Shuru
Apke Nagar Ki App…
विटा येथे आयोजित शिवसेनेच्या बी.एल.ए. मेळाव्यामध्ये अनेक जणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे नेते नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय दादा पाटील आणि माजी उपसभापती दादासाहेब कांबळे यांच्यासह तासगाव तालुक्यातील अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे. या प्रवेश कार्यक्रमावेळी आमदार सुहास भैया बाबर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील, जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रदीप काका माने पाटील, शिव सहकार उद्योग सेनेचे जिल्हाप्रमुख कुलदीप देवकुळे सर, राज्य आरोग्य संघटनेचे अरुण नाना खरमाटे तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
विटा येथे आयोजित शिवसेनेच्या बी.एल.ए. मेळाव्यामध्ये अनेक जणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे नेते नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय दादा पाटील आणि माजी उपसभापती दादासाहेब कांबळे यांच्यासह तासगाव तालुक्यातील अनेक जणांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे. या प्रवेश कार्यक्रमावेळी आमदार सुहास भैया बाबर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील, जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते, जिल्हाप्रमुख बजरंग भाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रदीप काका माने पाटील, शिव सहकार उद्योग सेनेचे जिल्हाप्रमुख कुलदीप देवकुळे सर, राज्य आरोग्य संघटनेचे अरुण नाना खरमाटे तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम मतमोजणीच्या प्रक्रियेत आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.1
- आज मुंबई शहरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. नागरिकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजधानीत विविध ठिकाणी सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांतर्गत, एका मुख्य कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेता शाहिद कपूर यांनी हजारो नागरिकांसोबत एकत्र येत योगासने केली. 'दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्यासाठी योग' हा जागतिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवून दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे हा या भव्य आयोजनाचा मुख्य उद्देश होता. या सोहळ्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.1
- सांगोला तालुक्यातील राजुरी ग्रामदैवत लक्ष्मी मंदिरात झालेल्या चोरी आणि मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ सोमवार, २२ जून रोजी राजुरी गावातील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी ग्रामस्थांनी चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली, तसेच आठवड्याचा बाजारही बंद ठेवण्यात आला. चोरट्यांनी मूर्तीची विटंबना करून ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असून, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी राजुरी बंद दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने आत्माराम काटे यांनी केली. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर पोलिसांनी तात्काळ चोरांना अटक केली नाही, तर सर्व राजुरी ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसतील. माजी सरपंच रामभाऊ दबडे, पाणी साठवून समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब व्हळगळ आणि पंचायत समिती सदस्य डॉ. सदाशिव दबडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगोला पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली. लक्ष्मीदेवीच्या मंदिरासमोरील पटांगणात एकत्र येऊन सर्व राजुरी ग्रामस्थांनी चोरट्यांनी केलेल्या मूर्तीच्या विटंबनेचा निषेध केला आणि सर्वांच्या वतीने चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.1
- वडूज ते गणेशवाडी रस्त्यावर असलेल्या सेवालाल मंदिरासमोरच्या दुकानदारांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या दुकानांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असल्याचा आरोप असून, नागरिकांनी संबंधित दुकानदारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.1
- पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ६.३० च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. मौजे वेणुपुरी, तालुका भोर येथील नीरा देवघर धरणात लोणी काळभोर येथील चार तरुण पोहण्यासाठी गेले होते. या चार तरुणांपैकी देवेश राज मिश्रा (वय अंदाजे २८ वर्ष), जो लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील रहिवासी होता, तो धरणाच्या पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच भोईराज जलापती व्यवस्थापन आणि पोलीस स्टाफ यांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी देवेश राज मिश्रा यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय भोर येथे पाठवण्यात आला आहे.2
- रायगड जिल्हा भोई समाज कार्यकारिणीची एक महत्त्वाची सभा महाड येथील नांगलवाडी येथे श्री. राजेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेची सुरुवात दत्तगुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली. या बैठकीचा मुख्य उद्देश जून महिन्यात शाळा-महाविद्यालये सुरू होत असताना, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी 'शिष्यवृत्ती' जाहीर करणे हा होता. सभेत अनेक सामाजिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजाची ही छोटीशी मदत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत मोलाची ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली. सभेला सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सारंगे यांनी केले, तर सचिव श्री. अरविंद महाडिक यांनी सर्वांचे आभार मानून सभेची यशस्वी सांगता केली.1
- चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांनी सुप्रियाताईंचा मुका घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून आमदार रोहित पवार यांच्या मौनावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, त्यांना विचारण्यात आले आहे की ते आता गप्प का आहेत?1
- मांजर्डे गावातील युवा उद्योजक आशिष देवकुळे, ज्यांना 'दादा' या नावानेही संबोधले जाते, त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.1