logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धरणगाव येथील नवेगाव, तेली तलाव, श्री मारोती मंदिर परिसरात श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांच्या वतीने आयोजित भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिर आणि अधिकमासनिमित्त अखंड हरिनाममय कीर्तन महोत्सव गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय, मंगलमय, दैदिप्यमान आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. आठ दिवस चाललेल्या या भव्य आध्यात्मिक सोहळ्याने धरणगाव नगरीत भक्ती, संस्कार, राष्ट्रप्रेम आणि धर्मजागृतीचा एक अद्वितीय जागर घडवून आणला. दि. २१ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत संपूर्ण परिसर “राम कृष्ण हरी”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या अखंड हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. पहाटेच्या प्रभातफेरी, काकडा आरती, हरिपाठ, भजन, प्रवचन, हरिकीर्तन आणि संतवाणीच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे संस्कारमूल्य समाजमनात रुजविण्याचे महान कार्य या महोत्सवातून घडले. या दिव्य कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, भागवताचार्य, प्रवचनकार व संतविचारवंतांनी आपल्या ओजस्वी वाणीने हजारो भाविकांना भक्ती, ज्ञान, वैराग्य, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कारांचे अमूल्य धडे दिले. या सप्ताहात विविध मान्यवर महाराजांनी कीर्तन सेवेत सहभाग घेतला. गुरुवार, दि. २१ मे रोजी भागवताचार्य ह.भ.प. श्री भावेश महाराज विटनेरकर यांनी श्रीमद्भागवत धर्म, संत विचार आणि भक्तिमार्गाचे सखोल निरूपण केले. शुक्रवार, दि. २२ मे रोजी गायनगंधर्व ह.भ.प. श्री लीलाधर महाराज ओझरकर यांच्या मधुर व सुरेल हरिकीर्तनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शनिवार, दि. २३ मे रोजी ज्ञानसिंधू ह.भ.प. श्री ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर यांनी संत परंपरा, समाजप्रबोधन आणि संस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. रविवार, दि. २४ मे रोजी कीर्तन केसरी ह.भ.प. श्री मनोज महाराज एनगावकर यांच्या ओजस्वी आणि जोशपूर्ण कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. सोमवार, दि. २५ मे रोजी संभाजीराजे चरित्र व्याख्याते परमेश्वर महाराज पाळधीकर यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाचा गौरवशाली इतिहास जाज्वल्य शब्दांत उलगडून सांगितला. मंगळवार, दि. २६ मे रोजी ह.भ.प. श्री गजानन महाराज वरसाडेकर यांनी गोपीगीताच्या माध्यमातून श्रीकृष्ण भक्तीचा अमृतमय वर्षाव करत भाविकांना भक्तीभावात तल्लीन केले. बुधवार, दि. २७ मे रोजी भागवताचार्य ह.भ.प. श्री अतुल महाराज नारणेकर यांनी भागवत धर्म, संत साहित्य आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. अखेरीस गुरुवार, दि. २८ मे रोजी महंत गायनगंधर्व ह.भ.प. श्री अनिल महाराज धरणगावकर यांच्या भव्य, ओजस्वी आणि भक्तिरसपूर्ण हरिकीर्तनाने सप्ताहाची मंगलमय सांगता झाली, त्यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या अखंड घोषात संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता. या सप्ताहादरम्यान लहान बालकांपासून ज्येष्ठ वारकऱ्यांपर्यंत सर्व स्तरातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकरी परंपरेचे संस्कार, संतांचे विचार, राष्ट्रभक्ती, धर्मजागृती आणि समाजप्रबोधन यांचा अद्वितीय संगम या महोत्सवातून अनुभवायला मिळाला. या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांनी अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भक्तिमय वातावरणात केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समस्त माळी समाज पंच मंडळ, पाटील समाज पंच मंडळ, मराठे समाज पंच मंडळ, तिळवण तेली समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा, नवेगाव परिसरातील नागरिक तसेच सर्व समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेमध्ये अनेक गोरगरीब, गरजू व अनाथ विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेत असून त्यांचे संगोपन, शिक्षण व संस्कारांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. ज्या भाविकांना आपल्या वाढदिवसानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त किंवा इतर धार्मिक प्रसंगी अन्नदान, वस्त्रदान, शालेय साहित्यदान अथवा अन्य प्रकारची सेवा करावयाची असेल, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” या संतवचनांचा प्रत्यय देणारा हा भव्य कीर्तन महोत्सव धरणगावच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णमयी पर्व ठरला असून, हरिनाम, भक्ती, संस्कार आणि राष्ट्रचेतनेचा दीप पुढील पिढ्यांच्या मनामनांत प्रज्वलित करणारा प्रेरणादायी सोहळा म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.

