सिनेतारिका वर्षा उसगावकर यांच्या हस्ते धर्मराज चावरे यांचा सत्कार उद्योजक धर्मराज चावरे यांना ‘मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६’ कृषी व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते गौरव अहमदपूर (प्रतिनिधी) अहमदपूर येथील सोनालिका ट्रॅक्टर व ट्रेलर्सचे संचालक तथा युवा उद्योजक धर्मराज चावरे यांना कृषी व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६’ने गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते धर्मराज चावरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गेल्या ३१ वर्षांपासून धर्मराज चावरे यांनी शेतकरी आणि शेतीला पूरक यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजा ओळखून शेतकऱ्यांना आधुनिक शेती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याच्या कार्यात धर्मराज चावरे यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेल्या या पुरस्कारामुळे अहमदपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. धर्मराज चावरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, नगराध्यक्ष स्वप्निल हत्ते, उपनगराध्यक्ष आयाज शेख, शिवकुमार सोनटक्के, गुंडप्पा तत्तापुरे, ओम भाऊ पुणे, राम तत्तापूरे, धनराज चावरे, ज्ञानोबा बडगीरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सिनेतारिका वर्षा उसगावकर यांच्या हस्ते धर्मराज चावरे यांचा सत्कार उद्योजक धर्मराज चावरे यांना ‘मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६’ कृषी व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते गौरव अहमदपूर (प्रतिनिधी) अहमदपूर येथील सोनालिका ट्रॅक्टर व ट्रेलर्सचे संचालक तथा युवा उद्योजक धर्मराज चावरे यांना कृषी व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६’ने गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते धर्मराज चावरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गेल्या ३१ वर्षांपासून धर्मराज चावरे यांनी शेतकरी आणि शेतीला पूरक यंत्रसामग्रीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजा ओळखून शेतकऱ्यांना आधुनिक शेती यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याच्या कार्यात धर्मराज चावरे यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मिळालेल्या या पुरस्कारामुळे अहमदपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. धर्मराज चावरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, नगराध्यक्ष स्वप्निल हत्ते, उपनगराध्यक्ष आयाज शेख, शिवकुमार सोनटक्के, गुंडप्पा तत्तापुरे, ओम भाऊ पुणे, राम तत्तापूरे, धनराज चावरे, ज्ञानोबा बडगीरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
- *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे *मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, बेटमोगरेकरांच्या नेतृत्वाखाली मागणी.* हेक्टरी 1 लाख अनुदान द्या. प्रतिनिधी-मुखेड-कंधार मध्ये तात्काळ दुष्काळ जाहिर करुन हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्या व दुष्काळ संबंधीत निवेदनातील 10 प्रश्न तात्काळ सोडवा. गेल्या 45 दिवसापासुन नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधारमध्ये पाऊसाचा खंड पडल्याने शेतामधील उभी पिके वाळली आहेत.आता पाऊस पडला तरी शेतातली पीक उत्त्पन्न देणार नाहीत.म्हणून मुखेड-कंधार तालुक्यात दुष्काळाचे सर्व लाभ लागू करा,अशी मागणी उपजिल्हाकारी अनुप पाटील व मुखेडचे तहसीलदार अभयराय नंजुडे व कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्याकडे माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 15 सप्टेंबर रोजी शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थिती मागणी केली गेली. नांदेड जिल्हयामध्ये व मुखेड-कंधार दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याच्या मागणीसोबत दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पिकविमा लागु करा.चालु कर्जदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे 2 लाख रुपये ची कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर रक्कम द्या.दुष्काळामध्ये विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्क माफी सोबत प्रवेश फी देखील माफ करा.सतत जाणाऱ्या लाईट मुळे शेतकरी व नागरीक त्रस्त आहेत, लाईटचा कायमस्वरुपी प्रश्न सोडवा.दुष्काळामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या मजुरांना व भुमीहिन यांना काम द्या, किंवा अनुदान द्या.निराधार, अपंग, दिव्यांग यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवुन खात्यात अनुदान टाका.दुष्काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चारा छावणी उभी करा, व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करुन प्रश्न सोडवा.थकित असलेल्या घरकुलांच्या बिलासाठी पैसे न घेता तात्काळ लाभधारकांच्या खात्यात रक्कम जमा करा.बँकांना तात्काळ कर्ज वाटपाचे आदेश द्या, व कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांची होणारी अडवणुक व लूट थांबवा.या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी शेतकरी मोठी संख्या मुखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर जमा झाल्यामुळे निवेदनाला मोर्चाचे स्वरूप आले. या शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी मुखेड गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे यांना मुखेडच्या पंचायत समिती कार्यालयाचा भ्रष्टाचार संपविण्यासाठी घेराव घेतला आणि घराकुलामध्ये पैसे घेणे बंद करा अशी मागणी केली.