logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईचे संकट; तरीही संसदेत चर्चा टाळली जात आहे – खासदार प्रणिती शिंदे आज नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे युद्धाचे परिणाम भारतातही दिसू लागले असून व्यापार करारामुळे भाजीपाला व शेतीमाल अमेरिकेकडून आयात करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. इतक्या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारकडून केवळ निवेदन देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद हे देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असताना विरोधकांना बोलू दिले जात नाही, संसदेत सखोल चर्चा होऊ दिली जात नाही आणि अनेक मुद्दे संसदेच्या अधिकृत नोंदीतही येऊ दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत संसद चालवण्याचा अर्थ काय, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, अमेरिका–इस्त्राईल–इराण या युद्धपरिस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही. या संघर्षाचे परिणाम भारतावर होत असतानाही सरकारकडून याबाबत ठोस भूमिका मांडली जात नाही. भारतात युद्ध अभ्यासासाठी आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून कारवाई झाल्याबाबतही केंद्र सरकारकडून एक शब्दही उच्चारला जात नाही, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. देशासमोर उभ्या राहिलेल्या गॅस तुटवडा, इंधन टंचाई आणि युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांवर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही आणि चर्चा टाळली जात आहे. अशा परिस्थितीत संसद अधिवेशन घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याची प्रतिमा निर्माण होत असून त्यामुळे देशाची भूमिका कमजोर होत आहे. देशाला कमजोर करण्याचे श्रेय पंतप्रधानांकडेच जाते, असेही त्यांनी सांगितले. देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

on 10 March
user_Akkalkot news
Akkalkot news
Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
on 10 March

देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईचे संकट; तरीही संसदेत चर्चा टाळली जात आहे – खासदार प्रणिती शिंदे आज नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात गॅस तुटवडा व इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे युद्धाचे परिणाम भारतातही दिसू लागले असून व्यापार करारामुळे भाजीपाला व शेतीमाल अमेरिकेकडून आयात करण्याची वेळ येत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. इतक्या गंभीर परिस्थितीत केंद्र सरकारकडून केवळ निवेदन देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. संसद हे देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असताना विरोधकांना बोलू दिले जात नाही, संसदेत सखोल चर्चा होऊ दिली जात नाही आणि अनेक मुद्दे संसदेच्या अधिकृत नोंदीतही येऊ दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत संसद चालवण्याचा अर्थ काय, असा सवालही खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, अमेरिका–इस्त्राईल–इराण या युद्धपरिस्थितीबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्टपणे दिसत नाही. या संघर्षाचे परिणाम भारतावर होत असतानाही सरकारकडून याबाबत ठोस भूमिका मांडली जात नाही. भारतात युद्ध अभ्यासासाठी आलेल्या इराणच्या जहाजावर अमेरिकेकडून कारवाई झाल्याबाबतही केंद्र सरकारकडून एक शब्दही उच्चारला जात नाही, असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. देशासमोर उभ्या राहिलेल्या गॅस तुटवडा, इंधन टंचाई आणि युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांवर संसदेत सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही आणि चर्चा टाळली जात आहे. अशा परिस्थितीत संसद अधिवेशन घेण्याचा उद्देश काय, असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. खासदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकत असल्याची प्रतिमा निर्माण होत असून त्यामुळे देशाची भूमिका कमजोर होत आहे. देशाला कमजोर करण्याचे श्रेय पंतप्रधानांकडेच जाते, असेही त्यांनी सांगितले. देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.

More news from Maharashtra and nearby areas
  • 📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम! #नारीशक्तीवंदनअधिनियम #महिलासशक्तीकरण #सशक्तमहिलासशक्तराष्ट्र #NariShaktiVandan #ModiForWomenEmpowerment
    1
    📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम!
#नारीशक्तीवंदनअधिनियम
#महिलासशक्तीकरण
#सशक्तमहिलासशक्तराष्ट्र
#NariShaktiVandan
#ModiForWomenEmpowerment
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    10 hrs ago
  • Post by अशोक दगडू वाघमारे
    1
    Post by अशोक दगडू वाघमारे
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ------- पाटोदा(प्रतिनिधी):- मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या दि.१७ एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या “एल्गार मोर्चा”ला लिंबागणेशकरांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले की, हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून तो संपूर्ण मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. समाजातील शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण, नोकरी तसेच विविध शासकीय योजनांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, ही दीर्घकाळापासूनची व न्याय्य मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा लढा आवश्यक असून, या ऐतिहासिक आंदोलनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी डॉ.गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, रविंद्र निर्मळ, विक्रांत वाणी, औदुंबर नाईकवाडे, अर्जुन घोलप, शेख शफी, नूर सय्यद, बाळासाहेब मुळे, समीर शेख, सय्यद अख्तर, सय्यद बशीर, रामदास मुळे, सुरेश निर्मळ, गणपत तागड, शेख शफीक, सय्यद सलीम, शेख वसीम, शेख उस्मान, सय्यद फिरोज, सय्यद रियाज, सय्यद ताहेर, सय्यद रऊफ, सय्यद सालम, उमर शेख, सय्यद नाझीम, शेख बबलू, सय्यद आरेफ, शेख नाझीम, शेख शौकत, सय्यद आयुब, भास्कर आबदार, बबन गोंडे सह आदी इतर नागरिक उपस्थित होते.
    1
    -------
पाटोदा(प्रतिनिधी):- मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या दि.१७ एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या “एल्गार मोर्चा”ला लिंबागणेशकरांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले की, हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून तो संपूर्ण मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. समाजातील शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण, नोकरी तसेच विविध शासकीय योजनांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, ही दीर्घकाळापासूनची व न्याय्य मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा लढा आवश्यक असून, या ऐतिहासिक आंदोलनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी डॉ.गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, रविंद्र निर्मळ, विक्रांत वाणी, औदुंबर नाईकवाडे, अर्जुन घोलप, शेख शफी, नूर सय्यद, बाळासाहेब मुळे, समीर शेख, सय्यद अख्तर, सय्यद बशीर, रामदास मुळे, सुरेश निर्मळ, गणपत तागड, शेख शफीक, सय्यद सलीम, शेख वसीम, शेख उस्मान, सय्यद फिरोज, सय्यद रियाज, सय्यद ताहेर, सय्यद रऊफ, सय्यद सालम, उमर शेख, सय्यद नाझीम, शेख बबलू, सय्यद आरेफ, शेख नाझीम, शेख शौकत, सय्यद आयुब, भास्कर आबदार, बबन गोंडे सह आदी इतर नागरिक उपस्थित होते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Sanjhsuyog News Channel
    1
    Post by Sanjhsuyog News Channel
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Sominath Kolhe
    1
    Post by Sominath Kolhe
    user_Sominath Kolhe
    Sominath Kolhe
    आष्टी, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...
    1
    Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, 
पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, 
तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर
    1
    विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती 
वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    22 hrs ago
  • Post by Sominath Kolhe
    1
    Post by Sominath Kolhe
    user_Sominath Kolhe
    Sominath Kolhe
    आष्टी, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.