अकोला : गोरगरिबांसाठी ‘देवदूत’ ठरताहेत आमदार संतोष बांगर; अपघातग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत हिंगोली अकोला : गोरगरिबांसाठी ‘देवदूत’ ठरताहेत आमदार संतोष बांगर; अपघातग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत हिंगोली | प्रतिनिधी गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढे येणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अकोला येथील मंगलसिंग गजानन डाबेवार यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी आमदार संतोष बांगर यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला असून, पुढील उपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अपघातानंतर उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या डाबेवार कुटुंबाला आमदार बांगर यांच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला. रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. दरम्यान, गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत करणे, आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे यामुळे आमदार संतोष बांगर यांची गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. अनेक नागरिकांकडून त्यांना ‘देवदूत’ म्हणून संबोधले जाते. विशेष म्हणजे, गरजू रुग्णांना सातत्याने मदत मिळवून देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे काही नागरिकांकडून संतोष बांगर यांना राज्याचे आरोग्यमंत्री होण्याची संधी मिळावी, अशी इच्छाही व्यक्त केली जात आहे. राजकारणापलीकडे जाऊन गरजूंच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणारा नेता म्हणून संतोष बांगर यांची प्रतिमा नागरिकांमध्ये अधिक ठळक होताना दिसत आहे.
अकोला : गोरगरिबांसाठी ‘देवदूत’ ठरताहेत आमदार संतोष बांगर; अपघातग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत हिंगोली अकोला : गोरगरिबांसाठी ‘देवदूत’ ठरताहेत आमदार संतोष बांगर; अपघातग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत हिंगोली | प्रतिनिधी गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढे येणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अकोला येथील मंगलसिंग गजानन डाबेवार यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी आमदार संतोष बांगर यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला असून, पुढील उपचाराची व्यवस्थाही करण्यात आली आहे. अपघातानंतर उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या डाबेवार कुटुंबाला आमदार बांगर यांच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला. रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. दरम्यान, गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत करणे, आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे यामुळे आमदार संतोष बांगर यांची गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. अनेक नागरिकांकडून त्यांना ‘देवदूत’ म्हणून संबोधले जाते. विशेष म्हणजे, गरजू रुग्णांना सातत्याने मदत मिळवून देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे काही नागरिकांकडून संतोष बांगर यांना राज्याचे आरोग्यमंत्री होण्याची संधी मिळावी, अशी इच्छाही व्यक्त केली जात आहे. राजकारणापलीकडे जाऊन गरजूंच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणारा नेता म्हणून संतोष बांगर यांची प्रतिमा नागरिकांमध्ये अधिक ठळक होताना दिसत आहे.
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे1
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........1
- जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- महिना उलटला पाऊस नाही, विहिर बोरवेलला पुरेसे पाणी असूनही शेतातील वीज गुल,खरीप पिके धोक्यात,शेतकऱ्याचा टाहो हिंगोली जिल्ह्यात विशेषता कळमनुरी तालुक्यात एका महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके हातची गेली आहेत,तूर ,कापूस, सोयाबीन,हळद ही पिके पाऊस नसल्याने धोक्यात आली आहे.एकंदरीत तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे.महिनाभरापासून पाऊस नाही विहिरी बोरला पुरेशी पाणी असताना देखील शेतातील वीज वारंवार गुण होत आहे त्यामुळे मुबलक पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही,अशी परिस्थिती शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे कळमनुरी तालुक्यातील सांडस परीसरात शेतकऱ्यांनी या समस्या बद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे .या भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने येथील पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे .1