मुंबई महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना वंदन; विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन”* *“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना वंदन; विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन”* *नारी शक्ती विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिलांची एकत्रित येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली* मुंबई, दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी बाबासाहेबांच्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या विचारांना अधिक बळ देण्याची गरज अधोरेखित करत “नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड” या तत्वावर आधारित सर्वसमावेशक विकासाचा संकल्प व्यक्त केला. राज्यघटनेच्या चौकटीत राहून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करत सुशासन देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, शिवदर्शन साठे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उपसभापतींचे खासगी सचिव अविनाश रणखांब, सभापतींचे खासगी सचिव पंडित खेडकर यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच नारी शक्ती विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिलांनी एकत्र येत बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यामध्ये उपनेत्या कला ताई शिंदे, कीर्ती मेश्राम (मुंबई उपनगर), सुनीताताई मोरे (सांगली), संगीता चव्हाण (बीड), रिंकू मोरे (पुणे), शालिनी सुर्वे, कमल कन्नल, वर्षा मोरे (ठाणे), भक्ती भोसले (मुंबई), रेखा मोरे आदींचा सहभाग होता. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्र विधिमंडळातील विधानसभा आणि विधानपरिषद या संस्था सातत्याने राज्यघटनेच्या चौकटीत कार्यरत असून सर्व कायदे, अधिकार आणि निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून संरक्षित झालेले आहेत. जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब या प्रक्रियेत उमटून सुशासन घडविण्याचा आमचा प्रयत्न असतो. मागील वर्षभरात राज्यघटनेच्या संदर्भात दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मी स्वतः आणि सर्व पक्षांच्या सदस्यांनी मांडलेले विचार महत्त्वपूर्ण ठरले. विधिमंडळातील नियमांमध्ये बदल करतानाही राज्यघटनेचा आधार घेऊन काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याचा उल्लेख करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या अधिकारांचे सशक्तीकरण केले. मिताक्षरा आणि दायभागा या कायद्यांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. या विधेयकाला विरोध झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन समानतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. बाबासाहेबांच्या मानवाधिकार चळवळीमुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील विषमतेविरुद्ध लढणाऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. आजही समाजात जातीयता, धर्मांधता, सक्तीचे धर्मांतर, बालविवाह, वर्णभेद आणि स्त्री-पुरुष असमानता यांसारख्या समस्या कायम असल्याने समानतेकडे वाटचाल अधिक ठोसपणे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मुंबई महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना वंदन; विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन”* *“महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांना वंदन; विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन”* *नारी शक्ती विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिलांची एकत्रित येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली* मुंबई, दि. १४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी बाबासाहेबांच्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या विचारांना अधिक बळ देण्याची गरज अधोरेखित करत “नो वन शुड बी लेफ्ट बिहाइंड” या तत्वावर आधारित सर्वसमावेशक विकासाचा संकल्प व्यक्त केला. राज्यघटनेच्या चौकटीत राहून लोकशाही मूल्यांचे संरक्षण करत सुशासन देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, शिवदर्शन साठे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उपसभापतींचे खासगी सचिव अविनाश रणखांब, सभापतींचे खासगी सचिव पंडित खेडकर यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच नारी शक्ती विधेयक मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिलांनी एकत्र येत बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यामध्ये उपनेत्या कला ताई शिंदे, कीर्ती मेश्राम (मुंबई उपनगर), सुनीताताई मोरे (सांगली), संगीता चव्हाण (बीड), रिंकू मोरे (पुणे), शालिनी सुर्वे, कमल कन्नल, वर्षा मोरे (ठाणे), भक्ती भोसले (मुंबई), रेखा मोरे आदींचा सहभाग होता. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महाराष्ट्र विधिमंडळातील विधानसभा आणि विधानपरिषद या संस्था सातत्याने राज्यघटनेच्या चौकटीत कार्यरत असून सर्व कायदे, अधिकार आणि निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून संरक्षित झालेले आहेत. जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब या प्रक्रियेत उमटून सुशासन घडविण्याचा आमचा प्रयत्न असतो. मागील वर्षभरात राज्यघटनेच्या संदर्भात दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मी स्वतः आणि सर्व पक्षांच्या सदस्यांनी मांडलेले विचार महत्त्वपूर्ण ठरले. विधिमंडळातील नियमांमध्ये बदल करतानाही राज्यघटनेचा आधार घेऊन काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी दिलेल्या लढ्याचा उल्लेख करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या अधिकारांचे सशक्तीकरण केले. मिताक्षरा आणि दायभागा या कायद्यांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. या विधेयकाला विरोध झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन समानतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. बाबासाहेबांच्या मानवाधिकार चळवळीमुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील विषमतेविरुद्ध लढणाऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे. आजही समाजात जातीयता, धर्मांधता, सक्तीचे धर्मांतर, बालविवाह, वर्णभेद आणि स्त्री-पुरुष असमानता यांसारख्या समस्या कायम असल्याने समानतेकडे वाटचाल अधिक ठोसपणे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
- *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.1
- अस्मिता भवन म्हणजे एकच ठराविक इमारत नसून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने उभारले जाणारे केंद्र/भवन असते. महाराष्ट्रात “अस्मिता भवन” हा शब्द मुख्यतः महिला सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक विकास यासाठी वापरला जातो.योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी “अस्मिता भवन” उभारण्याची योजना केली आहे. � Hindustan Times ही भवनं तालुका स्तरावर उभारली जाणार आहेत. येथे महिलांना: 🛍️ व्यवसाय करण्यासाठी जागा 💼 स्वयंसहाय्य गटांना (SHG) संधी 📈 आर्थिक उत्पन्न वाढवण्याची सुविधा 👉 मुख्य उद्देश: महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनवणे. 📍 3) “अस्मिता भवन” या संकल्पनेचा अर्थ सामान्यतः “अस्मिता भवन” म्हणजे: ओळख (Identity) + विकास केंद्र समाज, महिला, शिक्षण किंवा संस्कृती यासाठी उभारलेले बहुउद्देशीय भवन ✔️ थोडक्यात अस्मिता भवन हे शिक्षण, समाजसेवा किंवा महिला सक्षमीकरणासाठीचे केंद्र असते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे उद्देश थोडे बदलतात पण मुख्य हेतू एकच — 👉 लोकांचा विकास आणि आत्मनिर्भरता वाढवणे1
- लातूर शहर महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख राहील याची दक्षता घ्यावी. निधीचा विनियोग आणि योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी - माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 30 एप्रिल 2026. लातूर शहर महानगरपालीकेत लातूर शहर सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. या संदर्भातील एकूण कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा स्पष्ट सूचना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी महानगरपालीकेत घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत जाऊन महापौर सौ. जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ड. स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परीवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना, अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसुळे व इतर सर्व विभाग प्रमुख तसेच काही नगरसेवकांच्या उपस्थितीत शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजना, प्रस्तावित योजना आणि नियमित कामकाजाबाबत विस्तृत आढावा घेतला.1
- 📍निजाम कालीन लातूर औसा रोडवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून शेतकऱ्यांना रस्ता खुला करून देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल शेतकरी रमेश पाटील.1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम1
- Post by नागनाथ ससाने1
- साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news1
- लातूर, दि. २८ : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.1