जंगलव्याप्त गावांना 'संरक्षक कुंपण' घालण्यासाठी सरकारने विशेष निधीची तातडीने तरतूद करायला हवी आ. वडेट्टीवार यांची आग्रही मागणी प्रतिनिधी बिनधास्त न्यूज मुंबई/ चंद्रपूर: विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान वन विभागातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात ३५ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. केवळ शोक व्यक्त करून चालणार नाही, तर मानवी वस्तीत शिरणाऱ्या वन्यप्राण्यांपासून संरक्षण देण्यासाठी जंगलव्याप्त गावांना 'संरक्षक कुंपण' घालण्यासाठी सरकारने विशेष निधीची तातडीने तरतूद करायला हवी, अशी आग्रही मागणी सभागृहात लावून धरली. वन विभागाच्या जमिनीवर कोळसा कंपन्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर उत्खनन हा निसर्गाचा मोठा ऱ्हास आहे. या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी केली. पर्यावरणाचे रक्षण आणि वनसंपत्तीची लूट थांबवणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, मात्र सद्यस्थितीत प्रशासकीय गोंधळामुळे सामान्य नागरिक आणि निसर्ग दोन्ही धोक्यात आले आहेत. वन्यजीव संघर्ष असो वा वन जमिनीवरील अवैध कब्जा, सरकारची उदासिनता आता सहन केली जाणार नाही. वनव्याप्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने पारदर्शक धोरण राबवण्याची गरज आहे.
जंगलव्याप्त गावांना 'संरक्षक कुंपण' घालण्यासाठी सरकारने विशेष निधीची तातडीने तरतूद करायला हवी आ. वडेट्टीवार यांची आग्रही मागणी प्रतिनिधी बिनधास्त न्यूज मुंबई/ चंद्रपूर: विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान वन विभागातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात ३५ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. केवळ शोक व्यक्त करून चालणार नाही, तर मानवी वस्तीत शिरणाऱ्या वन्यप्राण्यांपासून संरक्षण देण्यासाठी जंगलव्याप्त गावांना 'संरक्षक कुंपण' घालण्यासाठी सरकारने विशेष निधीची तातडीने तरतूद करायला हवी, अशी आग्रही मागणी सभागृहात लावून धरली. वन विभागाच्या जमिनीवर कोळसा कंपन्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर उत्खनन हा निसर्गाचा मोठा ऱ्हास आहे. या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी केली. पर्यावरणाचे रक्षण आणि वनसंपत्तीची लूट थांबवणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, मात्र सद्यस्थितीत प्रशासकीय गोंधळामुळे सामान्य नागरिक आणि निसर्ग दोन्ही धोक्यात आले आहेत. वन्यजीव संघर्ष असो वा वन जमिनीवरील अवैध कब्जा, सरकारची उदासिनता आता सहन केली जाणार नाही. वनव्याप्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने पारदर्शक धोरण राबवण्याची गरज आहे.
- विंचूर चौफुली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन नाशिक: येवला येथील विंचूर चौफुली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरिक, युवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना उजाळा दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, एकात्मतेच्या भावनेत आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. त्यांच्या सामाजिक न्याय, समता व बंधुतेच्या विचारांचा प्रसार करत समाजाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.1
- नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना! मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.1
- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात गुप्ताजी हॉटेलसमोर प्रचंड ट्रॅफिक जाम नागपूर :- हिंगणा येथील मुख्य बाजार चौकात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सकाळी व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांची लांबलचक रांग लागते, ज्यामुळे प्रवासाला उशीर होतो आणि अपघाताचा धोका देखील वाढला आहे. स्थानिकांच्या मते, रस्त्यावर अनियमित पार्किंग, फेरीवाले आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव ही मुख्य कारणे आहेत. अनेकदा आपत्कालीन वाहनांनाही मार्ग काढणे कठीण जाते, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली असून, वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून ट्रॅफिक सुरळीत करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जर याकडे दुर्लक्ष झाले, तर येणाऱ्या काळात समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.1
- *९४*रक्तदात्यांनी केले रक्तदान* उमरेड (प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकीने वागविण्याचा सल्ला दिला.अगदी तोच सल्ला शिरोधार्थ मानत त्यांच्या जयंती दिनी काही तरी सत्कर्म हातून घडावे म्हणून उमरेड शहरात १३५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरात महिला पुरुष एकूण *९४* रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन केले. स्थानिक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन येथे उमरेड युथ फाउंडेशन, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा यामध्ये पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रकार्यात सहभागी झाले.प्रसंगी डॉ.हर्षल रेवतकर, डॉ.जितेश चव्हाण,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,अध्यक्ष मनीष बालपांडे ,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,दीपक पटले,ओम साई स्पोर्टिंग क्लब चे रितेश राऊत, रिलायबल कोचिंग चे संचालक सुबोध धनविजय,नगरसेविका शालिनी गवळी,इंडिया पॉवर जिम चे किशोर आदमने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रक्तपेढी लाईफ लाइन ब्लड बँक नागपूर चे डॉ.अविनाश बभारे,प्रवीण साठवणे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांना स्मृती चिन्ह भेट अभिनंदन केले.कार्यक्रम संयोजक किशोर आदमने यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या पार पडला.यशस्वीतेसाठी आशिष वंजारी,विशाल बावणे,मुकेश गौतम,अक्षय श्रीखंडे,नरेंद्र बालपांडे,दिनेश ढेबूदास,प्रवीण लाडेकर,सतीश चकोले,समीर वैद्य,प्रांजल डहाके,रोशन पोकळे,उज्वल चिंदमवार,तोसिफ शेख,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर,शुभम सिर्सिकर,सतीश तांबेकर ,सचिन जोधे ,राजू चाचरकर,संदीप दांडेकर,आदींचे योगदान लाभले.1
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1
- सिनेस्टाईल पद्धतीने वर्धा पोलिसांनी केली आरोपीला अटक news # live1