logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चांदवडला सामाजिक सद्भाव कार्य बैठकीत परस्पर संवादातून सामाजिक ऐक्याला बळकटी; चांदवड तालुका सद्भाव बैठक उत्साहात चांदवड तालुक्यातील सर्व ज्ञाती प्रमुख व प्रतिनिधींची सामाजिक सद्भाव बैठक येथील रेणुका लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर संवाद, एकता, समरसता आणि बंधुभाव दृढ करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. सागर कोकणे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय शांताराम हांडगे यांनी करून दिला. बैठकीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्हा कार्यवाह गंगाधर पगार, नाशिक विभाग सामाजिक सद्भाव कार्य संयोजक मदनजी भंदुरे, चांदवड तालुका संघचालक उत्तमराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना गंगाधर पगार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संघाची स्थापना, आजवरची वाटचाल आणि विविध क्षेत्रांमध्ये संघाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. समाजाच्या भकम संघटनासाठी परस्पर संवाद व सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नाशिक विभाग संयोजक मदनजी भंदुरे यांनी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर उपस्थितांशी संवाद साधला. त्यात पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य तसेच स्वबोध व स्वावलंबन या विविध विषयांच्या माध्यमातून समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. यासोबतच त्यांनी भारतीय संस्कृती, रक्षाबंधन उत्सवाचे महत्त्व आणि समाजातील परस्पर बंधुभाव याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत सध्याच्या समाजातील सामाजिक व आर्थिक समस्या, त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील विविध समाजघटकांनी एकत्र येऊन सामूहिकपणे कार्य करण्याचा निर्धार केला. उपस्थित विविध ज्ञाती प्रमुखांनी आपले विचार मांडत, सामाजिक सद्भाव अधिक दृढ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. या बैठकीस चांदवड तालुक्यातील २५ ज्ञातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे बैठकीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जयश्री वणवे यांनी पसायदान सादर केले. चांदवड तालुक्यातील विविध समाजघटकांना एकाच व्यासपीठावर आणून परस्पर संवाद व सामाजिक ऐक्याला बळकटी देणारी ही सद्भाव बैठक आगामी काळातील सकारात्मक सामाजिक वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. सामाजिक एकता, समरसता आणि बंधुभावाचा संदेश देत या यशस्वी बैठकीची सांगता करण्यात आली.

1 hr ago
user_Mahendra kantubhai Gujrathi
Mahendra kantubhai Gujrathi
Local News Reporter चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago
8d632965-a908-4fe2-b288-a4dab2d0a593

चांदवडला सामाजिक सद्भाव कार्य बैठकीत परस्पर संवादातून सामाजिक ऐक्याला बळकटी; चांदवड तालुका सद्भाव बैठक उत्साहात चांदवड तालुक्यातील सर्व ज्ञाती प्रमुख व प्रतिनिधींची सामाजिक सद्भाव बैठक येथील रेणुका लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. समाजातील विविध घटकांमध्ये परस्पर संवाद, एकता, समरसता आणि बंधुभाव दृढ करण्याच्या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. सागर कोकणे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय शांताराम हांडगे यांनी करून दिला. बैठकीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्हा कार्यवाह गंगाधर पगार, नाशिक विभाग सामाजिक सद्भाव कार्य संयोजक मदनजी भंदुरे, चांदवड तालुका संघचालक उत्तमराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना गंगाधर पगार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संघाची स्थापना, आजवरची वाटचाल आणि विविध क्षेत्रांमध्ये संघाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. समाजाच्या भकम संघटनासाठी परस्पर संवाद व सहकार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. नाशिक विभाग संयोजक मदनजी भंदुरे यांनी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर उपस्थितांशी संवाद साधला. त्यात पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य तसेच स्वबोध व स्वावलंबन या विविध विषयांच्या माध्यमातून समाजजीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. यासोबतच त्यांनी भारतीय संस्कृती, रक्षाबंधन उत्सवाचे महत्त्व आणि समाजातील परस्पर बंधुभाव याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत सध्याच्या समाजातील सामाजिक व आर्थिक समस्या, त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील विविध समाजघटकांनी एकत्र येऊन सामूहिकपणे कार्य करण्याचा निर्धार केला. उपस्थित विविध ज्ञाती प्रमुखांनी आपले विचार मांडत, सामाजिक सद्भाव अधिक दृढ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. या बैठकीस चांदवड तालुक्यातील २५ ज्ञातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध समाजघटकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे बैठकीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जयश्री वणवे यांनी पसायदान सादर केले. चांदवड तालुक्यातील विविध समाजघटकांना एकाच व्यासपीठावर आणून परस्पर संवाद व सामाजिक ऐक्याला बळकटी देणारी ही सद्भाव बैठक आगामी काळातील सकारात्मक सामाजिक वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. सामाजिक एकता, समरसता आणि बंधुभावाचा संदेश देत या यशस्वी बैठकीची सांगता करण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" ​काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! ​रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? ​अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. ​गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा
    2
    माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!"
​काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो!
​रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार?
​अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे.
​गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात!
तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र
    1
    शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र
लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.
    1
    जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त 
जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
    1
    मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो
    user_SACH TAK TV NEWS MALEGAON
    SACH TAK TV NEWS MALEGAON
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात ​येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. ​या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. ​अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात
स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात
​येवला (प्रतिनिधी):
स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
​कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली.
​या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते.
​अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    20 min ago
  • नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप लासलगाव (विशेष प्रतिनिधी) : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3] गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन: आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
    1
    नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप
लासलगाव (विशेष प्रतिनिधी) :
नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3]
गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन:
आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
    user_Janardhan nitin jadhav
    Janardhan nitin jadhav
    Farmer येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام
    1
    مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام
مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام
    user_SACH TAK TV NEWS MALEGAON
    SACH TAK TV NEWS MALEGAON
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मित्रांमध्ये झालेली किरकोळ बोलाचाली पाहता पाहता उग्र वादात रूपांतरित झाली. या वादातून २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
    1
    मित्रांमध्ये झालेली किरकोळ बोलाचाली पाहता पाहता उग्र वादात रूपांतरित झाली. या वादातून २७ वर्षीय हेमंत विलास सूर्यवंशी याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सापुतारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.