चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि जळगावच्या 'खानदेश इनक्युबेशन, टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रिनरशिप' (KITE) यांच्या संयुक्त विद्यमाने १० जुलै २०२६ रोजी प्राध्यापकांसाठी 'प्राध्यापक उदबोधन आणि जागरूकता कार्यक्रमाचे' आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देणे तसेच प्राध्यापकांना 'काइट'च्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचार, संशोधनवृत्ती आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी 'काइट' सारख्या संस्थांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. 'काइट'चे संचालक सागर पाटील यांनी संस्थेची उद्दिष्टे, नवोद्योग केंद्र प्रक्रिया, मार्गदर्शन सहाय्य, निधीच्या संधी, उद्योग क्षेत्रातील संपर्क जाळे आणि बौद्धिक संपदा सहाय्याबाबत सविस्तर माहिती दिली. तर संचालिका सौ. हृतगंधा देशमुख यांनी उद्योजकता विकास आणि कौशल्य वृद्धी कार्यशाळांबद्दल माहिती देत, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात प्राध्यापकांच्या नवोद्योग नोंदणी, प्रकल्प निधी आणि बौद्धिक संपदा हक्कांसंबंधीच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. महाविद्यालय आणि 'काइट' मधील सहकार्य अधिक दृढ करणे, प्रत्येक विभागाने विद्यार्थ्यांच्या स्टार्ट-अप प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि नियमित कार्यशाळांचे आयोजन करणे यावर याप्रसंगी भर देण्यात आला. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. बी. एम. सपकाळ यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन आणि आभार समन्वयक डॉ. एल. बी. पटले यांनी मानले.
चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि जळगावच्या 'खानदेश इनक्युबेशन, टेक्नॉलॉजी अँड एंटरप्रिनरशिप' (KITE) यांच्या संयुक्त विद्यमाने १० जुलै २०२६ रोजी प्राध्यापकांसाठी 'प्राध्यापक उदबोधन आणि जागरूकता कार्यक्रमाचे' आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देणे तसेच प्राध्यापकांना 'काइट'च्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचार, संशोधनवृत्ती आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी 'काइट' सारख्या संस्थांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. 'काइट'चे संचालक सागर पाटील यांनी संस्थेची उद्दिष्टे, नवोद्योग केंद्र प्रक्रिया, मार्गदर्शन सहाय्य, निधीच्या संधी, उद्योग क्षेत्रातील संपर्क
जाळे आणि बौद्धिक संपदा सहाय्याबाबत सविस्तर माहिती दिली. तर संचालिका सौ. हृतगंधा देशमुख यांनी उद्योजकता विकास आणि कौशल्य वृद्धी कार्यशाळांबद्दल माहिती देत, प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात प्राध्यापकांच्या नवोद्योग नोंदणी, प्रकल्प निधी आणि बौद्धिक संपदा हक्कांसंबंधीच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. महाविद्यालय आणि 'काइट' मधील सहकार्य अधिक दृढ करणे, प्रत्येक विभागाने विद्यार्थ्यांच्या स्टार्ट-अप प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि नियमित कार्यशाळांचे आयोजन करणे यावर याप्रसंगी भर देण्यात आला. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. ए. बी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. बी. एम. सपकाळ यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन आणि आभार समन्वयक डॉ. एल. बी. पटले यांनी मानले.
- पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.1
- 'अबकड' उप वर्गीकरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक खास मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी या उप वर्गीकरणाच्या संपूर्ण विषयावर आपली मते मांडली आहेत.1
- धुळे जिल्ह्यातील मौजे दभाषी येथे माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या माध्यमातून भीमक्रांती नगर सामाजिक सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या सभागृहालगतून जाणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे कामात अडथळा निर्माण होत असून सार्वजनिक सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी याच परिसरात विजेच्या धक्क्यामुळे दुर्दैवी घटना घडलेली असल्याने, येथे तातडीने भूमिगत केबल टाकणे अत्यंत आवश्यक आहे. याचप्रमाणे श्रीराम नगर येथील राम मंदिर सभामंडपाच्या बांधकामालाही वीज पोल आणि तारा अडथळा ठरत आहेत. सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी आणि ही विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी या पोलचे त्वरित स्थलांतर होणे गरजेचे आहे. याशिवाय गावातील मुख्य रस्त्यासाठी माननीय मंत्रीमहोदयांनी ₹१० लाखांचा निधी मंजूर केला असला, तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वीज पोलमुळे हे कामही रखडले आहे. कोणावरही टीका न करता केवळ गावाच्या विकासाला गती मिळावी, अडथळे दूर व्हावेत आणि जनहिताची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी ग्रामस्थांची विनंती आहे. महावितरण प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, ही संपूर्ण दभाषी ग्रामस्थांची अपेक्षा असून "विकास थांबू नये... सुरक्षितता अबाधित राहावी..." हीच त्यांची प्रमुख मागणी आहे.1
- नाथनगर–वडखा–वरझडी या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त झालेल्या स्थानिक तरुणांनी स्वतः पुढाकार घेत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. "राजकीय नेत्यांना फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठीच गाव आठवते का?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावरून दररोज शेंद्रा एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणारे हजारो कामगार प्रवास करतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, विशेषतः पावसाळ्यात येथील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. नाथनगर, वडखा, वरझडी, बनगाव, गेवराई, गेवराई-२, आडगाव, लिंगदरी, दोनवाडा, खामखेडा, पिरवाडी, हालदुला आणि अजिंडव या सुमारे १२ ते १३ गावांतील नागरिक आणि शेंद्रा एमआयडीसीतील कामगार दररोज याच मार्गाचा वापर करतात. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने अखेर तरुणांनी स्वतःच हे काम हाती घेतले. स्थानिक नागरिकांनी आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. निवडणुकीच्या वेळी केवळ आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.2
- पाचोरा शहरातील लोकप्रिय आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PMJ ॲडव्हेंचर पार्कला खान्देशातील सुप्रसिद्ध कलाकार आणि बिग बॉस फेम सचिन कुमावत यांनी आपल्या कुटुंबासह सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनामुळे पार्क परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी PMJ ॲडव्हेंचर पार्कचे संचालक संदीप जैन आणि अमोल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन सचिन कुमावत यांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार केला. सचिन कुमावत यांनी पार्कमधील विविध साहसी खेळ, मनोरंजनाच्या सुविधा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आकर्षक उपक्रमांची पाहणी करत येथील सुविधांचे आणि संकल्पनेचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे पाचोरा शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याच कार्यक्रमात, नुकताच 'लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार' प्राप्त झालेले पत्रकार, जनलक्ष्य न्यूजचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बारी यांचा बिग बॉस फेम सचिन कुमावत यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला दीपक माने, प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला.1
- दक्षिणी विएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या फू क्वोक बेटाजवळ शनिवारी एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली. ३२ भारतीय पर्यटक आणि चालक दलाच्या ४ सदस्यांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रात उलटली. या भीषण अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही बोट एका बेटाच्या सफरीवरून परतत होती. किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच, समुद्रातील प्रचंड लाटा आणि खराब हवामानामुळे बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाने तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले आणि २१ लोकांना सुखरूप बाहेर काढले।1