अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यासोबतच एसटी बस चालक दिलिप दशरथ राजळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान सोहळा आणि कासार पिंपळगावची ग्रामसभाही उत्साहात पार पडली. देशभरात अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी झाली, त्याच अनुषंगाने कासार पिंपळगावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हे पूजन माजी सरपंच मोनालीताई राजळे, सेवानिवृत्त एसटी बस चालक दिलिप राजळे आणि पत्रकार सुनिल नजन यांच्या हस्ते झाले. एसटी महामंडळाच्या पाथर्डी आगाराचे चालक दिलिप दशरथ राजळे यांनी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्ती घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर प्रशासक मोनालीताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अनेक नागरिकांनी गावातील कचरा कुंड्या, स्मशानभूमीवरील खर्च, खराब रस्ते, वारंवार विस्कळीत होणारा सार्वजनिक पिण्याच्या पाणीपुरवठा, विजेचा लपंडाव, तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांवरील खर्च अशा अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित केले. लोकशाहीमध्ये पारदर्शक कारभारासाठी सार्वजनिक हिताचे प्रश्न विचारणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे अधोरेखित झाले. एका सुज्ञ नागरिकाने लहानपणापासून दारूबंदीसाठी अनेक ठराव मांडून प्रयत्न केल्याचे सांगितले, पण आजपर्यंत गावात दारूबंदी झालीच नाही, असे म्हणताच सभेत हास्यांचा कल्लोळ उठला. दारूबंदी आणि मटका बंदीसाठी थेट जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) पत्र देण्याची सूचना करण्यात आली. अंगणवाडीचे नाव बदलण्याची आणि सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या अनुपलब्धतेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देण्याची मागणीही नागरिकांनी केली. सुरुवातीला कोरमअभावी तहकूब होण्याच्या मार्गावर असलेली ही ग्रामसभा नंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाल्यामुळे यशस्वी झाली आणि नेहमीपेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले. ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावाने १५ लाख रुपयांचे तालुक्यातील पहिले बक्षीस मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सर्वांचे, विशेषतः युवा वर्गाचे आभार मानले. प्रशासक मोनालीताई राजळे यांनी अध्यक्षीय भाषणात आवाहन केले की, राजकारण फक्त निवडणुकांपुरते मर्यादित ठेवावे आणि आता विकासकामांत सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. विकास कामे करताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, कोणी दुखावले गेले असेल किंवा काही घटकांना न्याय देता आला नसेल तर मोठ्या मनाने माफ करावे, पण आता खांद्याला खांदा लावून विकासासाठी काम करावे. विकास कामासाठी गावाला बक्षीस मिळाले तर तो गावाचा सन्मान असून त्यात आपले नाव मोठे होणार आहे, आपण फक्त निमित्तमात्र आहोत असे त्यांनी नमूद केले. येत्या २ जून रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बक्षीस मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एक समिती गावात पाहणीसाठी येणार आहे. या समितीच्या स्वागतासाठी गावातील सर्वसामान्य घटकांनी पुढे यावे, सर्व सरकारी कार्यालये उजळून निघावीत आणि प्रत्येक महिलेने आपल्या घरासमोर रांगोळी, सडा-सारवण करून परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन मोनालीताई राजळे यांनी केले. शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक पाणीपुरवठा केंद्रे, मंदिरे, सरकारी दवाखाना, पशु उपचार केंद्र, वाचनालय, परसबाग, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमीसह सर्व सरकारी कार्यालये आणि परिसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन त्यांनी केले. गावातील मतभेद विसरून सर्व ग्रामस्थांनी या समितीच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे, असेही त्यांनी सांगितले. या ग्रामसभेत युवा नेते संदिप राजळे, गोरक्षनाथ राजळे सर, दिलिप राजळे सर, भा.पा.राजळे, गणेश भगत, प्रमोद तिजोरे, नवनाथ तिजोरे, अंकुश जगताप, विजय राजळे, उत्तम राजळे, अमोल म्हस्के यांसह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. दत्तात्रय शेळके सर यांनी जनगणना करताना भिल्ल समाज वस्तीला पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा गंभीर प्रश्न मांडला, ज्यामुळे गावात भिल्ल वस्तीत पाणीटंचाई असल्याचे स्पष्ट झाले. एकंदरीत, खेळीमेळीच्या वातावरणात ही ग्रामसभा संपन्न झाली, ज्यात गावातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यासोबतच एसटी बस चालक दिलिप दशरथ राजळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान सोहळा आणि कासार पिंपळगावची ग्रामसभाही उत्साहात पार पडली. देशभरात अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी झाली, त्याच अनुषंगाने कासार पिंपळगावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हे पूजन माजी सरपंच मोनालीताई राजळे, सेवानिवृत्त एसटी बस चालक दिलिप राजळे आणि पत्रकार सुनिल नजन यांच्या हस्ते झाले. एसटी महामंडळाच्या पाथर्डी आगाराचे चालक दिलिप दशरथ राजळे यांनी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्ती घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर प्रशासक मोनालीताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अनेक नागरिकांनी गावातील कचरा कुंड्या, स्मशानभूमीवरील खर्च, खराब रस्ते, वारंवार विस्कळीत होणारा सार्वजनिक पिण्याच्या पाणीपुरवठा, विजेचा लपंडाव, तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांवरील खर्च अशा अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित केले. लोकशाहीमध्ये पारदर्शक कारभारासाठी सार्वजनिक हिताचे प्रश्न विचारणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे अधोरेखित झाले. एका सुज्ञ नागरिकाने लहानपणापासून दारूबंदीसाठी अनेक ठराव मांडून प्रयत्न केल्याचे सांगितले, पण आजपर्यंत गावात दारूबंदी झालीच नाही, असे