logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेगाव येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे एक मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. गावातील इंगळे मळा परिसरात तुटलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका शेळीचा मृत्यू झाला, तर तिला वाचवण्यासाठी गेलेला १६ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी जालिंदर इंगळे यांची शेळी रविवारी सकाळी विजेचा धक्का लागून जागीच मृत्युमुखी पडली. या शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांचा १६ वर्षीय मुलगा ऋषिकेश इंगळे यालाही विजेचा धक्का बसला, मात्र त्याने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, ही विजेची तार गेल्या वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत खाली लोंबत होती. याबाबत अनेकदा संबंधित वायरमनला माहिती देऊनही दुरुस्ती करण्यात आली नाही. काही महिन्यांपूर्वी रोहित्र जळाल्यानंतरही ही तुटलेली तार दाखवून देण्यात आली होती, तरीही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पंचायत समिती सदस्य कुशल नाना सातव यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, त्यांनी यापूर्वी १२ मे रोजी महावितरणकडे तुटलेल्या तारा, रोहित्र आणि फ्युज बॉक्सच्या तातडीच्या दुरुस्तीची लेखी मागणी केली होती. त्यांच्या मते, महावितरणच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडला. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि वायरमनवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वाईकर यांनी “वायरमनची चौकशी करून योग्य ती कारवाई करू” अशी प्रतिक्रिया दिली आहे. वाडेगाव परिसरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, तुटलेल्या विजेच्या तारा आणि धोकादायक विद्युत यंत्रणांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

1 hr ago
user_Sachin Reporter Pune
Sachin Reporter Pune
पत्रकार Shirur, Pune•
1 hr ago

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाडेगाव येथे महावितरणच्या कथित हलगर्जीपणामुळे एक मोठा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. गावातील इंगळे मळा परिसरात तुटलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका शेळीचा मृत्यू झाला, तर तिला वाचवण्यासाठी गेलेला १६ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी जालिंदर इंगळे यांची शेळी रविवारी सकाळी विजेचा धक्का लागून जागीच मृत्युमुखी पडली. या शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांचा १६ वर्षीय मुलगा ऋषिकेश इंगळे यालाही विजेचा धक्का बसला, मात्र त्याने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिक शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, ही विजेची तार गेल्या वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत खाली लोंबत होती. याबाबत अनेकदा संबंधित वायरमनला माहिती देऊनही दुरुस्ती करण्यात आली नाही. काही महिन्यांपूर्वी रोहित्र जळाल्यानंतरही ही तुटलेली तार दाखवून देण्यात आली होती, तरीही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पंचायत समिती सदस्य कुशल नाना सातव यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, त्यांनी यापूर्वी १२ मे रोजी महावितरणकडे तुटलेल्या तारा, रोहित्र आणि फ्युज बॉक्सच्या तातडीच्या दुरुस्तीची लेखी मागणी केली होती. त्यांच्या मते, महावितरणच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात घडला. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि वायरमनवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वाईकर यांनी “वायरमनची चौकशी करून योग्य ती कारवाई करू” अशी प्रतिक्रिया दिली आहे. वाडेगाव परिसरातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, तुटलेल्या विजेच्या तारा आणि धोकादायक विद्युत यंत्रणांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिरूर शहरात वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सोमवारी शहरातील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे हलवाई चौक परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने हलवाई चौक आणि सरदार पेठ परिसरात कारवाई केली, ज्यात जैन मंदिराच्या मागील उर्दू शाळेकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरील टपरी हटवण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठा असलेल्या कापड बाजार, आडत बाजार आणि सुभाष चौक परिसरातील दुकानांसमोरील शेड, पाट्या, ओटे व पायऱ्या देखील काढण्यात आल्या. रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी इतर अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना रोड येथे स्वतंत्र पथकांमार्फत एकाच वेळी कारवाई करण्यात आली. ही मोहीम जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या मदतीने राबविण्यात आली, ज्यात १७७ हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, कर निरीक्षक माधव गाजरे यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचारी यात सहभागी झाले होते. मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट केले की, शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे आणि अशा मोहिमा भविष्यातही नियमितपणे सुरू राहतील. नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण करू नये आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले आहे.
    3
    शिरूर शहरात वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सोमवारी शहरातील विविध भागांत ही कारवाई करण्यात आली, ज्यामुळे हलवाई चौक परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने हलवाई चौक आणि सरदार पेठ परिसरात कारवाई केली, ज्यात जैन मंदिराच्या मागील उर्दू शाळेकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरील टपरी हटवण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठा असलेल्या कापड बाजार, आडत बाजार आणि सुभाष चौक परिसरातील दुकानांसमोरील शेड, पाट्या, ओटे व पायऱ्या देखील काढण्यात आल्या. रस्त्यांवरील अनधिकृत टपऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी इतर अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना रोड येथे स्वतंत्र पथकांमार्फत एकाच वेळी कारवाई करण्यात आली. ही मोहीम जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या मदतीने राबविण्यात आली, ज्यात १७७ हून अधिक अतिक्रमणे काढण्यात आली.

मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली, तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, कर निरीक्षक माधव गाजरे यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचारी यात सहभागी झाले होते.

मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी स्पष्ट केले की, शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे आणि अशा मोहिमा भविष्यातही नियमितपणे सुरू राहतील. नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण करू नये आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात आले आहे.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    9 min ago
  • पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतूक आणि साठ्याविरोधात एक मोठी धडक कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर मोठा प्रहार केला आहे. या कारवाईत विभागाने तब्बल २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १,७१६ बॉक्स मद्यसाठ्यासह दोन कंटेनर वाहनांचा समावेश आहे.
    1
    पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतूक आणि साठ्याविरोधात एक मोठी धडक कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर मोठा प्रहार केला आहे. या कारवाईत विभागाने तब्बल २ कोटी ३ लाख ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १,७१६ बॉक्स मद्यसाठ्यासह दोन कंटेनर वाहनांचा समावेश आहे.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    1 hr ago
  • पिंपरी चिंचवडमधून अजित पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि विधान परिषद लढण्यास इच्छुक असलेले योगेश बहल यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. बहलांच्या मते, जर 'अजित दादा हयात असते' तर भाजपने पुणे विधान परिषदेच्या जागेवर हक्क दाखवत अशा 'वल्गना' केल्या नसत्या. या विधानामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. बहलांना विचारण्यात आले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राजकारणात तुलनेने नवख्या असल्याने भाजप याचा फायदा घेऊ इच्छित आहे का, आणि भाजप सुनेत्रा वहिणींची कोंडी करत आहे का? यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपने सुनेत्रा वहिणींची कोंडी करत असल्याचे म्हटले, ज्यामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, बहलांनी यासोबतच सुनेत्रा वहिनी खंबीर असून त्या पुणे विधान परिषदेची राष्ट्रवादीच्या हक्काची जागा निश्चितपणे मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत कोणताही तिढा निर्माण होणार नाही, असे दावे दोन्ही बाजूंनी केले जात असले तरी, योगेश बहलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
    1
    पिंपरी चिंचवडमधून अजित पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि विधान परिषद लढण्यास इच्छुक असलेले योगेश बहल यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. बहलांच्या मते, जर 'अजित दादा हयात असते' तर भाजपने पुणे विधान परिषदेच्या जागेवर हक्क दाखवत अशा 'वल्गना' केल्या नसत्या. या विधानामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

बहलांना विचारण्यात आले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राजकारणात तुलनेने नवख्या असल्याने भाजप याचा फायदा घेऊ इच्छित आहे का, आणि भाजप सुनेत्रा वहिणींची कोंडी करत आहे का? यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपने सुनेत्रा वहिणींची कोंडी करत असल्याचे म्हटले, ज्यामुळे नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, बहलांनी यासोबतच सुनेत्रा वहिनी खंबीर असून त्या पुणे विधान परिषदेची राष्ट्रवादीच्या हक्काची जागा निश्चितपणे मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला.

पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत कोणताही तिढा निर्माण होणार नाही, असे दावे दोन्ही बाजूंनी केले जात असले तरी, योगेश बहलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पुण्यातील वारजे परिसरात नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कारवाईला कायद्याचा धाक म्हणून पाहायचे की ती केवळ दडपशाही आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
    1
    पुण्यातील वारजे परिसरात नुकत्याच झालेल्या पोलीस कारवाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कारवाईला कायद्याचा धाक म्हणून पाहायचे की ती केवळ दडपशाही आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी करत, एका तरुणीची अश्लील हावभाव करून छेडछाड करणाऱ्या विकृताला अटक केली आहे.
    1
    पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी करत, एका तरुणीची अश्लील हावभाव करून छेडछाड करणाऱ्या विकृताला अटक केली आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पुण्यातील वडगाव शेरी परिसरात उघडपणे कचरा आणि ‘डेब्रिज’ची होळी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याविरोधात पुणे पँथर सेनेने तीव्र भूमिका घेतली असून, त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे (PMC) याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तसेच, या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास, पुणे पँथर सेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
    1
    पुण्यातील वडगाव शेरी परिसरात उघडपणे कचरा आणि ‘डेब्रिज’ची होळी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याविरोधात पुणे पँथर सेनेने तीव्र भूमिका घेतली असून, त्यांनी पुणे महानगरपालिकेकडे (PMC) याबाबत अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तसेच, या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास, पुणे पँथर सेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुण्यात आज पुणे शहर काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन केले. 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून देशाची सत्ता हस्तगत केलेल्या नरेंद्र मोदींनी फक्त बड्या उद्योगपतींनाच 'अच्छे दिन' दिल्याची टीका काँग्रेसने यावेळी केली. सामान्य जनता मात्र महागाईचे चटके सोसत असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गडगडलेल्या असतानाही मोदी सरकारने उद्योगपती मित्रांची तिजोरी भरल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आता तर कोणत्याही युद्धाचे कारण सांगून मोदी सरकार देशावर इंधन दरवाढीचा बोजा टाकत असून, त्यामुळे देशातील जनता भरडली जात असल्याचा दावाही करण्यात आला. या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दणाणून गेला. या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सामान्य पुणेकर नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. मोहनदादा जोशी, प्रदेश प्रवक्ते श्री. गोपालदादा तिवारी, महानगरपालिकेतील गटनेते श्री. चंदूशेठ कदम, नगरसेविका दिपाली डोख, मजहर मणियार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे आणि पप्पू घोलप यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    पुण्यात आज पुणे शहर काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन केले. 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून देशाची सत्ता हस्तगत केलेल्या नरेंद्र मोदींनी फक्त बड्या उद्योगपतींनाच 'अच्छे दिन' दिल्याची टीका काँग्रेसने यावेळी केली. सामान्य जनता मात्र महागाईचे चटके सोसत असून, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गडगडलेल्या असतानाही मोदी सरकारने उद्योगपती मित्रांची तिजोरी भरल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आता तर कोणत्याही युद्धाचे कारण सांगून मोदी सरकार देशावर इंधन दरवाढीचा बोजा टाकत असून, त्यामुळे देशातील जनता भरडली जात असल्याचा दावाही करण्यात आला.

या इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दणाणून गेला. या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सामान्य पुणेकर नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. मोहनदादा जोशी, प्रदेश प्रवक्ते श्री. गोपालदादा तिवारी, महानगरपालिकेतील गटनेते श्री. चंदूशेठ कदम, नगरसेविका दिपाली डोख, मजहर मणियार, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे आणि पप्पू घोलप यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • शिरूर शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने एक विशेष मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान दुकानांबाहेरील पत्र्याचे शेड, सिमेंटचे ओटे आणि अन्य अतिक्रमणे हटवण्यात आली. मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी, ट्रॅक्टर, स्वच्छता विभागातील कर्मचारी, पालिकेचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळाला.
    1
    शिरूर शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने एक विशेष मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान दुकानांबाहेरील पत्र्याचे शेड, सिमेंटचे ओटे आणि अन्य अतिक्रमणे हटवण्यात आली. मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबी, ट्रॅक्टर, स्वच्छता विभागातील कर्मचारी, पालिकेचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीला मोठा दिलासा मिळाला.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.