यावेळी राजु पाटील रावानगावकर, विश्वंभर पाटील मस्लगेकर, शोकत पठाण, संजय रावणगावकर, नासर पठाण, माधवराव पाटील उंद्रीकर, अच्यतुराव पाटील बिल्लालीकर, शंकर पाटील जांभळीकर,रमेश पाटील आमणर,किरण पाटील धामणगावकर,बालाजी वारे, जयपाल गायकवाड, बालाजी काटशेव, गणेश मोरे, वसु पाटील येवतीकर, मैंनू साब येवतीकर, हावगिराव पाटील, संदीप घाटे , नागनाथ पाटील बेळीकर,संजय नुकुलवार, हरिदास पाटील, मगदूम पठाण,माधव पाटील होनवडज,शफी कुरेशी, हणमंत मुगवणे, रामभाऊ पाटील,संदीप पाटील निवळीकर,माऊली कोठारे,शंकर आतनूरे शिवाजी पाटील बेळीकर, गणेश आप्पा स्वामी, सुनील आरगिळे,प्रकाश पाटील कबीर, परशुराम गवाले, विजय पाटील तारदड,विजय पाटील इंमडे,पत्रे चेअरमन,बालाजी खांडेकर,बालाजी साबणे,मारोती मटके, रियाज शेख पत्रकार, मनोज गुट्टे, बजरंग बोडके तुपदाळ,बालाजी गुट्टे, भानुदास पाटील, बळते माऊलीकर, इरफान मोमिन,विलास इमडे,रमेश तेलंग, अविनाश इंगळे3
- :श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर मध्ये भव्य कीर्तनाचा सोहळा संपन्न देगलूर : ऋषी पंचमीच्या पावन तिथीनिमित्त श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर येथील श्री गजानन महाराज व श्री दत्त महाराज मंदिर बापू मार्केट येथे मुंबईचे प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प .श्रीदेवी असावरी रबंदे जोशी यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा संपन्न झाला .त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला मोठ्या संख्येने महिला पुरुष मुली मुले या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला . या संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रमेश कंतेवार,वैजनाथ स्वामी,अशोक साखरे ,सायलू तैदलवार,नारायण तोटावर ,सुवर्णकार सूर्यकांत,सत्यनारायण नागोरी,आदी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रतिनिधी :संदीप देसाई2
- महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. महानगरपालिका लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन ; उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे. सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026. लातूर प्रतिनिधी: महानगरपालिका यांनी रविवार 13 सप्टेंबर 2026 रोजी करावरील शास्तीत 90% सूट जाहीर केल्याने तसेच लोक अदालत असल्याने या लोक अदालतीत 5 कोटींच्यावर कर संकलन झाले असल्याचे महानगरपालिका उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले.1
- श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर1
- जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.1
- फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे1
- घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरकुल योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात युवासेनेचे ‘भीक मांगो’ आंदोलन; प्रशासनाचे वाभाडे काढले तालुक्यातील रमाई, प्रधानमंत्री आणि मोदी आवास योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, शिवसेना (युवासेना) तालुकाप्रमुख बालाजी काटशेव यांच्या नेतृत्वाखाली आज मुखेड पंचायत समिती आणि तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी ‘भीक मांगो‘ आंदोलन करण्यात आले. संबंधित इंजिनीअर, ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या लुटीविरोधात प्रशासनाने ठोसकारवाई न केल्याने अखेर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकहिताच्या योजनांमध्ये खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांनाडावलून बोगस लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. जागेवर घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करताचबनावट कागदपत्रांच्या आधारे बिलांची रक्कम हडपली जात आहे. गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्या संगनमताने लाभार्थ्यांकडून पैशांचे हप्ते घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, याविरोधात कोणी तक्रार केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तक्रारदारांना धमकावणे व शिवीगाळ करणे असे गंभीर प्रकार घडत आहेत. या संपूर्ण गैरप्रकाराबाबत बालाजी काटशेव यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजीच प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या निवेदनानंतर, मुखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ११सप्टेंबर २०२६ रोजी एक अधिकृत पत्र काढले होते. या पत्राद्वारे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धर्मेकर डी.पी., धुळगंडे एस.एस., आणि जोगपेठे डी.व्ही. यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच १५ तारखेच्या या ‘भीक मांगो‘ आंदोलनापूर्वी कारवाई करून आंदोलनकर्त्यांचे समाधान करण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रशासनाकडून केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन करण्यात आले. गोरगरिबांच्या हक्काच्या घरांवर डल्ला मारणाऱ्या या भ्रष्ट साखळीची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी. तसेच, लाचखोर अधिकारी, इंजिनीअर आणि या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सरपंचांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बालाजी काटशेव यांनी केली आहे. या आंदोलनामुळे घरकुल योजनेतील गैरकारभाराचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून, प्रशासन आता तरीकारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.4