अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले आणि विवीध प्रश्न उपस्थित केले...!! १)नांदुरा व मलकापूर नगरपालिका क्षेत्रांना वाढीव विकास निधी द्या...!! विदर्भाचे प्रवेशद्वार असणाऱ्या मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा या दोन नगरपालिकांना अतिरिक्त विकास निधी द्यावा तसेच हद्दवाढ झाल्यानंतर नवीन भागामध्ये विकास कामांना शासन निधी देते मात्र नांदुरा व मलकापूर या दोन्ही नगरपालिकांना हद्दवाढी नंतर विकासनिधी शासनाने अद्यापही दिला नाही तो तात्काळ द्यावा अशी मागणी विधानसभेत दिनांक ०४ जुलै रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होतांना केली.मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा ही दोन मोठी शहरे असून नांदुरा शहराची हद्दवाढ झाली आहे हद्दवाढी नंतर नवीन समाविष्ट झालेल्या भागांच्या विकासाकरता शासनाने निधी देणे क्रमप्राप्त आहे मात्र अद्यापही नांदुरा शहराला हद्दवाढ झालेल्या नवीन वस्त्यांमध्ये वाढीव विकासनिधी मिळाला नाही त्याचप्रमाणे मलकापूर नगरपालिकेला सुद्धा विकास कामांकरिता वाढीव निधीची आवश्यकता असल्याचे विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना अधोरेखित केले.तसेच शासनाने तात्काळ नांदुरा व मलकापूर नगरपालिकेतील हद्दवाढी नंतर समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन भागाला वाढीव विकासनिधी देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.सदर निधी प्राप्त झाल्यानंतर मलकापूर व नांदुरा शहरातील हद्दवाढी नंतर समाविष्ट झालेल्या भागातील विकास कामे जलद गतीने पूर्ण होणार आहेत. २)मलकापूर व नांदुरा शहराला मिळणार नवीन पाणीपुरवठा योजना....!! मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरांसाठी सुमारे ४५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असून वाढत्या लोकसंख्येनुसार मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी विधानसभेत केली आहे.विदर्भाचे प्रवेशद्वार असणाऱ्या मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा ही दोन मोठी शहरे असून या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना ही ४५ वर्षांपूर्वीची आहे.त्यामुळे वाढती लोकसंख्या व निकामी झालेल्या जलवाहिन्या यामुळे वारंवार वरील दोन्ही शहरांसाठी पाणीपुरवठा खंडित होतो.मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी आले आहेत.त्यांना तात्काळ मंजुरी देऊन मलकापूर व नांदुरा शहरात करता नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी त्यांच्या मागणीनुसार मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरांना लवकरच नवीन पाणीपुरवठा योजना मिळणार आहे. ४)अल्पसंख्यांक समाजाकरीता मार्टीची स्थापना करा..!! स्वातंत्र्यानंतरअल्पसंख्यांक समाजाकरीता मार्टीची स्थापना करून अल्पसंख्यांक प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे.शासनाने तात्काळ अल्पसंख्यांक समाजाकरीता मार्टीची स्थापना करण्याची मागणी विधानभवनात अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना केली आहे अल्पसंख्यांक समाजाचा आर्थिक स्तर सुधरविण्यासाठी तसेच अल्पसंख्याकांमधील व्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रातून प्रगती करणाऱ्यांकरीता स्वतंत्र मार्टीची स्थापना करून त्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना मदत करावी अशी मागणी अधिवेशनात अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना केली आहे.राज्यात सारथी,बार्टी,महाज्योती आदींची स्थापना करून शासनाने संबंधितांना न्याय दिला आहे.त्याचप्रमाणे राज्यातील अल्पसंख्यांक करिता मार्टीची स्थापना करण्याची मागणी केली आहे...!! ४)मराठा व ओ.बी.सी तरुणांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करा...!! राज्यात होणाऱ्या पोलीस भरती करिता ओ.बी.सी संवर्गातील सुमारे सहा लक्ष व मराठा समाजातील चार लक्ष तरुणांनी अर्ज भरले असून त्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची कोणतीही व्यवस्था शासनाने केली नाही.मराठा व ओ.बी.सी तरुणांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शासनाने द्यावे अशी मागणी विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना केली आहे.राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी एस.सी व एस.टी संवर्गाकरिता शासनाने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची सोय केली आहे.मात्र या भरती करता तयारी करणाऱ्या ओ.बी.सी व मराठा तरुणांकरीता शासनाने भरतीपूर्व प्रशिक्षणाबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही किंवा शासन ओ.बी.सी व मराठा तरुणांना भरतीपूर्व प्रशिक्षण देत नाही हा मराठा व ओ.बी.