1 hr ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
1 hr ago
56602475-6f68-40a4-b8cf-f58f1aaf4195

धरणगाव येथील नवेगाव, तेली तलाव, श्री मारोती मंदिर परिसरात श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांच्या वतीने आयोजित भव्य वारकरी बालसंस्कार निवासी शिबिर आणि अधिकमासनिमित्त अखंड हरिनाममय कीर्तन महोत्सव गुरुवार, दि. २८ मे २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय, मंगलमय, दैदिप्यमान आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. आठ दिवस चाललेल्या या भव्य आध्यात्मिक सोहळ्याने धरणगाव नगरीत भक्ती, संस्कार, राष्ट्रप्रेम आणि धर्मजागृतीचा एक अद्वितीय जागर घडवून आणला. दि. २१ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत संपूर्ण परिसर “राम कृष्ण हरी”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या अखंड हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. पहाटेच्या प्रभातफेरी, काकडा आरती, हरिपाठ, भजन, प्रवचन, हरिकीर्तन आणि संतवाणीच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे संस्कारमूल्य समाजमनात रुजविण्याचे महान कार्य या महोत्सवातून घडले. या दिव्य कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, भागवताचार्य, प्रवचनकार व संतविचारवंतांनी आपल्या ओजस्वी वाणीने हजारो भाविकांना भक्ती, ज्ञान, वैराग्य, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कारांचे अमूल्य धडे दिले. या सप्ताहात विविध मान्यवर महाराजांनी कीर्तन सेवेत सहभाग घेतला. गुरुवार, दि. २१ मे रोजी भागवताचार्य ह.भ.प. श्री भावेश महाराज विटनेरकर यांनी श्रीमद्भागवत धर्म, संत विचार आणि भक्तिमार्गाचे सखोल निरूपण केले. शुक्रवार, दि. २२ मे रोजी गायनगंधर्व ह.भ.प. श्री लीलाधर महाराज ओझरकर यांच्या मधुर व सुरेल हरिकीर्तनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शनिवार, दि. २३ मे रोजी ज्ञानसिंधू ह.भ.प. श्री ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर यांनी संत परंपरा, समाजप्रबोधन आणि संस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. रविवार, दि. २४ मे रोजी कीर्तन केसरी ह.भ.प. श्री मनोज महाराज एनगावकर यांच्या ओजस्वी आणि जोशपूर्ण कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. सोमवार, दि. २५ मे रोजी संभाजीराजे चरित्र व्याख्याते परमेश्वर महाराज पाळधीकर यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान आणि धर्मरक्षणाचा गौरवशाली इतिहास जाज्वल्य शब्दांत उलगडून सांगितला.

ab5388b1-d38c-4026-bb7a-45dbc2ab5ec2

मंगळवार, दि. २६ मे रोजी ह.भ.प. श्री गजानन महाराज वरसाडेकर यांनी गोपीगीताच्या माध्यमातून श्रीकृष्ण भक्तीचा अमृतमय वर्षाव करत भाविकांना भक्तीभावात तल्लीन केले. बुधवार, दि. २७ मे रोजी भागवताचार्य ह.भ.प. श्री अतुल महाराज नारणेकर यांनी भागवत धर्म, संत साहित्य आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. अखेरीस गुरुवार, दि. २८ मे रोजी महंत गायनगंधर्व ह.भ.प. श्री अनिल महाराज धरणगावकर यांच्या भव्य, ओजस्वी आणि भक्तिरसपूर्ण हरिकीर्तनाने सप्ताहाची मंगलमय सांगता झाली, त्यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या अखंड घोषात संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता. या सप्ताहादरम्यान लहान बालकांपासून ज्येष्ठ वारकऱ्यांपर्यंत सर्व स्तरातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वारकरी परंपरेचे संस्कार, संतांचे विचार, राष्ट्रभक्ती, धर्मजागृती आणि समाजप्रबोधन यांचा अद्वितीय संगम या महोत्सवातून अनुभवायला मिळाला. या भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन श्री संत कृपा वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव यांनी अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि भक्तिमय वातावरणात केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समस्त माळी समाज पंच मंडळ, पाटील समाज पंच मंडळ, मराठे समाज पंच मंडळ, तिळवण तेली समाज पंच मंडळ, लहान माळीवाडा, नवेगाव परिसरातील नागरिक तसेच सर्व समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेमध्ये अनेक गोरगरीब, गरजू व अनाथ विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेत असून त्यांचे संगोपन, शिक्षण व संस्कारांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. ज्या भाविकांना आपल्या वाढदिवसानिमित्त, पुण्यस्मरणानिमित्त किंवा इतर धार्मिक प्रसंगी अन्नदान, वस्त्रदान, शालेय साहित्यदान अथवा अन्य प्रकारची सेवा करावयाची असेल, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” या संतवचनांचा प्रत्यय देणारा हा भव्य कीर्तन महोत्सव धरणगावच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णमयी पर्व ठरला असून, हरिनाम, भक्ती, संस्कार आणि राष्ट्रचेतनेचा दीप पुढील पिढ्यांच्या मनामनांत प्रज्वलित करणारा प्रेरणादायी सोहळा म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • संघर्ष योद्धा मनोज दादा जरागे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम असून त्यांनी फडणवीस सरकारवर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, मराठा आरक्षणासंदर्भात ५८ लाख नोंदी सापडल्या होत्या, परंतु त्या नोंदी वेबसाईटवरून हटवण्यात आल्या आहेत. ज्या मराठा बांधवांच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत, तर ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांची वैधता (व्हॅलीडिटी) होत नसल्याची तक्रार जरागे पाटील यांनी केली आहे. इतका वेळ देऊनही केवळ फसवणूकच झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ मनोज दादा जरागे पाटील यांच्याशी चर्चा करून मुंबईकडे रवाना झाले आहे. दरम्यान, जरागे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे की, झोपलेल्या मराठा बांधवांनी आता जागे होऊन अंतरवाली सराटी येथे यावे. ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे, त्यांना कोणीही उठवू शकत नाही, असेही ते म्हणाले. "लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे," अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
    1
    संघर्ष योद्धा मनोज दादा जरागे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम असून त्यांनी फडणवीस सरकारवर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, मराठा आरक्षणासंदर्भात ५८ लाख नोंदी सापडल्या होत्या, परंतु त्या नोंदी वेबसाईटवरून हटवण्यात आल्या आहेत. ज्या मराठा बांधवांच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जात नाहीत, तर ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांची वैधता (व्हॅलीडिटी) होत नसल्याची तक्रार जरागे पाटील यांनी केली आहे. इतका वेळ देऊनही केवळ फसवणूकच झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांचे शिष्टमंडळ मनोज दादा जरागे पाटील यांच्याशी चर्चा करून मुंबईकडे रवाना झाले आहे. दरम्यान, जरागे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे की, झोपलेल्या मराठा बांधवांनी आता जागे होऊन अंतरवाली सराटी येथे यावे. ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे, त्यांना कोणीही उठवू शकत नाही, असेही ते म्हणाले. "लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे," अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तळपत्या उन्हात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भोकरदन तालुक्यातून तीव्र पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवकांच्या वतीने पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रा. अंकुश जाधव, सतीष जाधव, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, विलास पवार, अंगद सहाने, परमेश्वर पालोदे, श्रीकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, उमेश घोडके आदी मराठा सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
    1
    संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तळपत्या उन्हात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भोकरदन तालुक्यातून तीव्र पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवकांच्या वतीने पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर प्रा. अंकुश जाधव, सतीष जाधव, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, विलास पवार, अंगद सहाने, परमेश्वर पालोदे, श्रीकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, उमेश घोडके आदी मराठा सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    13 hrs ago
  • जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती. या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
    1
    जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती.

या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण कडक उन्हात सुरू ठेवले आहे. त्यांनी मंडप सोडून, बाज वर बसून उपोषण सुरू केले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण कडक उन्हात सुरू ठेवले आहे. त्यांनी मंडप सोडून, बाज वर बसून उपोषण सुरू केले आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • रियांश अमृत जूस हे अत्यंत 'पॉवरफुल' असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात, मित्रांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी रियांशच्या या 'पॉवर'चा अनुभव घ्यावा.
    1
    रियांश अमृत जूस हे अत्यंत 'पॉवरफुल' असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात, मित्रांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी रियांशच्या या 'पॉवर'चा अनुभव घ्यावा.
    user_Sagar Chimkar
    Sagar Chimkar
    Public Health Specialist नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील 'सिर कटी लडकी' प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात कारागृहातून बाहेर पडताच पिता-पुत्रांनी पोलिसांना मारहाणीच्या त्या बातमीपासून क्लीन चिट दिली आहे. या घडामोडीमुळे बुलढाणा पोलिसांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कारागृहाबाहेर आल्यानंतर वडिलांनी पोलिसांना निर्दोष ठरवत, त्यांच्यावरील मारहाणीचे आरोप फेटाळले.
    1
    जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील 'सिर कटी लडकी' प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात कारागृहातून बाहेर पडताच पिता-पुत्रांनी पोलिसांना मारहाणीच्या त्या बातमीपासून क्लीन चिट दिली आहे.

या घडामोडीमुळे बुलढाणा पोलिसांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कारागृहाबाहेर आल्यानंतर वडिलांनी पोलिसांना निर्दोष ठरवत, त्यांच्यावरील मारहाणीचे आरोप फेटाळले.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बनावट शिक्का प्रकरणामध्ये जाफ्राबाद पोलिसांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तातडीने जामीन मंजूर केला, ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईला एक मोठा झटका लागल्याचे दिसून येत आहे.
    1
    बनावट शिक्का प्रकरणामध्ये जाफ्राबाद पोलिसांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तातडीने जामीन मंजूर केला, ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईला एक मोठा झटका लागल्याचे दिसून येत आहे.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ओडिशातील भुवनेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका हायवा ट्रकने एका कारला सुमारे ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले.
    2
    ओडिशातील भुवनेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका हायवा ट्रकने एका कारला सुमारे ५०० मीटरपर्यंत फरफटत नेले.
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse नंदुरबार, नंदुरबार, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.