तिसगाव येथे जैनांचे २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर जयंती महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न तिसगाव येथे जैनांचे २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर जयंती महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ( अहिल्यानगर जिल्हा) जैन धर्मातील २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर यांचा जयंती महोत्सव सोहळा अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल चौकातून भगवान महावीरांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणूकीत सर्व जाती धर्मातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकी तील सर्व अबाल वृध्द आणि माता भगिनींना सुबेच्छा देण्यासाठी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी वाटेत थांबून सर्वांचे स्वागत केले आणि उपस्थित महीलांना सुबेच्छा दिल्या.सदर मिरवणूक ही पाथर्डी रस्त्यावरील आशिर्वाद मंगल कार्यालयात येऊन थांबली.तेथे गावातील सर्व जाती धर्मातील जेष्ठ नेते यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ.ऋषिकेश कुलकर्णी यांनी भगवान महावीर यांच्या जीवन चरीत्रावर संदेश दिला.यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती आणि जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे,दादा महाराज नगरकर, शिवशंकर राजळे, काशिनाथ पाटील राजळे,प्रकाशबुवा रामदासी, इलियास शेख सर,भाऊसाहेब लोखंडे,शंकरराव उंडाळे,सदाशिव मैड,काशिनाथ ससाणे,भारत गारूडकर,सुनिल शेठ शिंगवी, संतोष छाजेड, पिंटू परमार, ॲडव्होकेट वैभवराव आंधळे, राजूकाका फिरोदिया, दिलिप गांधी, अशोक बोरा,अभय मुथ्था,संजय लोढा,प्रेमसुख कटारीया, माणिकचंद लोढा, सतिश मुथ्था, रमेश मुनोत, सुधिरशेठ शिंगवी,पुरुषोत्तम आठरे,कुशल भापसे,सुनिल परदेशी,जेष्ठ नेते पोपटराव आंधळे, आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन रफीक शेख यांनी केले.शेवटी उपस्थितांना प्रीती भोजन देऊन या सोहळ्याची सांगता झाली.
तिसगाव येथे जैनांचे २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर जयंती महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न तिसगाव येथे जैनांचे २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर जयंती महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ( अहिल्यानगर जिल्हा) जैन धर्मातील २४ वे तिर्थंकर वर्धमान महावीर यांचा जयंती महोत्सव सोहळा अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल चौकातून भगवान महावीरांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणूकीत सर्व जाती धर्मातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकी तील सर्व अबाल वृध्द आणि माता भगिनींना सुबेच्छा देण्यासाठी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी वाटेत थांबून सर्वांचे स्वागत केले आणि उपस्थित महीलांना सुबेच्छा दिल्या.सदर मिरवणूक ही पाथर्डी रस्त्यावरील आशिर्वाद
मंगल कार्यालयात येऊन थांबली.तेथे गावातील सर्व जाती धर्मातील जेष्ठ नेते यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ.ऋषिकेश कुलकर्णी यांनी भगवान महावीर यांच्या जीवन चरीत्रावर संदेश दिला.यावेळी पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती आणि जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे,दादा महाराज नगरकर, शिवशंकर राजळे, काशिनाथ पाटील राजळे,प्रकाशबुवा रामदासी, इलियास शेख सर,भाऊसाहेब लोखंडे,शंकरराव उंडाळे,सदाशिव मैड,काशिनाथ ससाणे,भारत गारूडकर,सुनिल शेठ शिंगवी, संतोष छाजेड, पिंटू परमार, ॲडव्होकेट वैभवराव आंधळे, राजूकाका फिरोदिया, दिलिप गांधी, अशोक बोरा,अभय मुथ्था,संजय लोढा,प्रेमसुख कटारीया, माणिकचंद लोढा, सतिश मुथ्था, रमेश मुनोत, सुधिरशेठ शिंगवी,पुरुषोत्तम आठरे,कुशल भापसे,सुनिल परदेशी,जेष्ठ नेते पोपटराव आंधळे, आणि माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन रफीक शेख यांनी केले.शेवटी उपस्थितांना प्रीती भोजन देऊन या सोहळ्याची सांगता झाली.
- भाजपा नगरसेवक कल्लू कुशवाहा यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण दतिया (मध्य प्रदेश), ३१ मार्च २०२६ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाचे स्थानिक नेते आणि वार्ड क्रमांक १ चे नगरसेवक (पार्षद) कल्लू कुशवाहा यांची आज सकाळी भरदिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण दतिया परिसरात खळबळ उडाली असून भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत सेवढा चुंगी (Sevdha Chungi) चौकात सकाळी सुमारे ८:३० ते ९ वाजेदरम्यान घडली. कल्लू कुशवाहा हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी किंवा रामलला/हनुमान मंदिरातून परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक ताबडतोब फायरिंग केली. डोक्यात आणि पाठीत गोळ्या लागल्याने ते जागीच कोसळले आणि मृत्यू झाला. हल्लेखोर (४-५ जण) दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले.5e4013 पार्श्वभूमी : कल्लू कुशवाहा हे २०२२ मध्ये भाजपातर्फे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर पूर्वी एका हत्येचा गुन्हा होता. २०१६ मध्ये पूर्व पार्षद बालकिशन कुशवाहा यांच्या हत्येच्या प्रकरणात दतिया कोर्टाने त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, काही महिने आधी उच्च न्यायालयातून त्यांना जामीन मिळाला होता. त्यांच्यावर इतर गुन्ह्यांचेही आरोप होते.4aaa75 पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी लगतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोरांच्या शोधात विशेष पथके दाखल करण्यात आली आहेत. भाजपा पक्षाने या घटनेची तीव्र निंदा केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या हत्येमुळे मध्य प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडले राहा. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. न्याय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा आहे.1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- Post by Swal Jansamannyaca ...1
- धुळे शहरातील चाकण रोड परिसरातील ओम (HP) गॅस एजन्सी बाहेर आज नागरिकांनी मोठा गोंधळ घातला. बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्राहकांनी आंदोलन छेडले. काही दिवसांपूर्वीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांच्या मते, 25 दिवसांनंतर बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नाही, मात्र मोबाईलवर दोन वेळा OTP येऊनही गॅस दिला जात नाही. 👉 याच OTP चा वापर करून सिलेंडर ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक ठप्प केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आता या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- पैठण तालुक्यात गारांचा पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पैठण तालुक्यात आज अवकाळी गारांचा जोरदार पाऊस झाला. रांजणगाव, दांडगा परिसरात अचानक वातावरण बदलून आकाशात काळे ढग दाटले आणि काही वेळातच गारांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. गारांच्या तडाख्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः भाजीपाला आणि फळबागांना फटका बसला आहे. वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.1