चिखलीत ‘विराट हिंदू संमेलन’ गाजले; धर्म, संघटन आणि स्वाभिमानावर जोरदार भूमिका कालिचरण महाराजांचे ठाम प्रतिपादन; समाज एकत्र येण्याचा आणि कृतीतून जागर करण्याचा संदेश पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी चिखली येथील नेवाळे वस्तीमध्ये पार पडलेल्या ‘विराट हिंदू संमेलनाने’ परिसरात मोठी चर्चा रंगवली. धर्मरक्षक भुजबळ प्रांगणात आयोजित या भव्य कार्यक्रमात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा जागर अनुभवला. हरिपाठ, भजनी मंडळे, महिला बचत गट, सामाजिक संस्था आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले. प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या कालिचरण महाराजांनी आपल्या भाषणात हिंदू समाजाच्या एकजुटीवर ठाम भूमिका मांडली. त्यांनी धर्माला केवळ श्रद्धा नसून जीवनपद्धती आणि शिस्तीचे शास्त्र म्हणून मांडत समाजाने संघटित होण्याची गरज अधोरेखित केली. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम समाजच देशाला बळकटी देऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या भाषणात त्यांनी इतिहास, परंपरा आणि धार्मिक प्रतीकांचा उल्लेख करत समाजाला जागरूक राहण्याचे आवाहन केले. समाजातील दुर्बलता, मतभेद आणि निष्क्रियता यावर त्यांनी टीका करत अधिक सजग, सक्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. उपस्थितांमध्ये घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. या संमेलनात सामाजिक विषयांनाही तितकेच महत्त्व देण्यात आले. वक्ते अविनाश भेगडे यांनी ‘सामाजिक पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर भाष्य करत प्रत्येकाने समाज आणि देशासाठी जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व, मुलांवर होणारे संस्कार आणि आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर स्पष्टपणे भाष्य केले. पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, वृक्षारोपण आणि सिंगल-यूज प्लास्टिकचा त्याग यासारख्या मुद्द्यांवरही त्यांनी ठोस भूमिका मांडली. तसेच स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील भेदभाव दूर करून एकात्मतेने पुढे जाणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संयोजक दत्तात्रय ढोले पाटील यांनी प्रस्तावनेत संमेलनाचा उद्देश स्पष्ट करत, “हे केवळ आयोजन नसून समाजाच्या अस्मितेचा आणि एकतेचा शक्तिप्रदर्शन आहे,” असे सांगितले. सर्व भेद विसरून एकत्र येण्याचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या मिरवणुकीने झाली. त्यानंतर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पारंपरिक युद्धकला, तलवारबाजी आणि दांडपट्टा सादरीकरणाने उपस्थितांची उत्सुकता वाढवली. संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. समारोपाच्या वेळी गोमातेची आरती करण्यात आली. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात साकारलेले दृश्य विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनुपमाताई पाटील यांनी मानले. एकूणच, ठाम भूमिका, मोठा सहभाग आणि सामाजिक संदेश यांच्या संगमामुळे हे संमेलन लक्षवेधी ठरले.
चिखलीत ‘विराट हिंदू संमेलन’ गाजले; धर्म, संघटन आणि स्वाभिमानावर जोरदार भूमिका कालिचरण महाराजांचे ठाम प्रतिपादन; समाज एकत्र येण्याचा आणि कृतीतून जागर करण्याचा संदेश पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी चिखली येथील नेवाळे वस्तीमध्ये पार पडलेल्या ‘विराट हिंदू संमेलनाने’ परिसरात मोठी चर्चा रंगवली. धर्मरक्षक भुजबळ प्रांगणात आयोजित या भव्य कार्यक्रमात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा जागर अनुभवला. हरिपाठ, भजनी मंडळे, महिला बचत गट, सामाजिक संस्था आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले. प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या कालिचरण महाराजांनी आपल्या भाषणात हिंदू समाजाच्या एकजुटीवर ठाम भूमिका मांडली. त्यांनी धर्माला केवळ श्रद्धा नसून जीवनपद्धती आणि शिस्तीचे शास्त्र म्हणून मांडत समाजाने संघटित होण्याची गरज अधोरेखित केली. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम समाजच देशाला बळकटी देऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या भाषणात त्यांनी इतिहास, परंपरा आणि धार्मिक प्रतीकांचा उल्लेख करत समाजाला जागरूक राहण्याचे आवाहन केले. समाजातील दुर्बलता, मतभेद आणि निष्क्रियता यावर त्यांनी टीका करत अधिक सजग, सक्रिय आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली. उपस्थितांमध्ये घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. या संमेलनात सामाजिक विषयांनाही तितकेच महत्त्व देण्यात आले. वक्ते अविनाश भेगडे यांनी ‘सामाजिक पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर भाष्य करत प्रत्येकाने समाज आणि देशासाठी जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. त्यांनी कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व, मुलांवर होणारे संस्कार आणि आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर स्पष्टपणे भाष्य केले. पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, वृक्षारोपण आणि सिंगल-यूज प्लास्टिकचा त्याग यासारख्या मुद्द्यांवरही त्यांनी ठोस भूमिका मांडली. तसेच स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आवाहन करण्यात आले. समाजातील भेदभाव दूर करून एकात्मतेने पुढे जाणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे संयोजक दत्तात्रय ढोले पाटील यांनी प्रस्तावनेत संमेलनाचा उद्देश स्पष्ट करत, “हे केवळ आयोजन नसून समाजाच्या अस्मितेचा आणि एकतेचा शक्तिप्रदर्शन आहे,” असे सांगितले. सर्व भेद विसरून एकत्र येण्याचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या मिरवणुकीने झाली. त्यानंतर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पारंपरिक युद्धकला, तलवारबाजी आणि दांडपट्टा सादरीकरणाने उपस्थितांची उत्सुकता वाढवली. संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. समारोपाच्या वेळी गोमातेची आरती करण्यात आली. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात साकारलेले दृश्य विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनुपमाताई पाटील यांनी मानले. एकूणच, ठाम भूमिका, मोठा सहभाग आणि सामाजिक संदेश यांच्या संगमामुळे हे संमेलन लक्षवेधी ठरले.
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी1
- Post by अमोल भालेराव4
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- विक्रम शिंदे /भोर दि.20तालुक्याच्या भाटघर धरण क्षेत्रातील पसुरे मधील टोंगेवाडी येथे पुणे येथील आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या वतीने नागरिकांना आरोग्यहितकारक थंडगार पाण्यासाठी माठ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे गौरव मुनोत,सुरेशनाना धुमाळ,दत्तात्रेयदादा धुमाळ,संतोष धुमाळ,मनोज धुमाळ तसेच महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रति कुटुंब एक असे माठ वितरित करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी व महिलांनी माठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1