मिशन बहुजनतर्फे अनुसूचित जाती उपवर्गीकरणा विरोधात संविधान चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन मिशन बहुजनतर्फे अनुसूचित जाती उपवर्गीकरणा विरोधात संविधान चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले नागपूर: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या असंवैधानिक प्रयत्नांच्या विरोधात 'मिशन बहुजन, नागपूर' तर्फे आज दिनांक 20 एप्रिल रोजी, रविवारी संविधान चौक, नागपूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. दुपारी 3ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या धरणे आंदोलनात शेकडोच्या संख्येने भीमसैनिक, महिला कार्यकर्त्या, युवक व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलनाचे मुख्य आयोजक राकेश धारगावे होते. त्यांच्यासोबत धीरज भाऊ गणेरे, नेहाल पाटील, राहुल भाऊ मोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष यशवंत जी तेलंग, सुभाष बोरकर, अथांग कोरडे, प्रियांशु शेंडे अमन भस्मे इत्यादी मान्यवर मंचावर प्रमुखरित्या उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात उपवर्गीकरणाला संविधान-विरोधी ठरवत हा आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचे सांगितले. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: धरणे स्थळावरून सर्वानुमते खालील मागण्या मांडण्यात आल्या: 1. उपवर्गीकरण रद्द करावे: माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना SC उपवर्गीकरणाचा अधिकार देणे हे अनुच्छेद 341 चे उल्लंघन आहे. केंद्र सरकारने संसदेत कायदा करून हा निर्णय निष्प्रभ करावा. 2. अनंत बादर आयोगाचा अहवाल सार्वजनिक करावा: महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या अनंत बादर आयोगाचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करून बहुजन समाजाशी चर्चा करावी. 3. महिला आरक्षण विधेयक 2023 तात्काळ लागू करावे: या विधेयकाला जनगणना व परिसीमनाच्या अटीतून मुक्त करून तात्काळ प्रभावाने लागू करावे. 3 वर्षांपासून महिलांची फसवणूक होत आहे. वक्त्यांचे विचार: मुख्य आयोजक राकेश धारगावे म्हणाले, "बाबासाहेबांनी आम्हाला एक SC यादी दिली होती. उपवर्गीकरणाच्या नावाखाली आम्हाला आपापसात भांडवून आमचे आरक्षण हिरावून घेण्याचा कट रचला जात आहे. मिशन बहुजन हे होऊ देणार नाही." रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष यशवंत जी तेलंग म्हणाले, "RPI उपवर्गीकरणाच्या प्रत्येक पावलाला विरोध करेल. ही दलित एकता तोडण्याची हत्यार आहे." धीरज गणेरे, नेहाल पाटील व राहुल भाऊ मोरे यांनी सरकारला इशारा दिला की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन राज्यव्यापी करण्यात येईल असे निवेदन सादर केले. आंदोलनाच्या समारोपाच्या प्रसंगी मिशन बहुजनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, नागपूर यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना संबोधित विस्तृत निवेदन सादर केले. निवेदनात 15 दिवसांच्या आत सकारात्मक कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रमुख घोषणा: "एक SC, एक आवाज - उपवर्गीकरण मुर्दाबाद!" "अनंत बादर अहवाल सार्वजनिक करा!" "महिला आरक्षण लागू करा -फसवणूक बंद करा!" कार्यक्रमाचे संचालन नेहाल पाटिल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियांशु शेंडे यांनी केले. संपूर्ण आंदोलन शांततामय व संविधानिक मार्गाने पार पडले.