सी तरुणांवर अन्याय आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मराठा व ओ.बी.सी तरुणांना देण्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याची मागणी शासन दरबारी केली आहे...!! ५)नांदुरा तालुक्यातील शेती खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या...!! नांदुरा तालुक्यात जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडून प्रचंड नुकसान झाले आहे.खरडून गेलेल्या शेतीचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे मात्र अद्यापही नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने मदत वितरित केली नाही इतर भागात शासनाने मदत दिली मग मलकापूर मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा या मधील शेतकऱ्यांशी दुजाभाव का..??अर्थसंकल्पीय चर्चेत राज्य शासनाची भेदभाव पूर्ण वागणुक विधानभवनाच्या माध्यमातून सर्व राज्यासमोर उघड केली,तसेच जमीन खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली,मलकापूर मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा तालुक्यात जुलै २०२३मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे,अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही मलकापूर मतदारसंघातील नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीच मदत शासनाने केली नाही.शासकीय मदतीचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत.महसूल विभागाने पंचनामे करून झालेल्या नुकसानीबाबत शासनाला माहिती दिली आहे मात्र अद्यापही राज्य शासनाने कोणतीही मदत शेतकऱ्यांना केली नाही.राज्य शासनाने दुजाभाव करत इतर भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत केली मग नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा गुन्हा काय..?? या शेतकऱ्यांसोबत राज्य शासन दुजाभाव का करीत आहे..??असा परखळ प्रश्न अर्थसंकल्पीय चर्चेतून विचारून शेती खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित करण्याबाबतची मागणी केली आहे...!!
अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले आणि विवीध प्रश्न उपस्थित केले...!! १)नांदुरा व मलकापूर नगरपालिका क्षेत्रांना वाढीव विकास निधी द्या...!! विदर्भाचे प्रवेशद्वार असणाऱ्या मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा या दोन नगरपालिकांना अतिरिक्त विकास निधी द्यावा तसेच हद्दवाढ झाल्यानंतर नवीन भागामध्ये विकास कामांना शासन निधी देते मात्र नांदुरा व मलकापूर या दोन्ही नगरपालिकांना हद्दवाढी नंतर विकासनिधी शासनाने अद्यापही दिला नाही तो तात्काळ द्यावा अशी मागणी विधानसभेत दिनांक ०४ जुलै रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होतांना केली.मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा ही दोन मोठी शहरे असून नांदुरा शहराची हद्दवाढ झाली आहे हद्दवाढी नंतर नवीन समाविष्ट झालेल्या भागांच्या विकासाकरता शासनाने निधी देणे क्रमप्राप्त आहे मात्र अद्यापही नांदुरा शहराला हद्दवाढ झालेल्या नवीन वस्त्यांमध्ये वाढीव विकासनिधी मिळाला नाही त्याचप्रमाणे मलकापूर नगरपालिकेला सुद्धा विकास कामांकरिता वाढीव निधीची आवश्यकता असल्याचे विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना अधोरेखित केले.तसेच शासनाने तात्काळ नांदुरा व मलकापूर नगरपालिकेतील हद्दवाढी नंतर समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन भागाला वाढीव विकासनिधी देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.सदर निधी प्राप्त झाल्यानंतर मलकापूर व नांदुरा शहरातील हद्दवाढी नंतर समाविष्ट झालेल्या भागातील विकास कामे जलद गतीने पूर्ण होणार आहेत. २)मलकापूर व नांदुरा शहराला मिळणार नवीन पाणीपुरवठा योजना....!! मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरांसाठी सुमारे ४५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना अस्तित्वात असून वाढत्या लोकसंख्येनुसार मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेला तात्काळ मंजुरी देण्याची मागणी विधानसभेत केली आहे.विदर्भाचे प्रवेशद्वार असणाऱ्या मलकापूर मतदारसंघात मलकापूर व नांदुरा ही दोन मोठी शहरे असून या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना ही ४५ वर्षांपूर्वीची आहे.त्यामुळे वाढती लोकसंख्या व निकामी झालेल्या जलवाहिन्या यामुळे वारंवार वरील दोन्ही शहरांसाठी पाणीपुरवठा खंडित होतो.मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी आले आहेत.त्यांना तात्काळ मंजुरी देऊन मलकापूर व नांदुरा शहरात करता नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी त्यांच्या मागणीनुसार मलकापूर व नांदुरा या दोन्ही शहरांना लवकरच नवीन पाणीपुरवठा योजना मिळणार आहे. ४)अल्पसंख्यांक समाजाकरीता मार्टीची स्थापना करा..!! स्वातंत्र्यानंतरअल्पसंख्यांक समाजाकरीता मार्टीची स्थापना करून अल्पसंख्यांक प्रगतीच्या वाटा मोकळ्या करून देण्याची मागणी सातत्याने होत आहे.शासनाने तात्काळ अल्पसंख्यांक समाजाकरीता मार्टीची स्थापना करण्याची मागणी विधानभवनात अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना केली आहे अल्पसंख्यांक समाजाचा आर्थिक स्तर सुधरविण्यासाठी तसेच अल्पसंख्याकांमधील व्यवसाय व शैक्षणिक क्षेत्रातून प्रगती करणाऱ्यांकरीता स्वतंत्र मार्टीची स्थापना करून त्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना मदत करावी अशी मागणी अधिवेशनात अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना केली आहे.राज्यात सारथी,बार्टी,महाज्योती आदींची स्थापना करून शासनाने संबंधितांना न्याय दिला आहे.त्याचप्रमाणे राज्यातील अल्पसंख्यांक करिता मार्टीची स्थापना करण्याची मागणी केली आहे...!! ४)मराठा व ओ.बी.सी तरुणांसाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आयोजित करा...!! राज्यात होणाऱ्या पोलीस भरती करिता ओ.बी.सी संवर्गातील सुमारे सहा लक्ष व मराठा समाजातील चार लक्ष तरुणांनी अर्ज भरले असून त्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची कोणतीही व्यवस्था शासनाने केली नाही.मराठा व ओ.बी.सी तरुणांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शासनाने द्यावे अशी मागणी विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना केली आहे.राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी एस.सी व एस.टी संवर्गाकरिता शासनाने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाची सोय केली आहे.मात्र या भरती करता तयारी करणाऱ्या ओ.बी.सी व मराठा तरुणांकरीता शासनाने भरतीपूर्व प्रशिक्षणाबाबत कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही किंवा शासन ओ.बी.सी व मराठा तरुणांना भरतीपूर्व प्रशिक्षण देत नाही हा मराठा व ओ.बी.सी तरुणांवर अन्याय आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मराठा व ओ.बी.सी तरुणांना देण्यासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याची मागणी शासन दरबारी केली आहे...!! ५)नांदुरा तालुक्यातील शेती खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या...!! नांदुरा तालुक्यात जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडून प्रचंड नुकसान झाले आहे.खरडून गेलेल्या शेतीचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे मात्र अद्यापही नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने मदत वितरित केली नाही इतर भागात शासनाने मदत दिली मग मलकापूर मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा या मधील शेतकऱ्यांशी दुजाभाव का..??अर्थसंकल्पीय चर्चेत राज्य शासनाची भेदभाव पूर्ण वागणुक विधानभवनाच्या माध्यमातून सर्व राज्यासमोर उघड केली,तसेच जमीन खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली,मलकापूर मतदारसंघातील मलकापूर व नांदुरा तालुक्यात जुलै २०२३मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे,अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही मलकापूर मतदारसंघातील नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणतीच मदत शासनाने केली नाही.शासकीय मदतीचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत.महसूल विभागाने पंचनामे करून झालेल्या नुकसानीबाबत शासनाला माहिती दिली आहे मात्र अद्यापही राज्य शासनाने कोणतीही मदत शेतकऱ्यांना केली नाही.राज्य शासनाने दुजाभाव करत इतर भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत केली मग नांदुरा व मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा गुन्हा काय..?? या शेतकऱ्यांसोबत राज्य शासन दुजाभाव का करीत आहे..??असा परखळ प्रश्न अर्थसंकल्पीय चर्चेतून विचारून शेती खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरित करण्याबाबतची मागणी केली आहे...!!
- SUश्रीरामNandura, Buldhana👌3 days ago
- Post by Mayank sharma1
- इथे जाऊ शकतो एखाद्याचा जीव...मलकापूर पालिकेच्या भोंगळ कारभाराचा दादा शिंगण यांनी केला पर्दाफाश..1
- मलकापूर नगरपालिकाच्या सांडपाण्या बाबत मा नगरसेवक दादा शिंगण यांचा आंदोलनाचा इशारा1
- मलकापूर ते गोंदवले रोड1
- श्री संत जंगली महाराज पायी नांदुरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर दिंडी सोहळा हीच व्हावी माझी आस.....1
- श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर नांदुरा | श्री गुरुदेव सेवाश्रम नांदुरा🌼💫1
- जगातील उंच व विशालकाय हनुमंतरायाची 105 फूट उंच मूर्ती. नांदुरा1
- श्री संत मुक्ताई पालखी सोहळा| विशाल महाराज खोले मुक्ताईनगर| जिव्हाळा1