म्हणताच सभेत हास्यांचा कल्लोळ उठला. दारूबंदी आणि मटका बंदीसाठी थेट जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) पत्र देण्याची सूचना करण्यात आली. अंगणवाडीचे नाव बदलण्याची आणि सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या अनुपलब्धतेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र देण्याची मागणीही नागरिकांनी केली. सुरुवातीला कोरमअभावी तहकूब होण्याच्या मार्गावर असलेली ही ग्रामसभा नंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाल्यामुळे यशस्वी झाली आणि नेहमीपेक्षा जास्त प्रश्न विचारले गेले. ग्रामविकास अधिकारी प्रमोद म्हस्के यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावाने १५ लाख रुपयांचे तालुक्यातील पहिले बक्षीस मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल सर्वांचे, विशेषतः युवा वर्गाचे आभार मानले. प्रशासक मोनालीताई राजळे यांनी अध्यक्षीय भाषणात आवाहन केले की, राजकारण फक्त निवडणुकांपुरते मर्यादित ठेवावे आणि आता विकासकामांत सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. विकास कामे करताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, कोणी दुखावले गेले असेल किंवा काही घटकांना न्याय देता आला नसेल तर मोठ्या मनाने माफ करावे, पण आता खांद्याला खांदा लावून विकासासाठी काम करावे. विकास कामासाठी गावाला बक्षीस मिळाले तर तो गावाचा सन्मान असून त्यात आपले नाव मोठे होणार आहे, आपण फक्त निमित्तमात्र आहोत असे त्यांनी नमूद केले. येत्या २ जून रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय बक्षीस मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एक समिती गावात पाहणीसाठी येणार आहे. या समितीच्या स्वागतासाठी गावातील सर्वसामान्य घटकांनी पुढे यावे, सर्व सरकारी कार्यालये उजळून निघावीत आणि प्रत्येक महिलेने आपल्या घरासमोर रांगोळी, सडा-सारवण करून परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन मोनालीताई राजळे यांनी केले. शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक पाणीपुरवठा केंद्रे, मंदिरे, सरकारी दवाखाना, पशु उपचार केंद्र, वाचनालय, परसबाग, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमीसह सर्व सरकारी कार्यालये आणि परिसराची स्वच्छता राखण्याचे आवाहन त्यांनी केले. गावातील मतभेद विसरून सर्व ग्रामस्थांनी या समितीच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे, असेही त्यांनी सांगितले. या ग्रामसभेत युवा नेते संदिप राजळे, गोरक्षनाथ राजळे सर, दिलिप राजळे सर, भा.पा.राजळे, गणेश भगत, प्रमोद तिजोरे, नवनाथ तिजोरे, अंकुश जगताप, विजय राजळे, उत्तम राजळे, अमोल म्हस्के यांसह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. दत्तात्रय शेळके सर यांनी जनगणना करताना भिल्ल समाज वस्तीला पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा गंभीर प्रश्न मांडला, ज्यामुळे गावात भिल्ल वस्तीत पाणीटंचाई असल्याचे स्पष्ट झाले. एकंदरीत, खेळीमेळीच्या वातावरणात ही ग्रामसभा संपन्न झाली, ज्यात गावातील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सिल्लोड येथे आयोजित सेवागौरव समारंभात शेषराव उदार यांनी मंचावरून एक भावुक भाषण दिले. या विशेष प्रसंगी उदार साहेब काय बोलले, हे ऐकण्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.1
- रात्री उशिरा झालेल्या अडीच तासांच्या चर्चेनंतर सरकारने मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या संघर्ष युद्धानंतर झालेल्या चर्चेत मराठा समाजाचा विजय झाला, असे सांगण्यात आले. मध्यरात्री दीड वाजता मराठा समाजात आनंदाचा गुलाल उधळून हा विजय साजरा करण्यात आला.1
- बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) खरात यांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करत, त्यांना भ्रष्टाचाऱ्यांचे रक्षक मानले जात आहे की जनतेचे शत्रू, असा थेट सवाल केला जात आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात आज दुपारनंतर तुरळक स्वरूपात पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे आणि पाणीटंचाईच्या समस्येमुळे नागरिक व शेतकरी चिंतेत होते. या हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उंडणगाव आणि परिसरातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीत असून ते पावसाच्या प्रतीक्षेत होते. यापूर्वी सिल्लोड तालुक्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती, तसेच उंडणगाव परिसरातील जलसाठेही अत्यल्प पातळीवर पोहोचले होते. सध्या झालेला पाऊस अल्प प्रमाणात असला तरी, आगामी काही दिवसांत चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शेतकऱ्यांच्या नजरा आता वरुणराजाच्या पुढील आगमनाकडे लागल्या आहेत.1
- जालना तालुक्यातील पीरकल्याण परिसरात शुक्रवारी सायंकाळी एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अतुल शिमोन आघाम (वय २२) असे मृत युवकाचे नाव असून, तो पीरकल्याण गावचा रहिवासी होता. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांना समजले आहे. संशयितांनी अतुलवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले होते, त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी जालना तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक संतोष साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुरावे जमा करत पोलिसांनी दोन मुख्य संशयितांना लवकरात लवकर ताब्यात घेतले असून, आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक पुरावे हे हत्या आखूनबुडून केल्याचे दर्शवत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबान्या यांचा अभ्यास करून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला जात आहे. या घटनेमुळे पीरकल्याण आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. एकेकाळी शांत असलेल्या जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात या घटनेमुळे पुन्हा हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकृत माहिती लवकरच पोलिसांकडून उपलब्ध होईल.1