ब्राह्मणगाव येथे महसूल व वन विभाग यांचे कडून छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न. महाराज स्व समाधान शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील जिजाबाई काशिनाथराव धबडगे पाटील मंगल कार्यालय येथे शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी महसूल व वन विभाग तहसील कार्यालय उमरखेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किसनराव वानखेडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,तहसिलदार राजेश सुरडकर,गटविकास अधिकारी किरण कोळपे, पोलीस उपविभागीय अधिकारी हनुमंतराव गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी दुबे साहेब, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, डॉक्टर विजयराव माने,तालुका कृषी अधिकारी वडकुते साहेब, गटशिक्षण अधिकारी विजय बेतेवाड, बालविकास अधिकारी परांडे साहेब, दुय्यम निबंधक अध्यक्ष रणमले साहेब,प्रकाश पाटील धबडगे, पशु चिकित्सालय तालुका अधिकारी ठाकूर साहेब,भूमि अभिलेख अधीक्षक बालू आडे, सरपंच परमात्मा गरुडे, शेख रफिक शेख हानीप, पोलीस पाटील सुनील देवसरकर,कृषी मित्र अशोकराव वानखेडे,व अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर अपंग विद्यार्थ्याला ई सायकल रिक्षा प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सातबारा, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, फेरफार, विद्यार्थ्यांसाठी दाखले,अशा प्रकारची विविध कागदपत्रे या ठिकाणी वाटप करण्यात आले, या शिबिरात सामान्य लोकांच्या दैनंदिन गरजाशी निगडित सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.या महाराजस्व समाधान शिबीराला मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्याबदल अरविंद पाटील धबडगे यांचे महसुल विभागाने धन्यवाद मानले या अभियानाला चातारी मंडळातील बोरी, चातारी,कोपरा, ब्राह्मणगाव उंचवडद, माणकेश्वर,दिघडी, देवसरी,कारखेड, लोहरा,धानोरा हरदडा, या 13 गावातील नागरिक,महिला,मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता या विभागाचे मंडळ अधिकारी प्रदीप शिवणकर,तलाठी गजानन चव्हाण,चातारीचे तलाठी चव्हाण साहेब, तलाठी कांबळे साहेब, यांनी परिश्रम घेतले होते.. उमरखेड तालुका प्रतिनिधी अन्नपूर्णा बनसोड
ब्राह्मणगाव येथे महसूल व वन विभाग यांचे कडून छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न. महाराज स्व समाधान शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील जिजाबाई काशिनाथराव धबडगे पाटील मंगल कार्यालय येथे शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी महसूल व वन विभाग तहसील कार्यालय उमरखेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किसनराव वानखेडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,तहसिलदार राजेश सुरडकर,गटविकास अधिकारी किरण कोळपे, पोलीस उपविभागीय अधिकारी हनुमंतराव गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी दुबे साहेब, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ, डॉक्टर विजयराव माने,तालुका कृषी अधिकारी वडकुते साहेब, गटशिक्षण अधिकारी विजय बेतेवाड, बालविकास अधिकारी परांडे साहेब, दुय्यम निबंधक अध्यक्ष रणमले साहेब,प्रकाश पाटील धबडगे, पशु चिकित्सालय तालुका अधिकारी ठाकूर साहेब,भूमि अभिलेख अधीक्षक बालू आडे, सरपंच परमात्मा गरुडे, शेख रफिक शेख हानीप, पोलीस पाटील सुनील देवसरकर,कृषी मित्र अशोकराव वानखेडे,व अनेक मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर अपंग विद्यार्थ्याला ई सायकल रिक्षा प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते सातबारा, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, फेरफार, विद्यार्थ्यांसाठी दाखले,अशा प्रकारची विविध कागदपत्रे या ठिकाणी वाटप करण्यात आले, या शिबिरात सामान्य लोकांच्या दैनंदिन गरजाशी निगडित सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.या महाराजस्व समाधान शिबीराला मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्याबदल अरविंद पाटील धबडगे यांचे महसुल विभागाने धन्यवाद मानले या अभियानाला चातारी मंडळातील बोरी, चातारी,कोपरा, ब्राह्मणगाव उंचवडद, माणकेश्वर,दिघडी, देवसरी,कारखेड, लोहरा,धानोरा हरदडा, या 13 गावातील नागरिक,महिला,मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता या विभागाचे मंडळ अधिकारी प्रदीप शिवणकर,तलाठी गजानन चव्हाण,चातारीचे तलाठी चव्हाण साहेब, तलाठी कांबळे साहेब, यांनी परिश्रम घेतले होते.. उमरखेड तालुका प्रतिनिधी अन्नपूर्णा बनसोड
- Post by Sk Chand1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1
- Post by Karan1
- क्षितिज पुरम” की GRAND OPENING : Skyline Builders & Developers का भव्य प्रोजेक्ट लॉन्च1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Sk Chand1