माता-भगिनींच्या आशिर्वादामुळे यशस्वी झाला हळदी कुंकुचा कार्यक्रम चपळगांव येथे ग्रामपंचायत परिवाराकडून शुक्रवारी २७ मार्च रोजी सायंकाळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हळदी कुंकू व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची संपुर्ण तयारी झाली होती.पण अचानकच वादळवारा,गारपीटीचा पाऊस सुरु झाला.लाईट गेली.सर्वत्र किर्रर्र अंधार होता. सगळच विस्कटल...! कार्यक्रम होणार की नाही असा सवाल निर्माण झाला.पण संघर्षयोध्दा सिध्दाराम भंडारकवठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत करायचा अन् महिलांना मान सन्मान द्यायचाच असा चंग बांधला.ग्रामपंचायत कर्मचारी,मित्र परिवार व ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले, वेळ बदलली.व सहाचा कार्यक्रम रात्री आठला आयोजित केला. पुढचा प्रश्न अत्यंत नाजुक होता.कारण गावात लाईट नव्हती.आकाशात विजा चमकत होत्या.ढगांचा कडकडाट अन् अधुनमधुन पाऊसदेखील सुरु होता.अशी प्रतिकुल परिस्थिती असताना घराघरातील महिला बाहेर कशी पडणार..? परंतु या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तर मिळाले.चांगल्याला सहानुभुती अन् प्रोत्साहन मिळतेच.बघता बघता बावकरवाडी-चपळगांवातील हजारो महिला मल्लिकार्जुन सभामंडपात कार्यक्रमासाठी उत्साहाने सहभागी झाल्या. रात्री उशीरापर्यंत थांबलेल्या महिलांनी आपल्या लक्षवेधी उपस्थितीने चांगुलपणाचा संदेश दिला.शैउपस्थितक्षणिक, आरोग्य, सामाजिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी महिलांना अनमोल मार्गदर्शन केले. सर्वांना आयोजकांकडुन गृहोपयोगी वस्तुचा वाण देण्यात आला. हा कार्यक्रम नव्हता,तर ही सत्वपरीक्षा होती.पण या सत्वपरीक्षेत पास झाला तो संघर्षयोध्दा सिध्दु भंडारकवठे...! आपल्या पत्नी तथा प्रशासक सरपंच सौ.वर्षाच्या खांद्याला खांदा लावुन लोकहितासाठी रात्रंदिवस धडपडणारा हा लोकनायक.हा गडी कधी न थांबला,कधी ना थकला, कधी ना झुकला...!
माता-भगिनींच्या आशिर्वादामुळे यशस्वी झाला हळदी कुंकुचा कार्यक्रम चपळगांव येथे ग्रामपंचायत परिवाराकडून शुक्रवारी २७ मार्च रोजी सायंकाळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हळदी कुंकू व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची संपुर्ण तयारी झाली होती.पण अचानकच वादळवारा,गारपीटीचा पाऊस सुरु झाला.लाईट गेली.सर्वत्र किर्रर्र अंधार होता. सगळच विस्कटल...! कार्यक्रम होणार की नाही असा सवाल निर्माण झाला.पण संघर्षयोध्दा सिध्दाराम भंडारकवठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत करायचा अन् महिलांना मान सन्मान द्यायचाच असा चंग बांधला.ग्रामपंचायत कर्मचारी,मित्र परिवार व ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे ठिकाण बदलले, वेळ बदलली.व सहाचा कार्यक्रम रात्री आठला आयोजित केला. पुढचा प्रश्न अत्यंत नाजुक होता.कारण गावात लाईट नव्हती.आकाशात विजा चमकत होत्या.ढगांचा
कडकडाट अन् अधुनमधुन पाऊसदेखील सुरु होता.अशी प्रतिकुल परिस्थिती असताना घराघरातील महिला बाहेर कशी पडणार..? परंतु या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तर मिळाले.चांगल्याला सहानुभुती अन् प्रोत्साहन मिळतेच.बघता बघता बावकरवाडी-चपळगांवातील हजारो महिला मल्लिकार्जुन सभामंडपात कार्यक्रमासाठी उत्साहाने सहभागी झाल्या. रात्री उशीरापर्यंत थांबलेल्या महिलांनी आपल्या लक्षवेधी उपस्थितीने चांगुलपणाचा संदेश दिला.शैउपस्थितक्षणिक, आरोग्य, सामाजिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी महिलांना अनमोल मार्गदर्शन केले. सर्वांना आयोजकांकडुन गृहोपयोगी वस्तुचा वाण देण्यात आला. हा कार्यक्रम नव्हता,तर ही सत्वपरीक्षा होती.पण या सत्वपरीक्षेत पास झाला तो संघर्षयोध्दा सिध्दु भंडारकवठे...! आपल्या पत्नी तथा प्रशासक सरपंच सौ.वर्षाच्या खांद्याला खांदा लावुन लोकहितासाठी रात्रंदिवस धडपडणारा हा लोकनायक.हा गडी कधी न थांबला,कधी ना थकला, कधी ना झुकला...!
- सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.1
- Post by ईलियास नजीर शेख2
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1