हिंगण्यात भू-माफियांना राजकारण्यांचे अभय..? नागरिकांचा संताप हिंगण्यात भू-माफियांना राजकारण्यांचे अभय..? नागरिकांचा संताप हिंगणा शहर प्रतिनिधी नागपूर/ हिंगणा; (दि ११ मे) हिंगणा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध उत्खनन, अतिक्रमण, भू-माफियांचे वाढते जाळे, पाणी टँकरमधील कथित घोटाळे आणि भूमी अभिलेख कार्यालयातून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर, वर्तमानपत्रांमध्ये आणि स्थानिक स्तरावर वारंवार या प्रकरणांची चर्चा होत असतानाही प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अद्याप ठोस कारवाई करताना दिसत नसल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हिंगणा तालुक्याच्या जवळच वरिष्ठ मंत्री आणि जबाबदार लोकप्रतिनिधींचे वास्तव्य असताना देखील या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक वेळा बातम्या, पुरावे आणि तक्रारी संबंधित कार्यालयांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यावर अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने “हे संरक्षण नेमके कोणाला?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी उघडपणे विचारू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवणारे भू-माफिया, नियमांना हरताळ फासून सुरू असलेले अवैध उत्खनन, पाणीटंचाईच्या काळात टँकर व्यवस्थेतील कथित गैरप्रकार आणि महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत आता सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आता प्रश्न एकच — जनतेच्या तक्रारींना न्याय मिळणार की सर्व काही राजकीय आणि प्रशासकीय संरक्षणाखालीच सुरू राहणार?
हिंगण्यात भू-माफियांना राजकारण्यांचे अभय..? नागरिकांचा संताप हिंगण्यात भू-माफियांना राजकारण्यांचे अभय..? नागरिकांचा संताप हिंगणा शहर प्रतिनिधी नागपूर/ हिंगणा; (दि ११ मे) हिंगणा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध उत्खनन, अतिक्रमण, भू-माफियांचे वाढते जाळे, पाणी टँकरमधील कथित घोटाळे आणि भूमी अभिलेख कार्यालयातून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर, वर्तमानपत्रांमध्ये आणि स्थानिक स्तरावर वारंवार या प्रकरणांची चर्चा होत असतानाही प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अद्याप ठोस कारवाई करताना दिसत नसल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हिंगणा तालुक्याच्या जवळच वरिष्ठ मंत्री आणि जबाबदार लोकप्रतिनिधींचे वास्तव्य असताना देखील या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अनेक वेळा बातम्या, पुरावे आणि तक्रारी संबंधित कार्यालयांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यावर अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने “हे संरक्षण नेमके कोणाला?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी उघडपणे विचारू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवणारे भू-माफिया, नियमांना हरताळ फासून सुरू असलेले अवैध उत्खनन, पाणीटंचाईच्या काळात टँकर व्यवस्थेतील कथित गैरप्रकार आणि महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत आता सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. आता प्रश्न एकच — जनतेच्या तक्रारींना न्याय मिळणार की सर्व काही राजकीय आणि प्रशासकीय संरक्षणाखालीच सुरू राहणार?
- शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे. आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।। - द किरण माने.1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या नागपूर :- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात एका १९ वर्षीय युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव लकी विजयराव कानफाडे असे आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा प्रक्रिया केली. यानंतर गळफास घेतलेल्या लकी कानफाडे यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे करीत आहेत.1
- उत्तर प्रदेशातील हापुड येथे महाराणा प्रताप जयंती शोभायात्रेदरम्यान मुस्लिमबहुल भागात दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून काही वाहनांचीही तोडफोड झाली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून पुढील तपास सुरू आहे.1
- मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.2
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- अभिनेता किरण माने यांनी आपल्या रक्तात 'शिव-भीम विचारांची धग आणि रग' भिनल्याचे मोठे विधान केले. कोल्हापुरातील त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर, त्यांनी आपल्या विरोधकांना डिवचत हे कॉम्बिनेशन 'लै खतरनाक' असल्याचे म्हटले. त्यांची तडफड हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या नागपूर :- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात एका १९ वर्षीय युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव लकी विजयराव कानफाडे असे आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा प्रक्रिया केली. यानंतर गळफास घेतलेल्या लकी कानफाडे यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे करीत आहेत.1
- पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतक-यांना दुहेरी फायदा नागपूर शहर प्रतिनिधी पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतक-यांना दुहेरी फायदा नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि १० मे) पाणंद रस्त्यांच्या बांधकामासाठी लागणारा मुरूम जर नदी, नाले व तलाव यांच्या खोलीकरणातून उपलब्ध करून घेतला, तर त्यातून दुहेरी फायदा होऊ शकतो असे प्रतिपादन आमदार आशीष देशमुख यांनी केले. एका बाजूला शेतकऱ्यांसाठी दर्जेदार पाणंद रस्त्यांचे बांधकाम होईल, तर दुसऱ्या बाजूला जलयुक्त शिवार व जलसंधारणाची प्रभावी कामेही पूर्ण होतील. नदी, नाले आणि तलावांचे खोलीकरण झाल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होऊन भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, विहिरी व बोअरवेलला पाणी टिकून राहील आणि भविष्यातील दुष्काळाच्या संकटावर मोठ्या प्रमाणात मात करता येईल.1