ड्रम थेअरी’ संदर्भात तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रकल्प संचालक आत्मा नागपूर डॉ. अर्चना कडू यांनी बीआरसी लॅबचे महत्त्व स्पष्ट करत सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी व संचालक चिंधु आत्माराम ठवकर यांचा सेंद्रिय शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे, प्रकल्प उपसंचालक पल्लवी तलमले, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पाटील, दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भाऊराव तलमले व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी कुही राजेश जारोंडे यांनी केले. कार्यक्रमाला उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur1
- Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏 #drmeherabbas #hearthealth #routinehearttest #HeartHealthAwareness #heartattack DrMeher Abbas TopFans @highlight1
- काळ पुढे सरकत जातो. जबाबदाऱ्या वाढत जातात. जीवनाच्या व्यापात दिवस निघून जातात. पण मनाच्या एका कोपऱ्यात मैत्री मात्र शांतपणे थांबून राहते' फक्त पुन्हा एकदा हाक येण्याची वाट पाहत… आणि अशीच एक हाक आली.. चला.. अंकुर व्हॅली येथे . 'दे धमाल… बेमिसाल… गेट टुगेदर!' साठी. जवळजवळ चार दशकांनंतर कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय चे माजी विद्यार्थी ‘आनंद मेळावा’ या नावाखाली पुन्हा एकत्र आले. ही भेट केवळ पुनर्भेट नव्हती; ती विस्मरणात गेलेल्या आठवणींची पुनःप्रत्ययाची पर्वणी होती. ती काळाच्या पडद्याआड हरवलेल्या क्षणांची पुनर्भेट होती. अहमदनगरपासून काही अंतरावर, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भाळवणी येथील 'अंकुर व्हॅली'मध्ये जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आगमनाच्या क्षणीच गुलाबपुष्प देऊन झालेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. त्या सुगंधी क्षणांनी मेळाव्याच्या आनंदाला पहिल्याच भेटीत सुंदर सुरुवात दिली. धुळीत हरवलेली पायवाट आज पुन्हा हसत भेटली; वय वाढलं, काळ बदलला, पण मैत्री तशीच राहिली. रुपेरी केसांची छटा अलगद डोकावत होती, मेकअप मागचं वय हलकेच स्मित करत होतं; पण मन मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत रमलं होतं. एकेक आठवण उलगडत गेली, हास्याच्या लहरींमध्ये भूतकाळ वर्तमानात येऊन विसावला. या सुंदर मेळाव्यामागे ग्रुप ॲडमिन संजय भैलुमे यांची शोधक वृत्ती, जिद्द आणि आपुलकी होती. एकेक मित्र शोधत त्यांनी तब्बल १३५ माजी विद्यार्थ्यांना एकाच स्नेहसूत्रात गुंफले आहे. त्यातील आम्ही 33 सदस्य आज इथे जमलो होतो. त्यांना साथ देणारे सुरेश साळुंके, आप्पासाहेब होले , दत्ता नेवसे, सुनील चाफे, रंगनाथ सुपेकर, रावसाहेब साळवे, , सुरेंद्र चव्हाण, शोभा महामुनी,शकुंतला जेवरे यांचे आणि उपस्थित सर्वांचेच..परिश्रम या यशामागे मोलाचे ठरले. प्रसंग क्षणभर आठवणी जीवनभर जपून ठेवण्यासाठी आशा गिरमे,अनिता व्यवहारे यांनी सर्वांचे हसरे चेहरे बोलके डोळे आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिक ने जपून ठेवले.. दादा पाटील महाविद्यालयातून ज्ञानरूपी शिक्षणाची शिदोरी घेऊन आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालो. गुरुजनांचे संस्कार, आई-वडिलांची पुण्याई आणि स्वतःच्या कष्टांची जोड देत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिक वाटचाल केली. शिक्षण, नोकरी, संसार या त्रिसूत्रीत आयुष्य गुंतलं होतं; स्वतःसाठी वेळ कमी पडत गेला,पण मैत्री मात्र मनात जपली गेली. “तेव्हाचा मी आणि आजचा मी” असं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने संघर्ष, कर्तृत्व आणि समाधानाचा प्रवास उलगडला. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत साठीकडे झुकलेलं वय.. पण मन मात्र अजूनही तरुण! हसताना नकळत डोळ्यांच्या कडेला ओल आली; आठवणी बोलक्या झाल्या; आज पुन्हा एकदा आपण ‘आपले’ झालो. या आनंद मेळाव्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे मित्र–मैत्रिणींसोबत त्यांच्या पती-पत्नींचाही सहभाग. गप्पा, गाणी, नृत्य, मिश्किल टोमणे आणि मनमोकळं हास्य या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं. मैत्री जेव्हा कुटुंबांपर्यंत पोहोचते, तेव्हा नात्यांना नवं बळ मिळतं. हसण्यातून हसू वाढतं, आणि आयुष्य अधिक हलकं होतं. या प्रसंगी कर्जतवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांना "प्रफुल्लित मने" हे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले. ही भेट म्हणजे केवळ पुस्तक नव्हते; तर विचारांची, प्रेरणेची आणि सकारात्मकतेची शिदोरी होती. निरोपाच्या क्षणी आप्पासाहेब होले यांनी एक छोटीशी ऑफिशियल बॅग देऊन आदरपूर्वक निरोप दिला. त्या क्षणातही आपुलकीची ऊब होती. 'अंकुर व्हॅलीचे निसर्गरम्य वातावरण, आपुलकीचे आदरातिथ्य, सुग्रास भोजन आणि उत्तम व्यवस्था' या सर्वांनी आनंद द्विगुणित केला. हा मेळावा म्हणजे केवळ भेट नव्हती; तो काळाशी केलेला संवाद होता. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही; ती फक्त नव्याने उमलत राहते. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही.. ती फक्त नव्याने उमलत राहते… असे आनंद मेळावे पुन्हा पुन्हा घडत राहोत… मैत्रीचा हा स्नेहसोहळा असाच दरवेळी फुलत राहो. हा अनुभव, हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहो आणि लवकरच पुन्हा भेटण्याचा सुंदर योग यावा… हीच मनापासून इच्छा...!2