Shuru
Apke Nagar Ki App…
बैलगाडा संघटना; तालुकाध्यक्षपदी सागर कल्याणशेट्टी यांची निवड अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांची निवड झाली. कार्यकारिणीत रेखप्पा समाणे-कायाध्यक्ष, बसवराज प्रचंडे-उपाध्यक्ष, शिवानंद हिरमठ-उपाध्यक्ष, रोहित बिराजदार-खजिनदार, सुनील कामटे-सहखजिनदार, राहुल सुरवसे-सल्लागार, किरण पाटील-सचिव, सिद्धार्थ समाणे-सहसचिव, सोहेल हिरजाळी-सदस्य व यादव इंगुले-सदस्य यांची निवड करण्यात आली. यावेळी माणिक वाघमोडे, अजित जगताप, विजय काळे, चेतन पवार उपस्थित होते.
Akkalkot news
बैलगाडा संघटना; तालुकाध्यक्षपदी सागर कल्याणशेट्टी यांची निवड अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांची निवड झाली. कार्यकारिणीत रेखप्पा समाणे-कायाध्यक्ष, बसवराज प्रचंडे-उपाध्यक्ष, शिवानंद हिरमठ-उपाध्यक्ष, रोहित बिराजदार-खजिनदार, सुनील कामटे-सहखजिनदार, राहुल सुरवसे-सल्लागार, किरण पाटील-सचिव, सिद्धार्थ समाणे-सहसचिव, सोहेल हिरजाळी-सदस्य व यादव इंगुले-सदस्य यांची निवड करण्यात आली. यावेळी माणिक वाघमोडे, अजित जगताप, विजय काळे, चेतन पवार उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सांगली मध्ये 'स्वामीराया' नाटकाचे नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन स्वामीराया नाटकामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतार कार्याची महिमा आणि भक्तांना आलेली प्रचिती घराघरात पोहोचेल. असे उपक्रम समाजाला अध्यात्माकडे नेणारे आहेत. या नाटकाच्या माध्यमातून साऱ्याच भाविकांना स्वामी भक्तीची ओढ निर्माण होईल असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन, भाजपा नेते तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. नुकतच सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे 'स्वामीराया' या मराठी नाटकाचा भक्ती प्रयोग सादर झाला. या भक्ती प्रयोग नाटकाचे उद्घाटन नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामींची आरती करुन करण्यात आले. यावेळी महेश इंगळे बोलत होते. नाट्यसेवा पाहून पुढे बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की या नाटकातील कलाकारांनी स्वामी सेवेचे पात्र साकारुन आपल्या कलेला न्याय दिला आहे. प्रपंच आणि परमार्थ याची सांगड कशी घालावी याची शिकवण स्वामींनी भक्तांना दिली आहे आणि स्वामींचे हेच जीवनकार्य या नाटकाच्या माध्यमातून दर्शविण्याचे कार्य या कलाकरांनी केले आहे. आपल्याला सर्व कलाकारांचे अगदी मनापासून कौतुक वाटते कारण सर्व कलाकारांचे जीवन या नाटकातील पात्रामुळे धन्य झाले आहे. या सर्वांवर स्वामी कृपा कायम रहावी या करीता या नाटकाचे औचित्य साधून या गुणी कलाकारांचा आज येथे अक्कलकोट वटवृक्ष निवासी स्वामींचे कृपावस्त्र देऊन सत्कार केला आहे आणि आणि कार्यक्रमाचे आयोजक हडदरे बंधू व सर्व कलाकारांच्या पुढील वाटचालीस तसेच स्वामीराया या नाटकाच्या पुढील नाट्य प्रयोगांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तत्पूर्वी या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.शेखर इनामदार,मा.आमदार गणेश काका गाडगीळ, मा.दिनकर तात्या पाटील, ऑल इंडिया फार्मसी कौन्सिलचे डायरेक्टर मा.विजय पाटील, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ.रविंद्र पाटील, कार्यक्रमाचे आयोजक सुशील हडदरे बंधू व मान्यवरांचा चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र,प्रसाद देऊन सत्कार केला. तसेच यावेळी स्वामीराया नाट्य ग्रुपच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांनी चेअरमन महेश इंगळे व अक्कलकोटचे प्रतिष्ठित उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. राजू मलंग, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील रणशिंगे, डॉ.विश्व परतूरे, सौरभ माणगांवकर, स्वामीनाथ मुसळे, धीरज कलशेट्टी, संतोष भुजंगे आदींसह अनेक ज्ञात-अज्ञात स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.1
- लातुरात लोककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लातूर : बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात "जल्लोष लोककलेचा" या शिर्षकखाली लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीला लोककलांचे ज्ञान व्हावे यासाठी लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, लातूर येथे होणार असून या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला, लोकगीत, लोकनृत्य, लोकवाद्य आदिविषयी सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके होणार आहेत. नव्या पिढीला लोककलांची माहिती व महती कळावी, त्यात गोडी निर्माण व्हावी तथा या माध्यमातून नवे लोककलावंत व रसिक निर्माण व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेस मोफत प्रवेश असून जिल्हा व परिसरातील अधिकाधिक सर्वच वयाच्या विद्यार्थी व रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, बालरंगभूमी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, महोत्सव प्रमुख मयूर राजापूरे, प्रा. नवलाजी जाधव, प्रा. वैभव माने, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, रवी अघाव, रवीकिरण सावंत, अॅड. बालाजी म्हेत्रे व बालरंगभूमी परिषद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.1
- शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी - शरद मगर शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुप्टाचे तीव्र निदर्शने माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन; प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी - शरद मगर बीड : महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) बीड जिल्हा शाखेच्या वतीने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद बीड येथे तीव्र स्वरूपाची निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण विभागाकडे सादर करून प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद मगर व पदाधिकारी शिक्षक प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुप्टाच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सध्या असलेली ३० विद्यार्थ्यांची बॅच रद्द करून पूर्वीप्रमाणे २० विद्यार्थ्यांची बॅच कायम ठेवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकीत वेतन देयके तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय देयके, वरिष्ठ वेतनश्रेणी फरक, निवडश्रेणी फरक तसेच सातवा वेतन आयोग फरक यांचा समावेश आहे. शिक्षण विभागातील वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या प्रलंबित संचिका तात्काळ मंजूर कराव्यात, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ आयडीच्या शिफारस प्रस्तावांचा तातडीने निपटारा करावा, जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत समायोजन करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. सन २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांची बंद करण्यात आलेली जीपीएफ खाती पूर्ववत करून नियमित कपात सुरू करावी. सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पाचवा हप्ता रोखीने द्यावा. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पर्यंतची जीपीएफ खाते स्लिप वितरित करून जीपीएफ खाती ऑनलाइन करण्यात यावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. याशिवाय प्रचलित अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यात यावा आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. यावेळी मुप्टा बीड जिल्हाध्यक्ष शरद मगर आणि जिल्हासचिव शशिकांत जावळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रलंबित मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. अन्यथा लवकरच छत्रपती संभाजीनगर कारल्या बाहेर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.2
- Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे! Bade Mudde News | मंडळी, ज्या माय मराठीनं परप्रातियांना भाकरी दिली, त्यांच्या चुली पेटवल्या, त्यांची पोटं भरली... त्याच भाकरीशी कशी प्रतारणा सुरू आहे, याचं ज्वलंत उदाहरण आज मुंबईच्या रस्त्यांवर रोज पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या जनतेच्या घामाच्या पैशांवर स्वतःचा संसार उभा करायचा... आणि ज्या भाषेनं जगण्याचा घास दिला, ती जुजबी भाषा शिकायचीही तसदी घ्यायची नाही? ही साधी अनास्था नाही, सरळसरळ मुजोरी आहे!1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- कर्जत तालुक्यात अंगणवाडी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे धान्य निकृष्ट1
- पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पत्रकारांवरील दडपशाही थांबवून दाखल गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी बीड : एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजरी यांच्यावर करण्यात आलेल्या अन्यायकारक पोलिस कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होत असलेल्या कथित दडपशाहीचा निषेध करत संबंधित प्रकरणातील गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पत्रकार हे समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे माध्यम असून, सत्य परिस्थिती उजेडात आणताना पत्रकारांवर दबाव अथवा पोलिस कारवाई होणे ही चिंतेची बाब आहे. पत्रकारांवरील अशा प्रकारची दडपशाही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात करणारी असल्याचे निदर्शकांनी म्हटले. यावेळी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी पत्रकार मंदार गोंजरी यांच्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून अन्यायकारक कारवाई मागे घेण्याची मागणी केली. पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी प्रशासनाने पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. पत्रकारांवरील कारवाईचा निषेध करत निदर्शकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. संबंधित प्रकरणात तातडीने योग्य ती कार्यवाही करून पत्रकारांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.1