उपप्रादेशिक परिवहन कार्यासाठी पदनिर्मिती व इमारत बांधकामाला मंजुरी द्या अशी मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे मात्र सदरील काम निकृष्ट काम करणाऱ्या गुजरात देऊ नये अशी उदगीर करांनी ही मागणी केली आहे उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी पदनिर्मिती व इमारत बांधकामास मंजुरी द्या - आ. संजय बनसोडे यांची मागणी उदगीर (प्रतिनिधी) येथे मार्च - २०२४ मध्ये नव्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयात पदनिर्मिती, स्वतंत्र इमारत बांधकाम आणि आवश्यक प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन संबंधित विभागास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी बोलताना दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी मंत्रालय, मुंबई येथे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान उदगीरसह परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने, करसंकलन यांसारख्या कामांसाठी सध्या दूरच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे स्थानिक पातळीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अत्यंत आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या व दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या आणि त्यांना पुरविण्यात येणा-या सोयी लक्षात घेता उदगीर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावर परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, पदनिर्मिती प्रक्रिया, आवश्यक मनुष्यबळ उपलब्धता तसेच इमारत बांधकामाबाबत शासनस्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन प्रस्तावाला गती देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे उदगीर शहरासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शासकीय सेवांचा लाभ स्थानिक पातळीवरच मिळणार आहे. तसेच यामुळे वेळ व खर्चाची बचत होऊन प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. या भेटीमुळे उदगीरच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र या कामाचे तंत्राट अंधे नावाच्या गुत्तेदाराला मिळू नये अशी अपेक्षा अनेक उदगीरकरांनी व्यक्त केली आहे. कामाचा दर्जा आणि कामासाठी वापरलेले साहित्य हे सुद्धा दर्जेदार असावे अशी अपेक्षा व्यक्त केली की जात आहे. कारण उदगीर शहरासाठी वळण रस्ता बनवला त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाला मात्र तो आज खड्डेमय झाल्यामुळे तो रस्ता बंद असल्यासारखा आहे. शहरातील इतरही अनेक इमारती गळू लागले आहेत. इतकेच नाही तर बौद्ध समाजाची श्रद्धा असलेल्या विश्वशांती बौद्ध विहाराला गळती लागल्यामुळे त्याला डांबर पासण्याची दुर्दैवी वेळ आली. ही शोकांतिका आहे. अशा दर्जाहीन कामापेक्षा सध्याची परिस्थिती बरे म्हणायची वेळ आली आहे. जनतेच्या खिशातील पैसा गुत्तेदाराच्या खिशात घालण्यापेक्षा लोक हिताची कामे करावीत अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यासाठी पदनिर्मिती व इमारत बांधकामाला मंजुरी द्या अशी मागणी आमदार बनसोडे यांनी केली आहे मात्र सदरील काम निकृष्ट काम करणाऱ्या गुजरात देऊ नये अशी उदगीर करांनी ही मागणी केली आहे उदगीर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी पदनिर्मिती व इमारत बांधकामास मंजुरी द्या - आ. संजय बनसोडे यांची मागणी उदगीर (प्रतिनिधी) येथे मार्च - २०२४ मध्ये नव्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले असून या कार्यालयात पदनिर्मिती, स्वतंत्र इमारत बांधकाम आणि आवश्यक प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेकडे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन संबंधित विभागास तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आली असल्याची माहिती माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी बोलताना दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी मंत्रालय, मुंबई येथे माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान उदगीरसह परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने, करसंकलन यांसारख्या कामांसाठी सध्या दूरच्या ठिकाणी जावे लागते, त्यामुळे स्थानिक पातळीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अत्यंत आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या व दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या आणि त्यांना पुरविण्यात येणा-या सोयी लक्षात घेता उदगीर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावर परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, पदनिर्मिती प्रक्रिया, आवश्यक मनुष्यबळ उपलब्धता तसेच इमारत बांधकामाबाबत शासनस्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन प्रस्तावाला गती देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे उदगीर शहरासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शासकीय सेवांचा लाभ स्थानिक पातळीवरच मिळणार आहे. तसेच यामुळे वेळ व खर्चाची बचत होऊन प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. या भेटीमुळे उदगीरच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र या कामाचे तंत्राट अंधे नावाच्या गुत्तेदाराला मिळू नये अशी अपेक्षा अनेक उदगीरकरांनी व्यक्त केली आहे. कामाचा दर्जा आणि कामासाठी वापरलेले साहित्य हे सुद्धा दर्जेदार असावे अशी अपेक्षा व्यक्त केली की जात आहे. कारण उदगीर शहरासाठी वळण रस्ता बनवला त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाला मात्र तो आज खड्डेमय झाल्यामुळे तो रस्ता बंद असल्यासारखा आहे. शहरातील इतरही अनेक इमारती गळू लागले आहेत. इतकेच नाही तर बौद्ध समाजाची श्रद्धा असलेल्या विश्वशांती बौद्ध विहाराला गळती लागल्यामुळे त्याला डांबर पासण्याची दुर्दैवी वेळ आली. ही शोकांतिका आहे. अशा दर्जाहीन कामापेक्षा सध्याची परिस्थिती बरे म्हणायची वेळ आली आहे. जनतेच्या खिशातील पैसा गुत्तेदाराच्या खिशात घालण्यापेक्षा लोक हिताची कामे करावीत अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.
- साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news1
- Post by नागनाथ ससाने1
- मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.1
- *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.1
- अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे1
- लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- “उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे… शहरातील जळकोट रोडवरील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील वसाहतीत एका माजी सैनिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात आढळून आला आहे. घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली… त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडताच ही धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रकाश बाबुराव सासट्टे असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरमध्ये राहत होते. प्राथमिक अंदाजानुसार चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा… मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृद्ध आई-वडिलांसह राहत असलेल्या या माजी सैनिकाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे… पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”1