भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या 'संघटन सृजन' अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) च्या धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुका व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर धाराशिव जिल्ह्यात NSUIच्या तालुका व शहराध्यक्षांची नियुक्ती जाहीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या 'संघटन सृजन' अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) च्या धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुका व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे नियुक्त निरीक्षक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तसेच धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष , NSUI जिल्हाध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांची मान्यता आहे. नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये भूम – अमृता भागवत शिंदे, वाशी – ओमकार उंदरे, धाराशिव शहर – मनसूर मकबूल सय्यद, उमरगा – योगेंद्र राजेंद्र माने, उमरगा शहर – गणेश अनिल सूर्यवंशी, लोहारा – अमित विरोधे, कळंब – ऋषिकेश टकले, परंडा – अजित अनिल जरांगे, परंडा शहर – सय्यद शादाब राहीद आणि नळदुर्ग शहर – रहमान शेख यांचा समावेश आहे. नियुक्त पदाधिकाऱ्यांनी NSUIची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर संघटनाचा विस्तार करण्यासाठी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना अधिक सक्षम व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या 'संघटन सृजन' अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) च्या धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुका व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर धाराशिव जिल्ह्यात NSUIच्या तालुका व शहराध्यक्षांची नियुक्ती जाहीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या 'संघटन सृजन' अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) च्या धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुका व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे नियुक्त निरीक्षक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तसेच धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष , NSUI जिल्हाध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांची मान्यता आहे. नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये भूम – अमृता भागवत शिंदे, वाशी – ओमकार उंदरे, धाराशिव शहर – मनसूर मकबूल सय्यद, उमरगा – योगेंद्र राजेंद्र माने, उमरगा शहर – गणेश अनिल सूर्यवंशी, लोहारा – अमित विरोधे, कळंब – ऋषिकेश टकले, परंडा – अजित अनिल जरांगे, परंडा शहर – सय्यद शादाब राहीद आणि नळदुर्ग शहर – रहमान शेख यांचा समावेश आहे. नियुक्त पदाधिकाऱ्यांनी NSUIची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर संघटनाचा विस्तार करण्यासाठी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना अधिक सक्षम व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; बहुजन समाजाची उत्स्फूर्त उपस्थिती बीड | प्रतिनिधी : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज (दि. १ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता बीड शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध समाजघटकांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी मा. विवेकजी जॉन्शन यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच बीडचे आमदार मा. संदीप भैया क्षीरसागर, युवा नेते कल्याणजी डोंगरे, जिल्हाध्यक्ष वीर, अखिल भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष ससाणे, अनिल डोळस, एम. एस. धनवे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास नगरसेवक भारत अण्णा कांबळे, संपादक नितीन मुजमुले, बळीराम चांदणे, विनोद हातागळे, अजिंक्य चांदणे, राजू माहुवाले यांच्यासह बौद्ध समाज, मातंग समाज आणि इतर बहुजन समाजातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक विचार आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि अण्णाभाऊंच्या विचारांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.3
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे1
- सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच! सिना-कोळेगाव धरणात अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही; जिवंत साठा उणेच!1
- चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.1