मिशन बहुजनतर्फे अनुसूचित जाती उपवर्गीकरणा विरोधात संविधान चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन मिशन बहुजनतर्फे अनुसूचित जाती उपवर्गीकरणा विरोधात संविधान चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले नागपूर: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या असंवैधानिक प्रयत्नांच्या विरोधात 'मिशन बहुजन, नागपूर' तर्फे आज दिनांक 20 एप्रिल रोजी, रविवारी संविधान चौक, नागपूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. दुपारी 3ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चाललेल्या या धरणे आंदोलनात शेकडोच्या संख्येने भीमसैनिक, महिला कार्यकर्त्या, युवक व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलनाचे मुख्य आयोजक राकेश धारगावे होते. त्यांच्यासोबत धीरज भाऊ गणेरे, नेहाल पाटील, राहुल भाऊ मोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष यशवंत जी तेलंग, सुभाष बोरकर, अथांग कोरडे, प्रियांशु शेंडे अमन भस्मे इत्यादी मान्यवर मंचावर प्रमुखरित्या उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात उपवर्गीकरणाला संविधान-विरोधी ठरवत हा आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचे सांगितले. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या: धरणे स्थळावरून सर्वानुमते खालील मागण्या मांडण्यात आल्या: 1. उपवर्गीकरण रद्द करावे: माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना SC उपवर्गीकरणाचा अधिकार देणे हे अनुच्छेद 341 चे उल्लंघन आहे. केंद्र सरकारने संसदेत कायदा करून हा निर्णय निष्प्रभ करावा. 2. अनंत बादर आयोगाचा अहवाल सार्वजनिक करावा: महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या अनंत बादर आयोगाचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करून बहुजन समाजाशी चर्चा करावी. 3. महिला आरक्षण विधेयक 2023 तात्काळ लागू करावे: या विधेयकाला जनगणना व परिसीमनाच्या अटीतून मुक्त करून तात्काळ प्रभावाने लागू करावे. 3 वर्षांपासून महिलांची फसवणूक होत आहे. वक्त्यांचे विचार: मुख्य आयोजक राकेश धारगावे म्हणाले, "बाबासाहेबांनी आम्हाला एक SC यादी दिली होती. उपवर्गीकरणाच्या नावाखाली आम्हाला आपापसात भांडवून आमचे आरक्षण हिरावून घेण्याचा कट रचला जात आहे. मिशन बहुजन हे होऊ देणार नाही." रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष यशवंत जी तेलंग म्हणाले, "RPI उपवर्गीकरणाच्या प्रत्येक पावलाला विरोध करेल. ही दलित एकता तोडण्याची हत्यार आहे." धीरज गणेरे, नेहाल पाटील व राहुल भाऊ मोरे यांनी सरकारला इशारा दिला की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन राज्यव्यापी करण्यात येईल असे निवेदन सादर केले. आंदोलनाच्या समारोपाच्या प्रसंगी मिशन बहुजनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, नागपूर यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना संबोधित विस्तृत निवेदन सादर केले. निवेदनात 15 दिवसांच्या आत सकारात्मक कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रमुख घोषणा: "एक SC, एक आवाज - उपवर्गीकरण मुर्दाबाद!" "अनंत बादर अहवाल सार्वजनिक करा!" "महिला आरक्षण लागू करा -फसवणूक बंद करा!" कार्यक्रमाचे संचालन नेहाल पाटिल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रियांशु शेंडे यांनी केले. संपूर्ण आंदोलन शांततामय व संविधानिक मार्गाने पार पडले.
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- मुजफ्फरपुर में नाबालिग गुम/शुदगी से मचा हड़/कंप #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #BiharPolice #Muzaffarpur1
- कृउबा समिती मार्केट मध्ये विक्रमी कापसाची आवक भिवापूर । उमरेड भिवापूर तालुक्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढल्याने कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात झाले असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समितीच्या मार्केट यार्ड मध्ये कापसा माल मोठया प्रमाणात आणित असल्याने जिकडे - तिकडे भरगच्च कापसाचे ठिग भरून असल्याचे दृष्टिक्षेपणास येत आहे. मार्च अखेर पर्यंत 53,656 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन बाजार समिती सचिव रामकृष्ण गोगल. यांनी दिली असून याबाबतची त्याची प्रतिक्रिया तसेच मार्केट यार्ड मध्ये दि.5 एप्रिलला 1876 क्विंटल आवक होती. व दर 6300 -8500 रुपये प्राप्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये रविवार, बुधवार ,गुरुवार हे तीन दिवस कापूस खरेदी चे आहे. गेल्या वर्षी क्विंटल मागे 6330 ते 7600 रुपये भाव इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे. खाजगी जिनिंग मध्ये कापसाच्या भावामध्ये तफावत असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समिती कडे आकृष्ट होत असून कापसाचा माल यार्डत आणत असल्याची माहीती कृउबा समितीचे सभापती बालु इंगोले यांनी दिली आहे.1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती1