अग्निवीर भरतीस मध्यरात्री मॅरेथॉन ने प्रारंभ - जिल्हाधिकारी राठोड कर्नल प्रशांत सिंग सुभेदार मेजर यांचे सह मान्यवरांची उपस्थिती कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेस मध्यरात्री उत्साहात प्रारंभ- २९ सप्टेंबर दरम्यान चालणार प्रक्रिया कोल्हापूर -जिल्ह्यात ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेला बुधवारी मध्यरात्री उत्साहात सुरुवात झाली. या भरतीचे उद्घाटन मध्यरात्री जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते झाले. देश सेवेची उर्मी उराशी बाळगून मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीसाठी उपस्थित होते. सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल प्रशांत सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, लेफ्टनंट कर्नल डॉ. संबित पात्रा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार, तहसीलदार स्वप्निल पवार, सहाय्यक संचालक आर्मी भरती कार्यालय सुभेदार मेजर लखविंदर सिंग, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, ही भरती प्रक्रिया आगामी १७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी प्रशासनाकडून सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांसाठी भरती मैदान उत्तम स्थितीत तयार करण्यात आले असून, उमेदवारांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष वैद्यकीय (मेडिकल) टीम तैनात करण्यात आली आहे. विविध एनजीओ (NGOs) च्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी अल्पोपहार (नाश्ता) आणि जेवणाची योग्य सोय करण्यात आली आहे. दूरवरून येणाऱ्या उमेदवारांना रेल्वे स्टेशन व बस स्थानकावरून भरती स्थळापर्यंत येण्या-जाण्यासाठी 'केएमटी' (KMT) मार्फत विशेष बससेवेची उपलब्धता करून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या समन्वयातून कोल्हापुरातील ही अग्निवीर रॅली अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रिया-यशस्वीरीत्या सुरू; *जिल्हा प्रशासनाचे सहकार्य* *कौतुकास्पद* कर्नल प्रशांत सिंग म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेचे आयोजन अतिशय उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल लष्करी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून रॅलीच्या संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, जिल्हा प्रशासनाच्या या भक्कम पाठिंब्यामुळे कोल्हापूर परिसरातील जास्तीत जास्त तरुण मोठ्या संख्येने अग्निवीर म्हणून देशसेवेसाठी निवडले जातील.
अग्निवीर भरतीस मध्यरात्री मॅरेथॉन ने प्रारंभ - जिल्हाधिकारी राठोड कर्नल प्रशांत सिंग सुभेदार मेजर यांचे सह मान्यवरांची उपस्थिती कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रियेस मध्यरात्री उत्साहात प्रारंभ- २९ सप्टेंबर दरम्यान चालणार प्रक्रिया कोल्हापूर -जिल्ह्यात ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेला बुधवारी मध्यरात्री उत्साहात सुरुवात झाली. या भरतीचे उद्घाटन मध्यरात्री जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते झाले. देश सेवेची उर्मी उराशी बाळगून मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीसाठी उपस्थित होते. सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल प्रशांत सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, लेफ्टनंट
कर्नल डॉ. संबित पात्रा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार, तहसीलदार स्वप्निल पवार, सहाय्यक संचालक आर्मी भरती कार्यालय सुभेदार मेजर लखविंदर सिंग, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, ही भरती प्रक्रिया आगामी १७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी प्रशासनाकडून सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. यामध्ये उमेदवारांसाठी भरती मैदान उत्तम स्थितीत तयार करण्यात आले असून, उमेदवारांच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष वैद्यकीय (मेडिकल) टीम
तैनात करण्यात आली आहे. विविध एनजीओ (NGOs) च्या माध्यमातून सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी अल्पोपहार (नाश्ता) आणि जेवणाची योग्य सोय करण्यात आली आहे. दूरवरून येणाऱ्या उमेदवारांना रेल्वे स्टेशन व बस स्थानकावरून भरती स्थळापर्यंत येण्या-जाण्यासाठी 'केएमटी' (KMT) मार्फत विशेष बससेवेची उपलब्धता करून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या समन्वयातून कोल्हापुरातील ही अग्निवीर रॅली अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापुरात अग्निवीर भरती प्रक्रिया-यशस्वीरीत्या सुरू; *जिल्हा प्रशासनाचे सहकार्य* *कौतुकास्पद* कर्नल प्रशांत सिंग म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात
सुरू असलेल्या ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेचे आयोजन अतिशय उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल लष्करी अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे विशेष आभार मानले. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून रॅलीच्या संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, जिल्हा प्रशासनाच्या या भक्कम पाठिंब्यामुळे कोल्हापूर परिसरातील जास्तीत जास्त तरुण मोठ्या संख्येने अग्निवीर म्हणून देशसेवेसाठी निवडले जातील.
- कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये1
- १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.4
- *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* *लोकसंवाद 2026 कार्यक्रमात सेवा संकल्प अभियानाची माहिती* *नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध – मनुज जिंदल* प्रतिनिधी स्वाती हडकर *रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : स्वच्छता, आरोग्य, वृक्षारोपण आणि थेट जागेवरच शासकीय दाखल्यांचे वाटप.. जनसेवेचा हा महायज्ञ सध्या जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून पूर्ण ताकदीने सुरू आहे. लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकांने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध आहे,” अशी ग्वाही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.* माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कुवारबाव उत्कर्ष नगर वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे लोकसंवाद 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सेवा संकल्प अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी आधिकारी वैदेही रानडे उपस्थित होत्या. *प्रत्येक गावात लावणार १ हजार झाडे लावण्याचा संकल्प* जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, या अभियानांतर्गत आगामी काही दिवसांत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात १,००० वृक्षांची लागवड केली जाईल,” या उपक्रमात नागरिकांनीही सहभाग नोंदवावा. आजपासून 17 ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध विभागांच्या सेवा जनतेपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश आहे. *नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण* पंतप्रधान महोदयांच्या संवैधानिक पदावरील २५ वर्षांच्या लोकसेवेनिमित्त आयोजित हे अभियान केवळ उपक्रमांपुरते मर्यादित नसून थेट लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. नागरिकांना लागणारे विविध शासकीय दाखले, कागदपत्रांच्या अडचणी आणि प्रशासकीय कामे यांचे जागेवरच निराकरण केले जाणार आहे. विविध सेवा व तक्रारींचे निवारण एकाच छताखाली करण्यात येणार आहे. *प्रशासन २४ तास जनतेच्या सेवेसाठी सज्ज - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व महसूल अधिकारी स्वतःहून पुढाकार घेत आहेत, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “पुढील महिनाभर चालणाऱ्या या लोककल्याणकारी अभियानात प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी आमचे संपूर्ण प्रशासन २४ तास उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले. वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळाने उत्सवाचे रूपांतर सामाजिक सेवेत केल्याचा उल्लेख करुन गणेश मंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील वडार, उपाध्यक्ष विलास माने, खजिनदार सागर वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 0001
- उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना1
- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव1
- आरोग्य यंत्रणा गोरगरीब रुग्णाची लूट कशी करू शकते ते पहा एक अधिकारी कर्तव्यदक्ष असेल तर येवढ उघड होऊ शकतं; तर हजारो IPS, IAS, IRS, IFS अधिकारी ज्यांना देशाच्या घटनेन संरक्षण दिल आहे व राजकिय हस्तक्षेप त्यांच काहीच वाकडं करू शकत नाही मग काय होऊ शकेल!!!! पण भ्रस्टाचारान सर्व व्यवस्था पोकरली गेली आहे. ग्रामपंचायतीपासु ते दील्लीपर्यंत सरकारी अधिकारी राजकिय व्यवस्थेच बाहुल होऊन काम करतात आणि यामधे पिळला जाठतो सामान्य नागरीक. विचार करा जवळपास ७० ते ८०% जनता दिवसाला ५०० रूपये कमवत नाही आणि एक IV सेट मधिल कमाई. ही सर्वच औषधांची कहानी. हे गेली कित्तेक वर्ष चालू आहे. १० रू च्या वस्तुवर ४०० किंवा ५०० रूपये किंमत कशी छापली जाऊ शकते??? मोदीसाहेब जे जनरीक स्वस्त म्हणतात तिथे पण काही वेगळी परिस्थीती नाही. जे अरोग्य व्यवसायाशी संमंधीत आहेत त्याना सर्व माहित आहे. ही गरीबांची पिळवनुक आहे,1
- *तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर भीषण अपघात; सहा वर्षांच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू!* *तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर भीषण अपघात; सहा वर्षांच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू!*1