परळी तालुक्यातील अंबलवाडी वनक्षेत्रात २०२५-२६ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षलागवड कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप धीरज लक्ष्मण जंगले व शेख बाबा शेख गफार यांनी केला आहे. केवळ कागदोपत्री वृक्षलागवड करून नातेवाईकांच्या नावाने लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाच्या योग्य चौकशीची मागणी करत आणि वनविभाग अधिकारी परळी यांच्यावर कारवाईची मागणी करत त्यांनी ११ जून २०२६ पासून विभागीय वनाधिकारी (प्रा.) बीड जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. निवेदनात, नवीन वृक्षलागवडीसाठी पूर्वीची झाडे कोणाच्या परवानगीने हटवण्यात आली, त्यासंदर्भातील मंजुरी आदेशाची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, जुनी झाडे जेसीबीच्या साहाय्याने काढून नवीन लागवड करण्यासाठी झालेल्या खर्चाची माहिती, निविदा प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत अशी मागणीही करण्यात आली आहे. सन २०२५-२६ मध्ये किती झाडे लावण्यात आली आणि त्यापैकी आजघडीला किती झाडे जिवंत आहेत याची वस्तुनिष्ठ माहिती देऊन स्वतंत्र समितीमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, वृक्षलागवडीसाठी खड्डे यंत्राच्या सहाय्याने खोदण्यात आले असतानाही मजुरांच्या नावावर देयके अदा करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे संबंधित मजुरांच्या खात्यावर करण्यात आलेल्या पेमेंटची माहिती, बँक स्टेटमेंट, वेतन विवरणपत्र तसेच कामाच्या खर्चाशी संबंधित सर्व नोंदी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या वर्षी अंबलवाडी वनविभागाच्या हद्दीत किती वृक्षलागवड झाली, त्यातील किती झाडे सध्या अस्तित्वात आहेत आणि या कामांवर झालेल्या खर्चाची संपूर्ण माहिती जाहीर करण्याची मागणीही निवेदनात समाविष्ट आहे. ही कामे प्रथमदर्शनी बोगस स्वरूपाची वाटत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. धीरज जंगले व शेख बाबा यांनी यापूर्वी २० मार्च २०२६ आणि १५ मे २०२६ रोजीही संबंधित विभागाला निवेदने दिली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याने त्यांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंबलवाडीतील वृक्षलागवड कामांबाबत करण्यात आलेल्या या गंभीर आरोपांमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
परळी तालुक्यातील अंबलवाडी वनक्षेत्रात २०२५-२६ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षलागवड कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप धीरज लक्ष्मण जंगले व शेख बाबा शेख गफार यांनी केला आहे. केवळ कागदोपत्री वृक्षलागवड करून नातेवाईकांच्या नावाने लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रकरणाच्या योग्य चौकशीची मागणी करत आणि वनविभाग अधिकारी परळी यांच्यावर कारवाईची मागणी करत त्यांनी ११ जून २०२६ पासून विभागीय वनाधिकारी (प्रा.) बीड जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. निवेदनात, नवीन वृक्षलागवडीसाठी पूर्वीची झाडे कोणाच्या परवानगीने हटवण्यात आली, त्यासंदर्भातील मंजुरी आदेशाची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, जुनी झाडे जेसीबीच्या साहाय्याने काढून नवीन लागवड करण्यासाठी झालेल्या खर्चाची माहिती, निविदा प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत अशी मागणीही करण्यात आली आहे. सन २०२५-२६ मध्ये किती झाडे लावण्यात आली आणि त्यापैकी आजघडीला किती झाडे जिवंत आहेत याची वस्तुनिष्ठ माहिती देऊन स्वतंत्र समितीमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, वृक्षलागवडीसाठी खड्डे यंत्राच्या सहाय्याने खोदण्यात आले असतानाही मजुरांच्या नावावर देयके अदा करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे संबंधित मजुरांच्या खात्यावर करण्यात आलेल्या पेमेंटची माहिती, बँक स्टेटमेंट, वेतन विवरणपत्र तसेच कामाच्या खर्चाशी संबंधित सर्व नोंदी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. गेल्या वर्षी अंबलवाडी वनविभागाच्या हद्दीत किती वृक्षलागवड झाली, त्यातील किती झाडे सध्या अस्तित्वात आहेत आणि या कामांवर झालेल्या खर्चाची संपूर्ण माहिती जाहीर करण्याची मागणीही निवेदनात समाविष्ट आहे. ही कामे प्रथमदर्शनी बोगस स्वरूपाची वाटत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. धीरज जंगले व शेख बाबा यांनी यापूर्वी २० मार्च २०२६ आणि १५ मे २०२६ रोजीही संबंधित विभागाला निवेदने दिली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याने त्यांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंबलवाडीतील वृक्षलागवड कामांबाबत करण्यात आलेल्या या गंभीर आरोपांमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
- बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी घुले खून प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मध्यमांसमोर बोलताना संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की, घुले यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या खून प्रकरणातील खऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे.1
- शेतकऱ्यांच्या हितासाठी रविराज साबळे पाटील यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून रविराज साबळे पाटील हे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार करत आहेत.1
- माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी विलास घुले हत्येप्रकरणातील सर्व आरोपींची पाळेमुळे खणून खरा सूत्रधार शोधावा, अशी मागणी आज विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. २० जून रोजी रात्री केज तालुक्यात घडलेली ही घटना पूर्वनियोजित कट असून, एका व्यक्तीवर हल्ला करण्याचा कट रचला गेला होता, मात्र वाचवण्यासाठी आलेल्या विलास घुले यांच्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. हे प्रकरण म्हणजे एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला आणि दुसऱ्या व्यक्तीची हत्या असा दुहेरी गंभीर गुन्हा आहे, असे मुंडे यांनी म्हटले. या घटनेमुळे केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले असून, हत्येच्या चौथ्या दिवशीही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. विलास घुले या निष्पाप तरुणाला विनाकारण प्राण गमवावे लागल्याचा तीव्र निषेध करत, नागरिक रस्त्यावर उतरले असून केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. तसेच पोलिस ठाण्यासमोर आणि अन्य ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी गृहमंत्री यांना आवाहन करत सांगितले की, पोलिस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळेमुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा वस्तुनिष्ठ तपास करावा आणि सर्व आरोपींना अटक करण्याचे योग्य निर्देश द्यावेत. या मागणीची विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी तात्काळ दखल घेऊन गृह विभागाला योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.1
- मंठा तालुक्यातील माळेगाव येथील महिलांनी गावातील दारू बंद करण्याच्या मागणीसाठी मंठा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे. महिलांनी तात्काळ कारवाई करून गावातील दारूविक्री बंद करण्याची मागणी केली असून, कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.1
- मंठा तालुक्यातील मोहोरा गावातील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारूविक्रीला आळा घालण्याची जोरदार मागणी केल्यानंतर, ग्रामपंचायतीच्या बैठकीत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. महिलांनी ग्रामपंचायतीसमोर तक्रार केली होती की, अवैध देशी दारूच्या सर्रास विक्रीमुळे अनेक कुटुंबांमध्ये भांडणे, तंटे आणि कौटुंबिक वाद वाढले असून, यामुळे गावातील शांतता व सामाजिक वातावरण बिघडले आहे. या दारूमुळे कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असून महिलांना व मुलांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. महिलांच्या या गंभीर मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव मंजूर केला. यासोबतच, अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. गावातील नागरिकांनीही ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करून गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने त्वरित प्रभावी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.1
- पुण्यातील वात्सल्य टीमने कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान, टीमने आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा, माता-बाल आरोग्य सेवा आणि आरोग्यविषयक विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच, वात्सल्य टीमच्या सदस्यांनी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि नागरिकांशी संवाद साधत आरोग्य सेवांबाबत महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी आवश्यक बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य केंद्राच्या वतीने वात्सल्य टीमचे स्वागत करण्यात आले. या भेटीमुळे आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्यास मदत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता नेमाने, श्रीमती दांडगे, श्रीमती खैरमोडे यांच्यासह आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.1
- जालना शहराच्या मंठा चौफुली भागात महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत धडक कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत, परिसरातील अधिकृत धाबे आणि दुकानांवर ही कारवाई करण्यात आली.1
- केज तालुक्यातील चर्चित विलास घुले हत्याकांड प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा मिळावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी संबंधित व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासण्यात यावेत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. खासदार सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, विलास घुले हत्याकांडाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. तपास यंत्रणांनी सर्व तांत्रिक पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड, घटनास्थळावरील माहिती आणि संबंधित व्यक्तींच्या हालचालींचा बारकाईने तपास करावा. कायद्यापुढे सर्वजण समान असून, या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सोनवणे यांनी नमूद केले. दरम्यान, या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडूनही निष्पक्ष तपासाची मागणी होत आहे. सध्या तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. न्यायासाठी सीडीआर तपासणीसह सर्व पुराव्यांची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी पुन्हा एकदा केली आहे.1