हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्थापनेला गती हिंगणघाट..वर्धा हिंगणघाट परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हिंगणघाट येथे स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन स्थापन करण्याच्या मागणीला आता गती मिळाली आहे. या महत्त्वाच्या मागणीसाठी मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे विधानसभेचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यादरम्यान कुणावार यांनी विधानभवनात सातत्याने लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण विषयाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले होते. या संदर्भात दिनांक १० मार्च रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला गृह विभागाचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुवेज हक तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणालीद्वारे वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सुद्धा उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रस्तावित हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिपूर्ण प्रस्तावावर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रस्तावातील काही प्रशासकीय त्रुटी दूर करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून सुधारित प्रस्ताव लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आश्वासन दिले. या प्रस्तावानुसार सुमारे १४६ पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ, आवश्यक प्रशासकीय यंत्रणा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. हिंगणघाट तालुक्यातील वाढती लोकसंख्या व ग्रामीण भागातील सुरक्षेच्या दृष्टीने हे ग्रामीण पोलीस स्टेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हिंगणघाट परिसरातील नागरिकांची सुरक्षा अधिक बळकट व्हावी, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळावे आणि पोलिसांची सेवा ग्रामीण भागापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावी या उद्देशाने आमदार समीरभाऊ कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून आता या मागणीला प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्थापनेला गती हिंगणघाट..वर्धा हिंगणघाट परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हिंगणघाट येथे स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन स्थापन करण्याच्या मागणीला आता गती मिळाली आहे. या महत्त्वाच्या मागणीसाठी मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे विधानसभेचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यादरम्यान कुणावार यांनी विधानभवनात सातत्याने लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून या महत्त्वपूर्ण विषयाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले होते. या संदर्भात दिनांक १० मार्च रोजी राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला गृह विभागाचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी, राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुवेज हक तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणालीद्वारे वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सुद्धा उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रस्तावित हिंगणघाट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिपूर्ण प्रस्तावावर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रस्तावातील काही प्रशासकीय त्रुटी दूर करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून सुधारित प्रस्ताव लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आश्वासन दिले. या प्रस्तावानुसार सुमारे १४६ पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ, आवश्यक प्रशासकीय यंत्रणा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. हिंगणघाट तालुक्यातील वाढती लोकसंख्या व ग्रामीण भागातील सुरक्षेच्या दृष्टीने हे ग्रामीण पोलीस स्टेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. हिंगणघाट परिसरातील नागरिकांची सुरक्षा अधिक बळकट व्हावी, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळावे आणि पोलिसांची सेवा ग्रामीण भागापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावी या उद्देशाने आमदार समीरभाऊ कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून आता या मागणीला प्रत्यक्षात येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- वर्ध्याच्या रामनगरात महिलेचे मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावले; घटना सीसीटीव्हीत कैद हिंगणघाटः वर्धा वर्धा शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गिरीपेठ परिसरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बाईकस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना काल सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी अत्यंत चलाखीने पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून क्षणार्धात पळ काढला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चोरटे दुचाकीवरून परिसरात आले होते. काही अंतरावर दुचाकी थांबवून मागे बसलेला चोरटा खाली उतरला आणि पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या जवळ गेला. पाहता क्षणी त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तिथेच उभ्या असलेल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून दोघांनीही धूम ठोकली. या संपूर्ण घटनेचा थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संबंधित महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात बाईकस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.1
- देश की हिफाज़त करते-करते मुजफ्फरपुर की मिट्टी का एक लाल हमेशा के लिए अमर हो गया। #indian #Jawans #jawansrk #viral #bihar #news #Muzaffarpur #trending #BiharNews #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 70584167432
- मीना ढवळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सादर केलेली एकांकिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केली एकांकिका. नागपुर: आज 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन त्यानिमित्ताने मीना ढवळे यांनी केलेली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केलेली एकांकिका.1
- नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे अक्का यांची वार्डात फिरून स्वच्छतेची पाहणी; कर्मचाऱ्यांना दिल्या कडक सूचना प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे : धामणगांव शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावे या उद्देशाने नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे (अक्का) यांनी सकाळी विविध वार्डांमध्ये प्रत्यक्ष फिरून स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील नाल्या, कचरा शौचालय व्यवस्थापन तसेच स्वच्छतेसंदर्भातील विविध बाबींची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सकाळच्या वेळेत नगराध्यक्षांनी वार्डांमध्ये फेरफटका मारत नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नाल्यांची स्वच्छता, रस्त्यावरील कचरा तसेच स्वच्छता कामांच्या अंमलबजावणीची त्यांनी बारकाईने पाहणी केली. काही ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या इतर बाबी लक्षात घेऊन त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वार्ड परिसरात नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शहरात स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आणि जबाबदारीने काम करावे, तसेच नाल्या व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे यांनी यावेळी नागरिकांनाही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. घरातील कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये टाकू नये, तो डस्टबिनमध्ये जमा करून नगरपरिषदेच्या घंटागाडीतच द्यावा. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वच्छ आणि निरोगी शहर घडवण्यासाठी सर्वांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष स्वतः सकाळी वार्डांमध्ये फिरून स्वच्छतेची पाहणी करत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून धामणगांव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वासही नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.1
- कुही-मौजा चिखली गोन्हा गावासाठी सुमारे 42 लक्ष रुपये नवीन स्मशान भूमी बांधकामासाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. आनंदराव राऊत साहेब यांना भेटून त्यांचे सामाजिक कार्यकर्ते आकाश भोयर यांनी आभार मानले. स्मशान भूमीच्या बांधकामासाठी आदरणीय राऊत साहेब यांनि मोलाचे सहकार्य केले व त्या संदर्भात VIDC कडे पाठपुरावा केला.1
- महा बीड़ी झंडा महोत्सव 10 मार्च से 16 मार्च तक चलने वाला है, और इन 7 दिनों तक #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #bihar #Aurai #AkashPriyadarshi #mela1