दप्तर आणि गणवेश वाटपात दुजाभाव नको खाजगी शाळांतील गरजू विद्यार्थ्यांनाही लाभ मिळावा! `शेख अब्दुल रहीम यांची मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी` मुंबई विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व गणवेश देण्याचा जो स्तुत्य निर्णय घेतला आहे, त्याचे स्वागत होत असतानाच दुसरीकडे खाजगी शाळांतील गरजू विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आता आवाज उठवला जात आहे. "विद्यार्थी कोणत्याही शाळेचा असो, तो राष्ट्राचा नागरिक आहे," असे सांगत खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही ही सुविधा मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता व 'हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री ना. दादा भुसे यांना लेखी निवेदन पाठवले आहे. `काय आहेत निवेदनातील प्रमुख मुद्दे?` शासनाने १३ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याची तरतूद केली आहे. मात्र, खाजगी शाळांतील लाखो विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहेत. शेख अब्दुल रहीम यांनी निवेदनात खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत: १. आर्थिक विषमता: केवळ सरकारी शाळेत शिकतो म्हणून गरीब आणि खाजगी शाळेत शिकतो म्हणून तो सधन, असा निकष लावणे चुकीचे आहे. खाजगी शाळांतही कष्टकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय पालकांची मुले शिक्षण घेत आहेत. २. पालकांवरील भार: वाढत्या महागाईच्या काळात गणवेश आणि दप्तराचा खर्च पेलणे सामान्य पालकांसाठी कठीण झाले आहे. ३. समान संधीचा अभाव: शैक्षणिक समतेच्या दृष्टीने सर्व शाळांतील पात्र व गरजू विद्यार्थ्यांना एकाच मापाने तोलणे आवश्यक आहे. "शासकीय नियमांचे बंधन सर्व शाळांवर असते, मग सवलतींच्या बाबतीत खाजगी शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना का वगळले जाते? शासनाने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा हा लाखो विद्यार्थ्यांच्या हक्काचा प्रश्न होईल." — शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष: हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन राज्य प्रवक्ता: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या मागणीमुळे आता राज्य शासन खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी काही ठोस निर्णय घेणार का, याकडे राज्यातील हजारो पालकांचे लक्ष लागले आहे.
दप्तर आणि गणवेश वाटपात दुजाभाव नको खाजगी शाळांतील गरजू विद्यार्थ्यांनाही लाभ मिळावा! `शेख अब्दुल रहीम यांची मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी` मुंबई विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व गणवेश देण्याचा जो स्तुत्य निर्णय घेतला आहे, त्याचे स्वागत होत असतानाच दुसरीकडे खाजगी शाळांतील गरजू विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आता आवाज उठवला जात आहे. "विद्यार्थी कोणत्याही शाळेचा असो, तो राष्ट्राचा नागरिक आहे," असे सांगत खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही ही सुविधा मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता व 'हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री ना. दादा भुसे यांना लेखी निवेदन पाठवले आहे. `काय आहेत निवेदनातील प्रमुख मुद्दे?` शासनाने १३ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याची तरतूद केली आहे. मात्र, खाजगी शाळांतील लाखो विद्यार्थी या योजनेपासून वंचित आहेत. शेख अब्दुल रहीम यांनी निवेदनात खालील महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत: १. आर्थिक विषमता: केवळ सरकारी शाळेत शिकतो म्हणून गरीब आणि खाजगी शाळेत शिकतो म्हणून तो सधन, असा निकष लावणे चुकीचे आहे. खाजगी शाळांतही कष्टकरी, मजूर आणि मध्यमवर्गीय पालकांची मुले शिक्षण घेत आहेत. २. पालकांवरील भार: वाढत्या महागाईच्या काळात गणवेश आणि दप्तराचा खर्च पेलणे सामान्य पालकांसाठी कठीण झाले आहे. ३. समान संधीचा अभाव: शैक्षणिक समतेच्या दृष्टीने सर्व शाळांतील पात्र व गरजू विद्यार्थ्यांना एकाच मापाने तोलणे आवश्यक आहे. "शासकीय नियमांचे बंधन सर्व शाळांवर असते, मग सवलतींच्या बाबतीत खाजगी शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना का वगळले जाते? शासनाने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा हा लाखो विद्यार्थ्यांच्या हक्काचा प्रश्न होईल." — शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष: हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन राज्य प्रवक्ता: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या मागणीमुळे आता राज्य शासन खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी काही ठोस निर्णय घेणार का, याकडे राज्यातील हजारो पालकांचे लक्ष लागले आहे.
