माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. या पक्षप्रवेश सोहळ्याला ज्येष्ठ नेते विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि माध्यम विभाग प्रमुख गोविंद येतयेकर आदी भाजपचे नेते उपस्थित होते. श्री. तनपुरे हे २०१९ मध्ये राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले होते. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राहुरी मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी राहुरी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमधील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी श्री. तनपुरे यांनी दर्शवली होती. श्री. चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांचे कौतुक करत म्हटले की, त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे आणि त्यांनी वर्षानुवर्षे समाजातील अनेक घटकांसोबत काम केले आहे. ज्या विश्वासाने श्री. तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही आणि भाजप संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली. या पक्षप्रवेशावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील वीज, शेती आणि पाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक होईल, असा त्यांना विश्वास आहे. तसेच, पक्ष भविष्यात जी काही जबाबदारी सोपवेल, ती उत्तमप्रकारे पार पाडण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राहुरीचे उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाचकर, राहुरी तालुका युवक शहर अध्यक्ष संतोष आघाव, पाथर्डीचे उपाध्यक्ष जालिंदर वामन, अंबादास डमाळे, राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब लटके आणि रवींद्र आढाव, किसनराव जवरे, प्रभाकर गाडे, नंदराज पाटील, अजय जाधव, गोरखनाथ पवार, महेश पानसरे, महेश उदावंत, ओंकार कासार, चंद्रकांत पानसंबळ, सोहम प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. या पक्षप्रवेश सोहळ्याला ज्येष्ठ नेते विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आणि माध्यम विभाग प्रमुख गोविंद येतयेकर आदी भाजपचे नेते उपस्थित होते. श्री. तनपुरे हे २०१९ मध्ये राहुरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले होते. यावेळी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, राहुरी मतदारसंघातील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान त्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी राहुरी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमधील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी श्री. तनपुरे यांनी दर्शवली होती. श्री. चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांचे कौतुक करत म्हटले की, त्यांना जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे आणि त्यांनी वर्षानुवर्षे समाजातील अनेक घटकांसोबत काम केले आहे. ज्या विश्वासाने श्री. तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही आणि भाजप संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिली. या पक्षप्रवेशावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील वीज, शेती आणि पाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक होईल, असा त्यांना विश्वास आहे. तसेच, पक्ष भविष्यात जी काही जबाबदारी सोपवेल, ती उत्तमप्रकारे पार पाडण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राहुरीचे उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, युवक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाचकर, राहुरी तालुका युवक शहर अध्यक्ष संतोष आघाव, पाथर्डीचे उपाध्यक्ष जालिंदर वामन, अंबादास डमाळे, राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब लटके आणि रवींद्र आढाव, किसनराव जवरे, प्रभाकर गाडे, नंदराज पाटील, अजय जाधव, गोरखनाथ पवार, महेश पानसरे, महेश उदावंत, ओंकार कासार, चंद्रकांत पानसंबळ, सोहम प्राजक्त तनपुरे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला, रत्नागिरी कोकणातील गोपालगड, 1960 साली अक्षरशः विकण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या कृत्याला 'पाप' असे संबोधण्यात आले असून, तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात हे घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे रहस्य 1960 साली घडले असले तरी, ते आता उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात पडलेले दोन आंबे उचलण्यासाठी एक व्यक्ती गेला असता हे गंभीर प्रकरण समोर आल्याचे नमूद केले आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला अक्षरशः विकल्याचे म्हटले आहे. या गंभीर प्रकरणावर सरकारने लक्ष देऊन काय खरे आहे आणि काय खोटे, याचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणातील सत्य शोधून ते प्रसारमाध्यमांना, संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारत देशाला कळवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.1
- हरियाणातील पंचकुला येथे 'सनातन साउंड्स विथ मीमा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, ३० मे २०२६ रोजी पंचकुलाच्या सेक्टर ५ येथील इंद्रधनुष सभागृहात संध्याकाळी ६:०० वाजल्यापासून सुरू होईल.1
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी 'विकास' आणि 'राजकारण' या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली, तसेच विरोधकांवर थेट हल्लाबोल करत आपली भूमिका स्पष्ट केली.1
- एका कष्टकरी आईच्या अविश्वसनीय जिद्दीची गोष्ट समोर आली आहे, जिथे ती आपल्या बाळाला कडेवर घेऊन कॅमेऱ्यामागे उभी राहून आपले कर्तव्य पार पाडत आहे. तिच्या या अदम्य इच्छाशक्तीमुळे आणि मेहनतीमुळे तिला खऱ्या अर्थाने ‘आयर्न लेडी’ असे संबोधले जात आहे. ही दृष्ये एका मातेची चिकाटी आणि समर्पण दर्शवतात, जी मुलाची जबाबदारी सांभाळत कामाप्रती आपली निष्ठा कायम ठेवते.1
- मुंबईतील बायकुला येथील केला मार्केटमधील हलवा पराठाच्या दुकानात आग लागल्याची घटना घडली. या आगीत एक व्यक्ती जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच बायकुला पोलीस पथक आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कार्यवाही करत आगीवर नियंत्रण मिळवले.1