logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विधानसभेत आ. श्रीजया चव्हाण भावूक महिलांसाठी समान संधींची ठाम मागणी. नांदेड l भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण आज आपल्या राजकीय प्रवासाबद्दल विधानसभेत बोलताना भावूक झाल्याचे दिसून आले. मी पहिल्यांदाच निवडून आलेली आमदार आहे. मला भाऊ नाही, पण अभिमानाने सांगते की, माझ्या नांदेड जिल्ह्यातील आणि भोकर मतदारसंघातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी मला भावासारखी साथ दिली. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी लोकांचे प्रश्न मांडू शकत आहे, अशा भावनांनी ओथंबलेल्या शब्दांत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी महिलांसाठी शासकीय योजना व उपाययोजना या विषयावर प्रस्ताव मांडला होता. त्या चर्चेत सहभागी होताना आ. श्रीजया चव्हाण यांनी महिलांशी निगडित अनेक विषयांवर मते मांडली. आम्ही जिजाऊ, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीआई आणि रमाईच्या लेकी आहोत. कुटुंबासाठी आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करण्याची आमची वृत्ती आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही सवलत नको, तर कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी समान संधी हवी, या शब्दांत त्यांनी स्त्री-शक्तीचा जागर केला. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा आहे. मात्र, पासष्टी ओलांडलेल्या अनेक महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा दैनंदिन गरजांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. त्यामुळे सरकारने या वयोमर्यादेचा फेरविचार करून ती ७५ वर्षांपर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. इडब्ल्यूएस, ओबीसी व एसईबीसी प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षण व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले. महिला दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा किंवा सन्मान करण्याचा वर्षातला एकच दिवस नसावा. स्त्रीचा सन्मान हा संस्कार असून तो वर्षाचे ३६५ दिवस जपला गेला पाहिजे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न महिलांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

2 hrs ago
user_Info news
Info news
Nanded, Maharashtra•
2 hrs ago
f8a88761-06d7-4e73-82cf-6ec5785dfbbf

विधानसभेत आ. श्रीजया चव्हाण भावूक महिलांसाठी समान संधींची ठाम मागणी. नांदेड l भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण आज आपल्या राजकीय प्रवासाबद्दल विधानसभेत बोलताना भावूक झाल्याचे दिसून आले. मी पहिल्यांदाच निवडून आलेली आमदार आहे. मला भाऊ नाही, पण अभिमानाने सांगते की, माझ्या नांदेड जिल्ह्यातील आणि भोकर मतदारसंघातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी मला भावासारखी साथ दिली. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी लोकांचे प्रश्न मांडू शकत आहे, अशा भावनांनी ओथंबलेल्या शब्दांत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी महिलांसाठी शासकीय योजना व उपाययोजना या विषयावर प्रस्ताव मांडला होता. त्या चर्चेत सहभागी होताना आ. श्रीजया चव्हाण यांनी महिलांशी निगडित अनेक विषयांवर मते मांडली. आम्ही जिजाऊ, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीआई आणि रमाईच्या लेकी आहोत. कुटुंबासाठी आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करण्याची आमची वृत्ती आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही सवलत नको, तर कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी समान संधी हवी, या शब्दांत त्यांनी स्त्री-शक्तीचा जागर केला. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी ६५ वर्षांची वयोमर्यादा आहे. मात्र, पासष्टी ओलांडलेल्या अनेक महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा दैनंदिन गरजांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. त्यामुळे सरकारने या वयोमर्यादेचा फेरविचार करून ती ७५ वर्षांपर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. इडब्ल्यूएस, ओबीसी व एसईबीसी प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षण व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचेही त्यांनी कौतुक केले. महिला दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा किंवा सन्मान करण्याचा वर्षातला एकच दिवस नसावा. स्त्रीचा सन्मान हा संस्कार असून तो वर्षाचे ३६५ दिवस जपला गेला पाहिजे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न महिलांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

More news from Maharashtra and nearby areas
  • 🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे. यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏 #Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏
    1
    🚩 पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩
हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव दत्त संस्थान येथे २० ते २७ मार्च २०२६ दरम्यान श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार आहे.
यापूर्वी परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन भाविकांना मार्गदर्शन करत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. 🙏
#Himayatnagar #Pimpalgaon #RamKatha #DattYagya #NamSankirtan ReligiousEvent Maharashtra SpiritualProgram Bhakti SanatanDharma 🚩🙏
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    15 hrs ago
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल
नांदेड:
शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला
या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
"आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
— स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते
आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
    1
    जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे
प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
    user_Shuddhodhan Dhawale
    Shuddhodhan Dhawale
    Voice of people नायगाव (खैरगाव), नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे
    4
    अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार
किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.