- श्री झेनीथ व सौ विजेता जवादे यांनी केले सर्व भिक्खू संघांना धम्म व अर्थ दान स्व. रामवतार जवादे पुण्यमोदन निमित्त भिक्खु संघातर्फे परित्रण पाठ संपन्न नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर (दि १८) : सेंट रिंझाई पब्लिक स्कूलचे संस्थापक स्व. रामवतार जवादे यांचे आज १५ वे पुण्यस्मरण जवादे यांच्या निवासस्थानी २५ भिक्खूंना चिवरदान करून संपन्न झाले. हा पुण्यमोदनाचा कार्यक्रम कांजी हाऊस चौक बिनाकी मंगलवारी येथील जवादे यांच्या राहत्या घरी संपन्न झाला. स्व. रामवतार जवादे यांच्या पत्नी कुसुम जवादे , सुपुत्र संचालक झेनिथ जवादे व सून सौ विजेता जवादे यांच्या वतीने सर्व भिक्षूंना चिवर दान, धम्म दान करण्यात आले. परित्रण पाठास कुटुंबातील प्रा निलिमा डोंगरे, प्रा मनोज डोंगरे, श्रेयस डोंगरे, श्री राहुल पाटील, सौ पल्लवी पाटील, कु हर्षिता पाटील, श्री अशोक पाटील (मामा) चंद्रपूर, सौ उपासना वासनिक, स्वरा व श्राव्या वासनिक, अशोक गोंडाने, प्रशांत सोमकुवर आदीसह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- Post by The Indian Matrimony1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- There are two types of Energy inside Negative & Positive1
- कुही तालुक्यात भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार मदनापूर फाट्याजवळील दुर्घटनेने परिसरात हळहळ कुही(शरद शहारे):- कुही तालुक्यात मंगळवार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास मदनापूर फाट्याजवळ भीषण रस्ता अपघात घडून एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, चारचाकी वाहन क्रमांक MH 38 0492 यांनी दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार उज्ज्वल ज्ञानेश्वर ठाकरे (वय २४, रा. मांढळ, ता. कुही) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातात चारचाकी वाहनाच्या उजव्या बाजूचा टायर फुटल्याने. वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालकाच्या ठोठावरील दुखापत झाली आहे. जखमी चालकाला उपचारासाठी कुही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास वेलतूर पोलीस स्टेशनं चे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मनिराम भुरे, अवी मस्के व इतर सहकारी करीत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे मांढळ परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी मदनापूर फाट्याजवळ वेगमर्यादा व वाहतूक नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.7
- सालों की तपस्या के बाद बना अतरार घाट पुल, पर आवाजाही पर लगा 'अफ़सरशाही' का ताला; #Aurai #virals #short #videos #BiharNews #viralshorts #worldmedianews #aakashpriyadarshi1
- जवादे यांच्या निवासस्थानी भिक्खु संघाचे आगमन भोजनानंतर परित्रण पाठास होणार प्रारंभ नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर (दि १८) : उत्तर नागपुरातील सेंट रिंझाई पब्लिक स्कूल, कांजी हाऊस बिनाकी मंगलवारी येथील स्कूल चे संस्थापक स्व. रामवतार जवादे यांचे आज १५ वे पुण्यस्मरण असल्याने संचालक झेनिथ जवादे यांच्या घरी भिक्खु संघाचे आगमन झाले1